शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

ऊसदर देण्यावरुन कारखानदारांत स्पर्धा

By admin | Updated: December 31, 2014 00:37 IST

अन्य जिल्हे मागे : कोल्हापूरला जमते, मग तुम्ही का देत नाही ?

विश्वास पाटील - कोल्हापूर -राज्यभरातील सगळे सहकारी व खासगी साखर कारखानदार आम्हाला एफआरपीएवढाही दर द्यायला परवडत नाही, असे टाहो फोडून सांगत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांत मात्र एफआरपी व त्याहून जास्त दर देण्याचीच स्पर्धा लागली आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या तेरापैकी तब्बल आठ कारखान्यांनी एफआरपी किंवा त्याहून जास्त उचल जाहीर केली आहे. ‘एफआरपी’ची पहिली उचल देण्याची कायदेशीर भीती, निवडणुकीचे राजकारण व राज्यात सत्तांतर झाल्याने कारखानदारीस पुरेसे संरक्षण मिळणार नाही, या भीतीपोटी हे दर देण्यात येत आहेत. ‘कोल्हापूरने एफआरपी दिल्याने तुम्हाला काय धाड मारली काय?’ अशी विचारणा सांगली, सातारा, सोलापूरसह राज्यांतील अन्य जिल्ह्यातील शेतकरी कारखानदारांना करीत आहेत.खुल्या बाजारातील साखरेचा आज, मंगळवारचा क्विंटलचा दर सरासरी २४५० रुपये आहे. त्यामुळे टनाला दोन हजार देतानाही कारखानदारांच्या तोंडाला फेस येणार आहे; परंतु तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांत मात्र दर जाहीर करण्यात छुपी स्पर्धाच लागली आहे. हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आल्यावर आता कारखानदार दर जाहीर करू लागले आहेत. यंदाच्या हंगामात ‘एफआरपी’एवढी पहिली उचल देण्याची राज्यात पहिली घोषणा कागलच्या शाहू साखर कारखान्याने केली. त्या कारखान्याचे आर्थिक नियोजन चांगले असल्यामुळे त्यांना ही उचल देणे शक्य होत आहे; परंतु अन्य कारखान्यांची स्थिती तशी नाही. बहुतेक कारखानदार ‘आजचे मरण उद्यावर’ या न्यायाने केंद्र शासनाकडून किमान बिनव्याजी कर्ज मिळेल, या आशेवर हा ऊसदर जाहीर करीत आहेत. महिन्याचे गाळप करून, क्लब करून पंधरा दिवसांची बिले द्यायची असा व्यवहार सध्या सुरू आहे. केंद्र शासनाकडून पॅकेज न मिळाल्यास बहुतांश कारखान्यांची शेवटच्या महिन्यातील बिले मिळणे मुश्कील आहे. जवाहर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. कुंभी-कासारी, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे परवडत नसतानाही दराच्या स्पर्धेत राहण्यासाठी या कारखान्यांनी दर जाहीर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आहे.‘वारणा’ सगळ्यांत मागेराज्याच्या साखर कारखानदारीत नेहमीच दरापासून सगळ्यांच बाबतीत पहिल्या पाचमध्ये असणाऱ्या वारणा कारखान्याने यंदा अजून दरही जाहीर केलेला नाही व गाळप उसाची बिलेही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत.