शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

उपसाबंदीमुळे उसाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: November 9, 2016 23:28 IST

आर्थिक फटका बसणार : कुंभी-कासारी, भोगावती, राजाराम, डी. वाय. पाटील कारखान्यांना यंदाच्या हंगामात ऊसटंचाईचा प्रश्न भेडसावणार

शिवराज लोंढे -- सावरवाडी -गतवर्षी कमी पावसाचा परिणाम म्हणून पंचगंगा, भोगावती नदीपात्रातून पाणी उपसावर निर्बंध घातले गेले होते. पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न शेती व्यवसायासमोर उभा होता. याचा गंभीर परिणाम गतवर्षी ऐन उन्हाळा हंगामात ऊस पिकांना सोसावा लागला. पाण्याअभावी ऊसपिके करपून गेली होती. पंचगंगा-भोगावती नदीतीरावरील शेतीतून यावर्षी साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामात आठ लाख ऊस टन घटणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका बसणार हे सत्य आहे.पाटबंधारे खात्याने गतवर्षी पंचगंगा नदीवर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१६ या हंगामात पाणी उपसा बंदी जारी केली होती, तर भोगावती नदीवर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत उपसा बंदी होती. मे महिन्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई सर्वत्र निर्माण झाल्याने शेतीपिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसला होता. शेतकऱ्यांना शेतीपिकांना पाणी मिळण्यासाठी फार यातना सोसाव्या लागल्या. सहकारी पाणीपुरवठा संस्थांद्वारे शेतीपिकांना पाणी मिळाले नसल्याने ऊसपिकांचे खोडवा, बोडवा, आडसाली लागण यांचे मोठ्या प्रमाणात वाळून नुकसान झाले. शेतकऱ्यांनी वाळलेली ऊसपिके काढून टाकली, तर अनेक भागांत टँकरद्वारे ऊसपिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती, पण मे व जून महिन्यात पाऊस अपेक्षित पडला नसल्यामुळे ऊसपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.५ नोव्हेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांचे धुराडे पेटल्याने साखर कारखान्यांकडून गतवर्षी पंचगंगा व भोगावती नदीकाठ परिसरात पाण्याअभावी वाळून गेलेल्या ऊसपिकांची अगोदर उचल होणे गरजेचे आहे. गतवर्षी उन्हाळा हंगामात पाणीपुरवठा न झाल्याने नदीकाठच्या शेतीमध्ये ऊस वजनात यंदा कमालीची घट होणार हे सत्य आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामावरही परिणाम होणार आहे. नदीकाठच्या परिसरात उसाचे उत्पादन घटले जाणार असून, त्याचा यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.पाणी उपसाबंदीमुळे ऊस उत्पादन घटणार असल्याने रासायनिक खते, पाणीपट्टी, मशागत, भांगलण खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. शेतीला पाणीच मिळाले नसल्यामुळे ऊसपिके वाळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गतवर्षी उन्हाळा हंगामातील पाणीटंचाईमुळे ऊस शेती पिकांचा राज्य शासनातर्फे सर्व्हे केला नसल्यामुळे वाळलेल्या पिकांना विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळणार तरी केव्हा, हा प्रश्न निर्माण होऊ लागला. शेतीपिकातून झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? पाणीपट्टी माफ होणार का? यासारख्या प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.साधारणत: भोगावती पंचगंगा नदीकाठच्या परिसरातील कुंभी-कासारी, भोगावती, राजाराम, डी. वाय. पाटील या साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊसटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची गाळपक्षमताही घटणार आहे. शेती व्यवसायासमोर सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. बागायत शेतीला मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शेतीपिकांना पाणीटंचाईची झळ चांगलीच बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी नदीकाठच्या परिसरात ऊसटंचाई भासणार असून, साखर कारखान्यांनी नदीकाठच्या शेतीला जादा भाव देणे गरजेचे आहे.- शंकरराव पाटील, अध्यक्ष, करवीर तालुका काँग्रेस उन्हाळा ऋतुमध्ये शेतीपिकांना पाणी मिळाले नसल्याने राज्य शासनाने नदीकाठच्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी रद्द करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लढा उभारावा.- राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य, करवीर पंचायत समितीपाणीपट्टी रद्द मागणीसाठी लढ्याची गरज उन्हाळा ऋतुमध्ये पाणीटंचाईचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला. ऊसपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी रद्द करण्याच्या मागणीचा लढा उभारणे गरजेचे आहे.