शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दप्तरामुळं मुलांना येईल कुबड!

By admin | Updated: June 22, 2015 22:20 IST

डॉक्टरांचे मत : पाठीवरचे ओझे धोकादायकच; शाळा व्यवस्थापन समितीने यावर उपाय योजने गरजेचे -- लोकमत विशेष

सातारा : पूर्वी खांद्याला पिशवी अडकवून मुले शाळत जात होती; परंतु जसा काळ बदलला तशा फॅशनेबल सॅक आणि बॅगा बाझार पेठेत विक्रीस आल्या. या बॅगाबरोबरच मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझेही काळानुसार वाढत गेले; मात्र हे दप्तराचे ओझे अत्यंत धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पाठीवर दप्तर अडकविल्यानंतर शरीराचा समतोल साधण्यासाठी मुले पुढे झुकतात. त्यामुळे भविष्यात मुलांना अनेक त्रास उद्भवून कुबड काढून चालण्याची सवयही लागण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तिसरी ते चौथीमध्ये शिकत असलेल्या चिमुकल्या मुलांच्या पाठीवर भले मोठे दप्तराचे ओझे पाहून भल्याभल्यांना घाम फुटण्यासारखी सध्या परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी शहरातील विविध शाळेत जाऊन चक्क मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या चिमुकल्या मुलांच्या क्षमतेपेक्षा तब्बल २५ टक्के जास्त वजन त्यांच्या पाठीवर असल्याचे उघड झाले. या मुलांच्या पाठीवर अडीच ते तीन किलो वजन कटाकटीने पेलू शकते; परंतु अनेक मुलांच्या पाठीवर साडेचार ते साडेपाच किलो वजन असल्याचे दिसून आले. मुलांच्या पाठीवर नेमके वजन किती असावे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात, यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला असता सध्या मुलांच्या पाठीवर असलेले दप्तराचे ओझे धोकादायकच असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. पाठीवरील क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे पाठ दुखणे, थकवा येणे अशी लक्षणे जाणवू लागतात. लहान मुलांना ही लक्षणे जाणवतात; पंरतु त्यांना याविषयी सांगता येत नाही. त्यामुळे जसजसे वय वाढेल तसे मुलांच्या चालण्या-बसण्यात वेगळेपणा दिसतो. त्यामध्ये कुबड काढून चालणे, बसणे, वाकणे अशा मुलांना सवयी लागतात. आपण डोक्यावर वजन ठेवून उभे राहिलो तर गुरुत्वाकर्षण मध्यावर येतो. त्यामुळे समतोल राहतो. परिणामी शरीराला जास्त धोकादायक ठरत नाही; परंतु पाठीवर क्षेमतेपेक्षा जास्त ओझे घेतले तर चिमुकल्या मुलांना लहानपणापासूनच पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. (लोकमत चमू) मुलांची हमालासारखी स्थिती करू नका ! आपण बाजारपेठेमध्ये हमालांना गाड्यावरून माल वाहून नेताना पाहत असतो. हे हमाल त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त माल गाड्यावर ठेवतात. त्यामुळे त्यांना पुढे झुकून आणि वाकून चालावे लागते. या हमालांना भविष्यात पाठीचे आजार वाढत असल्याचे दिसून आले आहे. तशाचप्रकारे सध्याची चिमुकली मुलेही पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन एखाद्या हमालासारखी वाकलेली आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात या मुलांनाही अशाप्रकारचे आजार उद्भवू शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सॅक आणि आडवी बॅग पाठीवर अडकविल्यामुळे त्याचा भार मानेवर, मणक्यावर येतो. त्यामुळे मुलांना पाठ दुखणे, थकवा येणे, कुबड काढणे, माण दुखणे असे आजार उद्भवतात. त्यामुळे सहज पेलता यावं, असच वजन पाठीवर असावं. -डॉ. सुहास पोळ, (अस्थिरोग तज्ज्ञ)