शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उपसाबंदीमुळे उसाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: November 9, 2016 23:28 IST

आर्थिक फटका बसणार : कुंभी-कासारी, भोगावती, राजाराम, डी. वाय. पाटील कारखान्यांना यंदाच्या हंगामात ऊसटंचाईचा प्रश्न भेडसावणार

शिवराज लोंढे -- सावरवाडी -गतवर्षी कमी पावसाचा परिणाम म्हणून पंचगंगा, भोगावती नदीपात्रातून पाणी उपसावर निर्बंध घातले गेले होते. पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न शेती व्यवसायासमोर उभा होता. याचा गंभीर परिणाम गतवर्षी ऐन उन्हाळा हंगामात ऊस पिकांना सोसावा लागला. पाण्याअभावी ऊसपिके करपून गेली होती. पंचगंगा-भोगावती नदीतीरावरील शेतीतून यावर्षी साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामात आठ लाख ऊस टन घटणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका बसणार हे सत्य आहे.पाटबंधारे खात्याने गतवर्षी पंचगंगा नदीवर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१६ या हंगामात पाणी उपसा बंदी जारी केली होती, तर भोगावती नदीवर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत उपसा बंदी होती. मे महिन्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई सर्वत्र निर्माण झाल्याने शेतीपिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसला होता. शेतकऱ्यांना शेतीपिकांना पाणी मिळण्यासाठी फार यातना सोसाव्या लागल्या. सहकारी पाणीपुरवठा संस्थांद्वारे शेतीपिकांना पाणी मिळाले नसल्याने ऊसपिकांचे खोडवा, बोडवा, आडसाली लागण यांचे मोठ्या प्रमाणात वाळून नुकसान झाले. शेतकऱ्यांनी वाळलेली ऊसपिके काढून टाकली, तर अनेक भागांत टँकरद्वारे ऊसपिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती, पण मे व जून महिन्यात पाऊस अपेक्षित पडला नसल्यामुळे ऊसपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.५ नोव्हेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांचे धुराडे पेटल्याने साखर कारखान्यांकडून गतवर्षी पंचगंगा व भोगावती नदीकाठ परिसरात पाण्याअभावी वाळून गेलेल्या ऊसपिकांची अगोदर उचल होणे गरजेचे आहे. गतवर्षी उन्हाळा हंगामात पाणीपुरवठा न झाल्याने नदीकाठच्या शेतीमध्ये ऊस वजनात यंदा कमालीची घट होणार हे सत्य आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामावरही परिणाम होणार आहे. नदीकाठच्या परिसरात उसाचे उत्पादन घटले जाणार असून, त्याचा यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.पाणी उपसाबंदीमुळे ऊस उत्पादन घटणार असल्याने रासायनिक खते, पाणीपट्टी, मशागत, भांगलण खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. शेतीला पाणीच मिळाले नसल्यामुळे ऊसपिके वाळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गतवर्षी उन्हाळा हंगामातील पाणीटंचाईमुळे ऊस शेती पिकांचा राज्य शासनातर्फे सर्व्हे केला नसल्यामुळे वाळलेल्या पिकांना विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळणार तरी केव्हा, हा प्रश्न निर्माण होऊ लागला. शेतीपिकातून झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? पाणीपट्टी माफ होणार का? यासारख्या प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.साधारणत: भोगावती पंचगंगा नदीकाठच्या परिसरातील कुंभी-कासारी, भोगावती, राजाराम, डी. वाय. पाटील या साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊसटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची गाळपक्षमताही घटणार आहे. शेती व्यवसायासमोर सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. बागायत शेतीला मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शेतीपिकांना पाणीटंचाईची झळ चांगलीच बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी नदीकाठच्या परिसरात ऊसटंचाई भासणार असून, साखर कारखान्यांनी नदीकाठच्या शेतीला जादा भाव देणे गरजेचे आहे.- शंकरराव पाटील, अध्यक्ष, करवीर तालुका काँग्रेस उन्हाळा ऋतुमध्ये शेतीपिकांना पाणी मिळाले नसल्याने राज्य शासनाने नदीकाठच्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी रद्द करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लढा उभारावा.- राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य, करवीर पंचायत समितीपाणीपट्टी रद्द मागणीसाठी लढ्याची गरज उन्हाळा ऋतुमध्ये पाणीटंचाईचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला. ऊसपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी रद्द करण्याच्या मागणीचा लढा उभारणे गरजेचे आहे.