शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

‘उत्तर’मध्ये काँग्रेसचा शिवसेनेला ‘बोनस’

By admin | Updated: October 22, 2014 00:26 IST

सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, विविध आंदोलनातील सक्रिय भागीदारी आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवल्याची पोचपावती

भारत चव्हाण - कोल्हापूर -सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, विविध आंदोलनातील सक्रिय भागीदारी आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवल्याची पोचपावती म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांचा विजय, असेच वर्णन कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणुकीचे करावे लागेल. क्षीरसागर यांच्या विजयाला काँग्रेसअंतर्गत काही गटांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी हातभार लावल्यानेच त्यांचा विजय तर सुकर झालाच शिवाय २४ हजारांचे मताधिक्य मिळवून शिवसेनेने आपला गडही मजबूत केला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नाराज गटांची मदत क्षीरसागर यांना ‘बोनस’ ठरली.कोल्हापूर उत्तरची निवडणूक तशी काँग्रेसला एक वर्षापूर्वीपासून सोपी झाल्याचा दावा करण्यात येत होता; परंतु त्यांच्याकडे मातब्बर उमेदवारच नसल्याने हा दावा चुकीचा ठरला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर सत्यजित कदम यांचे नाव आपसूक च पुढे आले. त्यांनीही दोन वर्षांपासून तयारी केली होती. टोलच्या आंदोलनात भाग घेऊन जनतेच्या प्रश्नावर लढत राहिले; परंतु त्यांचा हेतू मतदारांना स्पष्ट माहीत होता. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कदम सक्रिय झाले. ‘कोल्हापूर उत्तर’मतदारसंघाचे राजकारण ‘कोल्हापूर दक्षिण’च्या मतदारसंघात गुंफले गेल्याने काँग्रेस व सत्यजित कदम यांच्यासमोर अडचणी वाढत गेल्या. महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम यांना सतेज पाटील यांचा होणारा विरोध स्वाभाविक होता. बहुतांशी नगरसेवक कदम यांच्या प्रचारापासून दूर राहिले. शेवटी-शेवटी तर अनेकांनी उघडपणे क्षीरसागर यांची पाठराखण केली. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात एकप्रकारची लाट जनतेत तयार झाली होती. त्याचा मोठा फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. आर. के. पोवार यांनी प्रचारात आघाडी घेऊनही त्यांना जनतेने साथ दिली नाही. भाजपच्या महेश जाधव यांनी पहिल्या प्रयत्नात चांगली मते घेतली असली तरी हा मोदींचा करिश्मा होता.क्षीरसागर यांनी टोल आणि एलबीटीच्या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग हा लोणच्यासारखा होता. त्याचा पुरता फायदा क्षीरसागर यांनी घेतला. एलबीटीच्या आंदोलनातही त्यांना व्यापारीवर्गाची मोठी सहानुभूती मिळाली. त्यामुळे क्षीरसागर यांची मतदारसंघावरील पकड अधिक मजबूत झाली आणि पक्षांतर्गत विरोधही मावळला. ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू होती. भाकप, माकप, शेकाप व जनता दल अशा डाव्या पक्षांची एकेकाळी असलेली मोट विस्कळीत झाल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. सामान्य माणसांसाठी नेहमी रस्त्यावर असलेल्या या पक्षांना तुम्ही आता राजकारण करूच नका, असेच मतदारांनी सुचवायचे आहे की काय असे वाटण्यासारखी मते या पक्षाच्या उमेदवारांना मिळाली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजप शिवसेनेला मतदार स्वीकारत आहेत, परंतु डाव्यांना स्वीकारायची तयारी नाही. भाकपच्या रघुनाथ कांबळे व शेकापच्या मनीष महागांवकर यांना मिळालेल्या मतांवरूनच हे स्पष्ट झाले आहे.