शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर देण्यावरुन कारखानदारांत स्पर्धा

By admin | Updated: December 31, 2014 00:37 IST

अन्य जिल्हे मागे : कोल्हापूरला जमते, मग तुम्ही का देत नाही ?

विश्वास पाटील - कोल्हापूर -राज्यभरातील सगळे सहकारी व खासगी साखर कारखानदार आम्हाला एफआरपीएवढाही दर द्यायला परवडत नाही, असे टाहो फोडून सांगत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांत मात्र एफआरपी व त्याहून जास्त दर देण्याचीच स्पर्धा लागली आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या तेरापैकी तब्बल आठ कारखान्यांनी एफआरपी किंवा त्याहून जास्त उचल जाहीर केली आहे. ‘एफआरपी’ची पहिली उचल देण्याची कायदेशीर भीती, निवडणुकीचे राजकारण व राज्यात सत्तांतर झाल्याने कारखानदारीस पुरेसे संरक्षण मिळणार नाही, या भीतीपोटी हे दर देण्यात येत आहेत. ‘कोल्हापूरने एफआरपी दिल्याने तुम्हाला काय धाड मारली काय?’ अशी विचारणा सांगली, सातारा, सोलापूरसह राज्यांतील अन्य जिल्ह्यातील शेतकरी कारखानदारांना करीत आहेत.खुल्या बाजारातील साखरेचा आज, मंगळवारचा क्विंटलचा दर सरासरी २४५० रुपये आहे. त्यामुळे टनाला दोन हजार देतानाही कारखानदारांच्या तोंडाला फेस येणार आहे; परंतु तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांत मात्र दर जाहीर करण्यात छुपी स्पर्धाच लागली आहे. हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आल्यावर आता कारखानदार दर जाहीर करू लागले आहेत. यंदाच्या हंगामात ‘एफआरपी’एवढी पहिली उचल देण्याची राज्यात पहिली घोषणा कागलच्या शाहू साखर कारखान्याने केली. त्या कारखान्याचे आर्थिक नियोजन चांगले असल्यामुळे त्यांना ही उचल देणे शक्य होत आहे; परंतु अन्य कारखान्यांची स्थिती तशी नाही. बहुतेक कारखानदार ‘आजचे मरण उद्यावर’ या न्यायाने केंद्र शासनाकडून किमान बिनव्याजी कर्ज मिळेल, या आशेवर हा ऊसदर जाहीर करीत आहेत. महिन्याचे गाळप करून, क्लब करून पंधरा दिवसांची बिले द्यायची असा व्यवहार सध्या सुरू आहे. केंद्र शासनाकडून पॅकेज न मिळाल्यास बहुतांश कारखान्यांची शेवटच्या महिन्यातील बिले मिळणे मुश्कील आहे. जवाहर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. कुंभी-कासारी, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे परवडत नसतानाही दराच्या स्पर्धेत राहण्यासाठी या कारखान्यांनी दर जाहीर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आहे.‘वारणा’ सगळ्यांत मागेराज्याच्या साखर कारखानदारीत नेहमीच दरापासून सगळ्यांच बाबतीत पहिल्या पाचमध्ये असणाऱ्या वारणा कारखान्याने यंदा अजून दरही जाहीर केलेला नाही व गाळप उसाची बिलेही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत.