शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहराची हद्दवाढ ‘विश्वासात’ अडकली

By admin | Updated: June 27, 2015 00:55 IST

प्रश्न सुटणार कसा : ‘मनपा’ची डागाळलेली प्रतिमाच विरोधाला कारणीभूत; गावापेक्षा नेत्यांची समजूत काढणे महत्त्वाचे

राजाराम लोंढे - कोल्हापू -महापालिकेची डागाळलेली प्रतिमा, सुविधांची वानवा यामुळेच ग्रामीण जनता शहरात येण्यास उत्सुक नाही. गावांचा विरोध आहे, म्हणूनच नेत्यांचाही हद्दवाढीस राजकीय विरोध आहे. यासाठी पालिका प्रशासनाबरोबर राजकीय नेत्यांनी ग्रामीण जनतेमध्ये विकासाचा विश्वास निर्माण करण्याची खरी गरज आहे. तसे केले तरच हद्दवाढीचा गुंता सुटू शकतो; अन्यथा ग्रामीण व शहरी संघर्ष अटळ आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न गेले अनेक वर्षे भिजत पडला आहे. १९९० ला महापालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. मुळात हद्दवाढीबाबत येथून पाठीमागे महापालिका प्रशासनाचे अपुरे पडलेले प्रयत्न व राजकीय उदासीनता यामुळे हा प्रश्न तब्बल २५ वर्षे लोंबकळत पडला आहे. आता नव्याने शहरातील राजकीय मंडळींच्या नेत्यांनी हद्दवाढीसाठी जोर धरला आहे. विस्तारित हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने शासनाकडे सादर करून ताकद लावली आहे. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ करणे हे गरजेचे आहे, याबाबत कोणालाच दुमत नाही; पण केवळ एकतर्फी प्रयत्न सुरू करणे योग्य होणार नाहीत. पहिल्यांदा ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. शहरातील जनताच महापालिकेच्या कारभारावर नाराज आहे, हा संदेश ग्रामीण जनतेपर्यंत अगोदरच पोहोचला आहे. त्यामुळे आमचा चाललेला गाडा बरा, अशी ग्रामीण जनतेची भूमिका आहे. याला कारणीभूतही महापालिकेचे प्रशासनच आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी पहिल्यांदा हद्दवाढ झाली तर नेमके ग्रामीण जनतेसह मूळ शहराला काय फायदे होणार, हे सांगणे गरजेचे आहे. तसे न करता शहरातील नेत्यांनी एकदम गावे ताब्यात घेण्याची मोहीम उघडली आहे. केवळ महापालिकेला केंद्रातून निधी मिळणार, या एकमेव उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. एकतर्फी भूमिका घेऊन शहरातील कृती समितीने हद्दवाढीचा हट्ट धरला आहे. त्यामुळे त्याचे ग्रामीण भागात पडसाद उमटणे साहजिकच आहे. यासाठी ग्रामीण जनतेमध्ये विकासाचा विश्वास निर्माण करून हद्दवाढीसाठी प्रयत्न केले, तरच हा गुंता सुटू शकतो; अन्यथा ग्रामीण व शहरी संघर्ष अटळ आहे. ग्रामीण जनतेचा विरोध का?पाणी महागणार - ग्रामपंचायतीची वर्षाची पाणीपट्टी महापालिकेला महिन्याला द्यावी लागणार.घरफाळा - दुप्पट होणार उपजीविकेचे साधन असणाऱ्या शेती व जनावरांवर गंडांतर ग्रामीण बाज संपुष्टात येणार ढपला संस्कृतीने विकास होणार का, याविषयी साशंकता पैसे दिले तरी सुविधा मिळण्याची खात्री नाहीशहरात आल्यावर काय फायदा होणार गावांना शिस्त लागेलपरिसराचा विकास होण्यास मदत अंगणवाडी, बगीचा, शाळांना जागा आरक्षितअस्थाव्यस्त बांधकामांवर पायबंद येणार बस, रस्ते, भुयारी गटारी, विजेची सोयविरोध करणारे नेतेच शहरातहद्दवाढीला आमदार चंद्रदीप नरके, पी. एन. पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक या नेत्यांचा थेट विरोध आहे, तर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचीही मानसिकता तशीच आहे. परंतु, महाडिक वगळता हे सर्वच नेते कोल्हापूर शहरात राहतात, हे वैशिष्ट्य आहे.हद्दवाढीशिवाय शहराचा विकास नाही : हसन मुश्रीफहद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही; त्यामुळे एक किलोमीटरच्या परिघात होणाऱ्या हद्दवाढीला विरोध असण्याचे कारण नाही. कारण शहरानजीक असणाऱ्या गावांना महापालिकेच्या सर्व सुविधांचा लाभ होतो. त्यामुळे हद्दवाढीला आपला पाठिंबा राहील, असे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला सांगितले.मुश्रीफ म्हणाले, हद्दवाढीसंदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न झाले पाहिजेत. शहराच्या एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांना महापालिकेच्या सुविधांचा लाभ होतो. त्यामुळे तेथील जमिनींचे भावही वाढले आहेत. शहराची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून शहराच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीसाठी लोकसंख्या हा निकष आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहर बसत नाही. यासाठी हद्दवाढ गरजेची असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी विकासासाठी उपलब्ध होणार आहे. हद्दवाढीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना सुरुवातीची पाच वर्षे घरफाळा नसतो, तसेच इतर आनुषंगिक करांची वाढही करता येत नाही. हद्दवाढ होणे गरजेचे आहे.