शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी कृषी विधेयकावर टीकाटिप्पणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST

सेनापती कापशी) महाविकास आघाडी सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले शब्द पाळता येत नसल्यामुळे अपयशी ठरले आहे. दिलेली आश्वासने ...

सेनापती कापशी)

महाविकास आघाडी सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले शब्द पाळता येत नसल्यामुळे अपयशी ठरले आहे. दिलेली आश्वासने न पाळता शेतकऱ्यांची दिशाभूल हे सरकार करीत आहे. हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचे असलेल्या केंद्राच्या कृषी विधेयकावर ते टीका-टिप्पणी करीत आहेत, असा घणाघाती आरोप शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला.

आलाबाद (ता. कागल) येथील इनामदार मळ्यात चिकोत्रा खोऱ्यातील शेतकऱ्यांशी शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकारमधील जबाबदार मंत्री आश्वासन देतात तरीही शेतकरी व सर्वसामान्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र, शेतकरी व सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची पै-आणि पै मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत लढत राहणार आहे. असा विश्वासही घाटगे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.

किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळच नाही. समरजित घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या शेतकरी संवाद कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष उमेश देसाई, मनसेचे तालुकाध्यक्ष आनंदराव गुरव, भिकाजी तिप्पे, सागर मोहिते, दिलीप तिप्पे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, शाहू साखरेच्या माजी संचालिका बेबी करडे, महिला भाजप तालुका अध्यक्ष विद्या करडे, कर्नल शिवाजीराव बाबर, राजाभाऊ माळी, संजय बरकाळे उपस्थित होते.

फोटो :- आलाबाद (ता. कागल) येथे जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रमात बोलताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे.