शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

दप्तरामुळं मुलांना येईल कुबड!

By admin | Updated: June 22, 2015 22:20 IST

डॉक्टरांचे मत : पाठीवरचे ओझे धोकादायकच; शाळा व्यवस्थापन समितीने यावर उपाय योजने गरजेचे -- लोकमत विशेष

सातारा : पूर्वी खांद्याला पिशवी अडकवून मुले शाळत जात होती; परंतु जसा काळ बदलला तशा फॅशनेबल सॅक आणि बॅगा बाझार पेठेत विक्रीस आल्या. या बॅगाबरोबरच मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझेही काळानुसार वाढत गेले; मात्र हे दप्तराचे ओझे अत्यंत धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पाठीवर दप्तर अडकविल्यानंतर शरीराचा समतोल साधण्यासाठी मुले पुढे झुकतात. त्यामुळे भविष्यात मुलांना अनेक त्रास उद्भवून कुबड काढून चालण्याची सवयही लागण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तिसरी ते चौथीमध्ये शिकत असलेल्या चिमुकल्या मुलांच्या पाठीवर भले मोठे दप्तराचे ओझे पाहून भल्याभल्यांना घाम फुटण्यासारखी सध्या परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी शहरातील विविध शाळेत जाऊन चक्क मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या चिमुकल्या मुलांच्या क्षमतेपेक्षा तब्बल २५ टक्के जास्त वजन त्यांच्या पाठीवर असल्याचे उघड झाले. या मुलांच्या पाठीवर अडीच ते तीन किलो वजन कटाकटीने पेलू शकते; परंतु अनेक मुलांच्या पाठीवर साडेचार ते साडेपाच किलो वजन असल्याचे दिसून आले. मुलांच्या पाठीवर नेमके वजन किती असावे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात, यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला असता सध्या मुलांच्या पाठीवर असलेले दप्तराचे ओझे धोकादायकच असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. पाठीवरील क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे पाठ दुखणे, थकवा येणे अशी लक्षणे जाणवू लागतात. लहान मुलांना ही लक्षणे जाणवतात; पंरतु त्यांना याविषयी सांगता येत नाही. त्यामुळे जसजसे वय वाढेल तसे मुलांच्या चालण्या-बसण्यात वेगळेपणा दिसतो. त्यामध्ये कुबड काढून चालणे, बसणे, वाकणे अशा मुलांना सवयी लागतात. आपण डोक्यावर वजन ठेवून उभे राहिलो तर गुरुत्वाकर्षण मध्यावर येतो. त्यामुळे समतोल राहतो. परिणामी शरीराला जास्त धोकादायक ठरत नाही; परंतु पाठीवर क्षेमतेपेक्षा जास्त ओझे घेतले तर चिमुकल्या मुलांना लहानपणापासूनच पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. (लोकमत चमू) मुलांची हमालासारखी स्थिती करू नका ! आपण बाजारपेठेमध्ये हमालांना गाड्यावरून माल वाहून नेताना पाहत असतो. हे हमाल त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त माल गाड्यावर ठेवतात. त्यामुळे त्यांना पुढे झुकून आणि वाकून चालावे लागते. या हमालांना भविष्यात पाठीचे आजार वाढत असल्याचे दिसून आले आहे. तशाचप्रकारे सध्याची चिमुकली मुलेही पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन एखाद्या हमालासारखी वाकलेली आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात या मुलांनाही अशाप्रकारचे आजार उद्भवू शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सॅक आणि आडवी बॅग पाठीवर अडकविल्यामुळे त्याचा भार मानेवर, मणक्यावर येतो. त्यामुळे मुलांना पाठ दुखणे, थकवा येणे, कुबड काढणे, माण दुखणे असे आजार उद्भवतात. त्यामुळे सहज पेलता यावं, असच वजन पाठीवर असावं. -डॉ. सुहास पोळ, (अस्थिरोग तज्ज्ञ)