शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

‘गोकुळ’मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच आघाडीला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये महाविकास आघाडी आकारास येत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तारूढ गटाला देऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये महाविकास आघाडी आकारास येत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तारूढ गटाला देऊ केलेल्या पाठिंब्याने एक प्रकारे खो बसला. एकीकडे सचिन वाझे प्रकरणात प्रदेशाध्यक्ष पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणत असताना या घडामोडीने बिघाडी झाली. शिवसेनेला किती जागा मिळतात यापेक्षा विरोधी आघाडीसोबत जाण्याचे फर्मान थेट ‘मातोश्री’वरून आल्याने अनेकांची गोची झाली.

राज्यात अनपेक्षितपणे सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेच बदलून गेली आहेत. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्याने काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतृत्व त्यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाविकास आघाडी आकारास यावी, यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे पहिल्यापासून प्रयत्नशील होते. काॅंग्रेस, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन तगडी आघाडीची बांधणी सुरू होती. त्यासाठी त्यांनी सर्वच नेत्यांची चर्चा सुरू केली. मात्र, ही चर्चा सुरू असताना सत्तारूढ गटाचे संचालक प्रचारात सक्रिय होते. त्यात सत्तारूढ गटाकडून राष्ट्रवादीला दोन व पालकमंत्री सतेज पाटील यांना एका जागांची ऑफर दिली. मागील निवडणुकीत संपुर्ण पॅनेल उभे करून दोन जागांवर विजयी मिळवणाऱ्या मंत्री पाटील यांच्या हा प्रस्ताव चांगलाच जिव्हारी लागल्याने आघाडीमधील दरी रूंदावत गेली.

राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. विरोधी भाजप सरकारला घेरण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. कोल्हापूरात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषद घेत वाझे प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचवेळी ‘गोकुळ’ मध्ये आपण सत्तारूढ गटाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. येथेच महाविकास आघाडीला ‘खो’ बसला. त्यानंतर राज्य पातळीवर वेगाने घडामोडी घडत गेल्या. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणत्याही परिस्थितीत ‘गोकुळ’ काॅंग्रेसच्या ताब्यात राहिला पाहिजे, असे फर्मान पक्षाच्या नेत्यांना काढले.

संजय घाटगे यांची गोची

कोणत्याही परिस्थितीत ‘गोकुळ’मध्ये भाजपला जवळ करायचे नाही, असा आदेश ‘मातोश्री’वरून आहे. त्यानुसार माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी सत्तारूढ गटाची साथ सोडली. मात्र माजी आमदार संजय घाटगे हे त्यांच्यासोबतच राहिल्याने गोची होण्याची शक्यता आहे.