शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

कधी सर्व्हर डाऊन, तर कधी आॅनलाईन जोडणीला खो !

By admin | Updated: June 23, 2015 00:20 IST

विद्यार्थ्यांचे नाकीनऊ : सेतू केंद्रातून विविध दाखले मिळण्यास अडचण; दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यासह पालकांची झुंबड

कोल्हापूर : दहावी आणि बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्न, अधिवास, रहिवासी, नॉनक्रिमिलेअर आदी दाखले प्रवेश अर्जासोबत सक्तीचे असल्याने कसबा बावडा येथील सेंट्रल बिल्डींगमध्ये असलेल्या सेतू केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मात्र, कधी सर्व्हर डाऊन, तर कधी आॅनलाईन कनेक्टिव्हीटी न मिळाल्याने हे दाखले वेळेत मिळताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊआले आहे. नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे जून महिना आला की, शाळा, महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी पदविका, कृषी पदविका, कृषी प्रमाणपत्र कोर्स, वैद्यकीय आदी शाखांना प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते. त्याचप्रमाणे या प्रवेशांसाठी प्रवेश अर्जासोबत सत्य गुणपत्रिकेसोबत शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, अधिवास, रहिवासी, रहिवास डोंगरी आदी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना जोडावी लागतात. मात्र, प्रवेशाची अंतिम तारीख आणि दाखला मिळण्याची अंतिम तारीख दोन्ही जवळ असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही सँडविच होते. यात दिवसाला उत्पन्नाचा, नॉनक्रिमिलेअर, रहिवासी आदी दाखले काढण्यासाठी सध्या सेतू केंद्रात दिवसाला २०० हून अधिक अर्ज येतात. तर ६० ते ७० विविध दाखले विद्यार्थ्यांना अग्रक्रमानुसार आलेल्या अर्जानुसार दिले जातात. प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतरच हे दाखले त्वरित मिळावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, हे दाखले कधी आणि किती दिवस आधी काढले तरी चालतात, याबद्दल माहिती नसल्याने अनेक पालक अगदी प्रवेश तोंडावर आल्यावरच या सेतु केंद्रांकडे धाव घेतात. एकाच वेळी सर्व पालक विद्यार्थी आल्याने सेतू केंद्रामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. महाआॅनलाईनचा सर्व्हर डाऊनचराज्यभरात महाआॅनलाईन हा सरकारचा सर्व्हर राज्यभरातील सेतू केंद्रांना जोडला आहे. हा सर्व्हर मुंबई येथे असल्याने राज्यभरातील सेतू केंद्रांचा भार यावर आहे. त्यामुळे ऐन कामाच्या वेळीच या सर्व्हरचा वेग मंदावतो. त्यामुळे दाखले देण्यास विलंब होत आहे.दिवसाला या सर्व्हरवर सध्या प्रवेशाचे दिवस असल्याने अडीच लाखांहून अधिक अर्ज दाखल होत आहेत. त्यामुळे क्षमता कमी अन् भार जास्त झाल्याने वेग मंदावणे, मध्येच सलग्नता तुटणे, सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार घडत आहेत. दाखल्यांसाठी हेही करता येईलउत्पन्नाच्या दाखल्यांसाठी केवळ ३३ रुपये शुल्क आकारणी केली जाते. तर हा दाखला एप्रिलनंतर केव्हाही काढला तरी चालतो. तर जातीचा, नॉनक्रिमिलिअर, शेतकरी, अधिवास आदी दाखले ६ महिन्यांत कधीही काढले तरी चालतात. या दाखल्यांसाठी ३३ रुपयांचे शुल्क व अ‍ॅफिडेव्हिटचे ३३ रुपये असे एकूण ६६ रुपये खर्च येतो. त्यामुळे पालकवर्गाने जून महिना आल्यानंतरच जागे होऊन हे दाखले काढण्यासाठी धाऊ नये. त्यापूर्वीच प्रवेश इच्छुक दहावी, बारावीच्या पालक, विद्यार्थ्यांनी हे काढले तरी चालतात. आॅक्टोबर महिन्यात सर्व शाळांमध्ये दाखल्यांसाठी शिबिरेही आयोजित केल्या जातात. पण याकडे लक्ष कोण देत नाही.