शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तर’मध्ये काँग्रेसचा शिवसेनेला ‘बोनस’

By admin | Updated: October 22, 2014 00:26 IST

सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, विविध आंदोलनातील सक्रिय भागीदारी आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवल्याची पोचपावती

भारत चव्हाण - कोल्हापूर -सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, विविध आंदोलनातील सक्रिय भागीदारी आणि सातत्याने जनतेशी संपर्क ठेवल्याची पोचपावती म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांचा विजय, असेच वर्णन कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणुकीचे करावे लागेल. क्षीरसागर यांच्या विजयाला काँग्रेसअंतर्गत काही गटांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी हातभार लावल्यानेच त्यांचा विजय तर सुकर झालाच शिवाय २४ हजारांचे मताधिक्य मिळवून शिवसेनेने आपला गडही मजबूत केला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नाराज गटांची मदत क्षीरसागर यांना ‘बोनस’ ठरली.कोल्हापूर उत्तरची निवडणूक तशी काँग्रेसला एक वर्षापूर्वीपासून सोपी झाल्याचा दावा करण्यात येत होता; परंतु त्यांच्याकडे मातब्बर उमेदवारच नसल्याने हा दावा चुकीचा ठरला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर सत्यजित कदम यांचे नाव आपसूक च पुढे आले. त्यांनीही दोन वर्षांपासून तयारी केली होती. टोलच्या आंदोलनात भाग घेऊन जनतेच्या प्रश्नावर लढत राहिले; परंतु त्यांचा हेतू मतदारांना स्पष्ट माहीत होता. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कदम सक्रिय झाले. ‘कोल्हापूर उत्तर’मतदारसंघाचे राजकारण ‘कोल्हापूर दक्षिण’च्या मतदारसंघात गुंफले गेल्याने काँग्रेस व सत्यजित कदम यांच्यासमोर अडचणी वाढत गेल्या. महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम यांना सतेज पाटील यांचा होणारा विरोध स्वाभाविक होता. बहुतांशी नगरसेवक कदम यांच्या प्रचारापासून दूर राहिले. शेवटी-शेवटी तर अनेकांनी उघडपणे क्षीरसागर यांची पाठराखण केली. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात एकप्रकारची लाट जनतेत तयार झाली होती. त्याचा मोठा फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. आर. के. पोवार यांनी प्रचारात आघाडी घेऊनही त्यांना जनतेने साथ दिली नाही. भाजपच्या महेश जाधव यांनी पहिल्या प्रयत्नात चांगली मते घेतली असली तरी हा मोदींचा करिश्मा होता.क्षीरसागर यांनी टोल आणि एलबीटीच्या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग हा लोणच्यासारखा होता. त्याचा पुरता फायदा क्षीरसागर यांनी घेतला. एलबीटीच्या आंदोलनातही त्यांना व्यापारीवर्गाची मोठी सहानुभूती मिळाली. त्यामुळे क्षीरसागर यांची मतदारसंघावरील पकड अधिक मजबूत झाली आणि पक्षांतर्गत विरोधही मावळला. ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू होती. भाकप, माकप, शेकाप व जनता दल अशा डाव्या पक्षांची एकेकाळी असलेली मोट विस्कळीत झाल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. सामान्य माणसांसाठी नेहमी रस्त्यावर असलेल्या या पक्षांना तुम्ही आता राजकारण करूच नका, असेच मतदारांनी सुचवायचे आहे की काय असे वाटण्यासारखी मते या पक्षाच्या उमेदवारांना मिळाली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजप शिवसेनेला मतदार स्वीकारत आहेत, परंतु डाव्यांना स्वीकारायची तयारी नाही. भाकपच्या रघुनाथ कांबळे व शेकापच्या मनीष महागांवकर यांना मिळालेल्या मतांवरूनच हे स्पष्ट झाले आहे.