शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना ; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST

दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचे प्रमाण विशेषत: पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात नदीचे पाणी अधिकच दूषित झालेले असते. त्यामुळे महानगरपालिका ...

दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचे प्रमाण विशेषत: पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात नदीचे पाणी अधिकच दूषित झालेले असते. त्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या पाणीशुद्धिकरणाच्या प्रक्रियेवर मर्यादा येतात. शुद्ध पाण्याच्या निकषांप्रमाणे शुद्धिकरणाची प्रक्रिया होत नाही. परिणामी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता असते.

बऱ्याच वेळा सार्वजनिक तसेच खासगी वितरण नलिका फुटलेल्या असतात, त्यांना गळती लागलेली असते. त्याची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. त्यामुळे वितरण नलिकेतून दूषित पाणी मिसळून ते थेट घरापर्यंत पोहोचते. नागरिकांचा हा निष्काळजीपणा आजारपणावर उठतो. त्यामुळे दैनदिन गरज भागविताना शुद्ध पाणी पिण्यावर भर द्यायला पाहिजे. सध्या कोल्हापूर शहरात मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी तो शुद्ध होईलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे पाणी पिताय ना, मग पुरेश काळजी घ्यायला पाहिजे.

- दूषित पाण्यामुळे होणारे आजार -

दूषित पाणी प्यायल्यामुळे माणसांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतात. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, अमिबा, टायफॉईड यासारखे पाच प्रमुख आजार होतात. आजार तसे साधे वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे कधी कधी महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून उपचार करवून घेणे आवश्यक असते.

- अशी असतात आजाराची लक्षणे -

गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, अमिबा, टायफॉईड यासारखे आजार झाल्यास रुग्णांना जुलाब, उलट्या होतात. ताप येतो, पोटात दुखायला लागते, लिव्हरला सूज येते, अशक्तपणा येतो, अपचन होते, भूक मंदावते, आतड्यांना सूज येण्याची शक्यता असते. शौचाद्वारे रक्त पडते, शरीरातील कॅल्शियम कमी होते.

- पाणी उकळून प्यायलेले बरे !

ज्यावेळी आपल्याकडे नळाला गढूळ, दुषित तसेच दुर्गंधीयुक्त पाणी येते, त्यावेळी ते पिण्यास अयोग्य असते. असे दूषित पाणी पिणे टाळले पाहिजे. अगदीच अडचणी असतील तर पाणी १०० अंश सेल्सियस उष्णतेपर्यंत चांगले उकळून गाळून पिणे आवश्यक ठरते. पाणी उकळल्यावर त्यातील बॅक्टेरिया मरतात. उकळलेले पाणी गार करून पिले तरी चालते.

- कोल्हापूरकरांना दररोज १३५ लिटर पाणी -

कोल्हापूर शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार साडेपाच लाख इतकी आहे; परंतु आता ती सव्वासहा लाखांपर्यंत पोहोचली आहे. महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभाग शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी शहरातील तीन जलशुद्धिकरण केंद्रातून रोज सरासरी १२० ते १३० एम.एल.डी. पाणीपुरवठा करत आहे. प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी दिले जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे.