शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

बससेवेविना वस्त्रनगरीत सर्वसामान्यांची परवड

By admin | Updated: November 12, 2014 23:27 IST

वृद्ध, लहान मुले, महिलांचे हाल : पर्यावरणासाठी आणि सर्वांसाठी उपयोगी

राजाराम पाटील : इचलकरंजी ::सर्वसामान्यांबरोबर मध्यमवर्गीय, श्रीमंत वर्ग यांना परवडणारी, पर्यावरणासाठी महत्त्वाची, वृद्धांबरोबर लहान मुले आणि विशेषत: महिला वर्गासाठी अनन्यसाधारण उपयोगाची शहर बस वाहतूक सेवा वीस वर्षांपूर्वी बंद पडली. त्यानंतर वस्त्रोद्योगाच्या विकासाबरोबर वाढत्या व्यापामुळे शहराची लोकसंख्या दुप्पट होऊन तीन लाख झाली; पण चर्चेपलीकडे शहर बस वाहतुकीकडे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेच नाही.वस्त्रोद्योगासाठी व बाजारपेठेमुळे आणि माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणामुळे आसपासच्या पन्नास-साठ खेडेगावांचा दैनंदिन संपर्क आहे. या गावांतील साठ-सत्तर हजार लोक दररोज ये-जा करीत असतात. सध्या असलेली एसटी बस वाहतूक तुटपुंजी असल्याने लोकांना वडाप आॅटोरिक्षाचा वापर करावा लागतो. आॅटोरिक्षामध्ये ‘वडाप’ नावाप्रमाणेच प्रवासी माणसांना कोंबून बसविले जाते. ६ आसनी रिक्षामधून १०-१२ माणसांचे वडाप होते. त्यामध्ये लहान मुले व स्त्रियांचे हाल होतात.वीस वर्षांपूर्वी एसटीने कबनूर ते यड्राव सूतगिरणी आणि आयको स्पिन (शिरदवाड) ते कोरोची अशा मार्गांवर काही वर्षे शहर वाहतूक सेवा चालविली. मात्र, तत्कालीन बस वाहतूक तोट्यात जाऊ लागल्याने वाहतुकीतील नुकसानीची रक्कम इचलकरंजी नगरपालिकेने द्यावी, अशी मागणी एसटीने केली आणि नुकसानीची रक्कम त्यावेळी पालिका देतही असे; पण नगरपालिकाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने नुकसानीची रक्कम देणे पालिकेने बंद केले. त्यानंतर एसटीने रडतखडत काही महिने शहर बससेवा चालविली आणि बंद केली. त्याला वीस वर्षे उलटली.या वीस वर्षांत इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा विकास झाला. उद्योगधंद्यांच्या वाढत जाणाऱ्या व्यापाबरोबर लोकसंख्याही वाढली. शहरातील राहणीमान महाग असल्याने तुलनेने स्वस्त असलेल्या आसपासच्या २५ ते ३० खेडेगावांत कामगार-कष्टकरी-नोकरदार राहतात आणि तेथून दररोज येथे येतात आणि परत जातात. अशांची संख्या साठ-सत्तर हजार आहे. तर खुद्द इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाख आहे. त्यापैकी बहुतांश कामगार वर्ग असल्याने त्यांना शहर वाहतूक सेवा परवडणारी आहे. त्यामुळे शहर बस वाहतूक सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. (समाप्त)आसपासच्या खेडेगावांतही वस्त्रोद्योगयेथील उद्योगधंद्यासाठी कामगार, नोकरदार दररोज इचलकरंजीत येतात. त्याप्रमाणे आसपासच्या कबनूर, रुई, तिळवणी, साजणी, चंदूर, जंगमवाडी, रांगोळी, रेंदाळ, माणकापूर, बोरगाव, लाट, शिरदवाड, शिवनाकवाडी, शिरढोण, टाकवडे, यड्राव, तारदाळ, खोतवाडी, कोरोची, हातकणंगले, आदी गावांमध्ये यंत्रमाग, सायझिंग व तत्सम उद्योगांचे कारखाने झाले आहेत. त्यांचीही दररोजची वाहतूक इचलकरंजीस असते.शहर बससेवेचे मार्ग१) मजले, तारदाळ, खोतवाडी, यड्राव (पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट)२) शिरढोण-टाकवडे.३) अब्दुललाट (लाटवाडी), शिरदवाड, शिवनाकवाडी (आयको स्पिन).४) हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी, माणकापूर.५) पट्टणकोडोली, इंगळी, रुई, कबनूर.६) माणगाव, नवमहाराष्ट्र, साजणी, तिळवणी.७) हातकणंगले, हातकणंगले रेल्वे स्टेशन, कोरोची, गंगानगर.८) लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, तिळवणी, कबनूर.९) तारदाळ, शहापूर.१०) चंदूर, आभार फाटा-कलानगर.