शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अस्थिरतेमुळे यंत्रमागधारक मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:35 IST

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वाढलेले वीज दर, कामगारांची मजुरीवाढ, मिल स्टोअर्स खर्चात वाढ याबरोबरच वस्त्रोद्योगातील वहिफणीपासून ते तयार झालेले कापड नेणाºया टेम्पो भाड्यापर्यंत सर्व इतर घटकांच्या खर्चात वाढ झाली आहे. याउलट सन २०१३ मध्ये कापडाला असलेला २४ रुपये मीटर भाव साडेपंचवीसपर्यंत पोहोचून पुन्हा २४ रुपयांवर आला आहे. कापडाचा दर ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वाढलेले वीज दर, कामगारांची मजुरीवाढ, मिल स्टोअर्स खर्चात वाढ याबरोबरच वस्त्रोद्योगातील वहिफणीपासून ते तयार झालेले कापड नेणाºया टेम्पो भाड्यापर्यंत सर्व इतर घटकांच्या खर्चात वाढ झाली आहे. याउलट सन २०१३ मध्ये कापडाला असलेला २४ रुपये मीटर भाव साडेपंचवीसपर्यंत पोहोचून पुन्हा २४ रुपयांवर आला आहे. कापडाचा दर ‘जैसे थे’ असताना वाढलेला इतर खर्च यामुळे यंत्रमागधारक मेटाकुटीला आला आहे. यामध्ये शासनाकडूनही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. या घडामोडींमुळे वस्त्रोद्योगात अस्थिरता निर्माण झाली असली तरी कष्टातून उभारलेला वडिलार्जित व्यवसाय म्हणून अनेक तरुण उद्योजक व्यवसाय जेमतेम चालवीत आहेत. या व्यवसायातील अनेकांची अवस्था ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी बनली आहे.इचलकरंजी शहरात साधारण एक लाख साधे यंत्रमाग आहेत. या यंत्रमागावर उत्पादित होणाºया वेगवेगळ्या उत्पादनांपैकी उदाहरण म्हणून पॉपलीन ८०/५२ या उत्पादनाचा पाच वर्षांतील आढावा घेतल्यास सन २०१३ मध्ये या कापडाला २४ रुपये मीटर असा दर होता. तो २०१४ साली २५, सन २०१५ साली २५.५० पर्यंत वाढला होता. त्यानंतर पुन्हा खाली जात आज परत २४ रुपयांवर येऊन ठेपला आहे. पाच वर्षांतील सुताचे भाव पाहता २०१३ मध्ये एक हजार रुपये होता. तो २०१४ मध्ये ८१० रुपये, २०१५ मध्ये ८५० रुपये होता. तेथून वाढत सध्या एक हजार ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २०१४-१५ मध्ये सुताचा दर कमी व कापडाला चांगला दर मिळाल्यामुळे या साध्या यंत्रमागधारकाला थोडाफार फायदा मिळविता आला. मात्र, २०१५-१६ नंतर आजतागायत व्यवसायाची परिस्थिती बिकट राहिली आहे. २०१३ मध्ये दोन रुपये ६० पैसे प्रतियुनिट असलेली वीज आज तीन रुपये ५० पैशांपर्यंत पोहोचली आहे. याबरोबर कामगारांची मजुरीवाढ, दिवाणजी, जॉबर, कांडीवाले, वहिफणी, वाहतूकदार, सायझिंग-वार्पिंग, प्रोसेसिंग अशा सर्व खर्चात वाढ झाली आहे. वस्त्रोद्योगात सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यावर शासनाकडून आखल्या जाणाºया उपाययोजना तोकड्या पडत आहेत. त्यासाठी ठोस वस्त्रोद्योग धोरण अवलंबून त्या माध्यमातून या उद्योगाला नवसंजीवनी देण्याची गरज आहे.नफेखोरीमुळे अडचणींत वाढसूत दर व कापड दर यातील नफेखोरीमुळे या व्यवसायात अडचणी वाढल्या आहेत. यावर शासनाचा अथवा प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने नफेखोरी करणाºयांचे चांगलेच फावते. वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगार, यंत्रमागधारक यासह अन्य घटकांत काम करणारे यांची मागील पाच-दहा वर्षांतील प्रगती व नफेखोरी करणाºया सूत व कापड या क्षेत्रात व्यवसाय करणाºयांच्या प्रगतीचा आढावा घेतल्यास दिसून येणारी मोठी तफावत हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.फायदा-तोटा समजून येत नाहीसूत खरेदी केलेल्या दिवसानंतर पंधरा ते वीस दिवसांनी त्याचे कापड विक्रीसाठी तयार होते. त्यामुळे सूत खरेदी केलेला दर व कापड तयार झाल्यानंतर विक्री करताना त्याला बाजारात उपलब्ध झालेला दर यातील तफावत याचा हिशेब सर्वसामान्य यंत्रमागधारकाला लागत नसल्याने नेमका फायदा-तोटा समजून येत नाही.नफेखोरीचे एक उदाहरणकापूस कमोडिटी मार्केटमध्ये असल्यामुळे त्याचे दर वारंवार बदलत राहतात. कापसापासून सूत तयार होऊन ते बाजारात विक्रीसाठी येईपर्यंत मध्ये पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी जातो. असे असले तरी मार्केटमध्ये कापसाचा दर वाढला की काही सूत व्यापारी त्याचवेळी सुताचा दरही वाढवितात आणि कापसाचा दर कमी झाल्यास सूत संपले, असे सांगून दरवाढ झाल्यानंतर विक्री करतात. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यापार करणाºयांनाही याचा त्रास होतो. नफेखोरीचे हे छोटे उदाहरण आहे, असे या वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक टप्प्यांवर घडते.