शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

‘दत्त-आसुर्ले’चे वादंग म्हणजे चर्चेचेच गुऱ्हाळ

By admin | Updated: August 16, 2016 23:30 IST

स्वहिताच्या राजकारणात रस : कोरे-पाटील वादाने मित्रपक्षात राजकीय सुरूंग

सरदार चौगुले-- पोर्ले तर्फ ठाणे --मित्र पक्षात एकमेकांवर राजकीय चिखलफेक करणे राजकीय सारीपाठावर काही नवीन नाही. पन्हाळा तालुक्यातील दत्त (आसुर्ले-पोर्ले) साखर कारखान्यातील व्याजाच्या रकमेवरून सुरू असलेली जिल्हा बँकेतील दोन नेत्यांमधील वादंग म्हणजे निव्वळ चर्चा होय. कारखान्याच्या इतिहासात ज्या काही घडामोडी घडल्या, नी त्या कुणी कशा घडवून आणल्या आणि त्याचे परिणाम कोणाकोणाला भोगावे लागले? याची परिसीमा सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे कारखान्याच्या वादाचे गुऱ्हाळ करण्यापेक्षा स्वहिताचं राजकारण बळकट करण्यात समरसता दाखवावी, अशी चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.१९८३ साली बिरदेवाच्या माळावर उदयाला आलेला दत्त साखर कारखान्याला लोकाश्रयाऐवजी राजाश्रय मिळाला. विकासाचा केंद्रबिंदू होण्याऐवजी राजकीय अड्डा बनला. तालुक्यातील गावागावांत गटातटाच्या राजकारणाला येथूनच सुरूंग लावले जाऊ लागले. त्यामुळे कारखान्याच्या राजकारणात विरोधाला विरोध न राहता एकमेकांना राजकारणात संपविण्याचा राजकर्त्यांनी विडाच उचलला होता. त्याचे परिणामही या नेत्यांनी अलीकडच्या राजकारणात भोगले आहेत. कारखान्याच्या इतिहासात राजकीय कुरघोडीचे राजकारण कसे पेटत गेले आणि राजकीय सोयीसाठी ताब्यात असणाऱ्या कारखान्याची सूत्रे हातोहात कशी गेली. त्यातून भोगाव्या लागणाऱ्या राजकीय द्वेषातूनच कारखान्याच्या कर्र्जावरील व्याजाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.नियोजनाचा अभाव आणि कर्जबाजारीपणाच्या कारणास्तव दिवाळखोरीत काढलेला कारखाना पुढील काळात स्पष्ट झाला. एका नेत्याने कर्जबाजारीपणामुळे कारखाना सोडला, तर दुसऱ्या नेत्याने राजकीय प्रतिष्ठा लावून राजकीय सोयीसाठी हस्तगत केला. दोन्ही नेत्यांनी आपले इप्सित साधले. कारखान्याच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजताभाजता प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पराभवाचे चटके इथल्या जनतेने दिले. पराभव दोन्ही नेत्यांच्या जिव्हारी लागला होता. वारणेला कर्ज देण्यात अडसर बनलेल्या बाबासाहेब पाटील आसुर्लेकरांना विरोध म्हणून विनय कोरे यांनी दत्त कारखान्याचे ६० कोटी वसुलीचा बँकेच्या बैठकीत रेटा लावून पाटील-कोरे वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला. कारखान्याच्या प्रश्नावर कितीही चिखलफेक केली तरी कारखान्याची वाताहत कोणी कशी केली? ते इथल्या जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे मित्रपक्षात राहून राजकीय ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात दोघांचे हित आहे. शेतकऱ्यांचा कारखाना : कर्जाच्या खाईतशेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभा केलेला कारखाना कर्जाच्या खाईत लोटला जाऊन नियोजनाच्या अभावामुळे पुरता बुडाला. कोटींचा डबरा भरून काढायला कारखान्यावर दिवाळखोरीसारखी नामुष्की लादली आणि कारखानाच लिलाव काढून तो बुजवला. हत्ती गेला आणि शेपटीसाठी तालुक्यातील मित्रपक्षातील नेत्यांचं जिल्हा बँकेत आरोप-प्रत्यारोपाचं गुऱ्हाळ चालू आहे.