शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

जाती, धर्माची कुंपणे धूसर होण्याची गरज : द्वादशीवार

By admin | Updated: May 15, 2015 23:38 IST

मनोरंजन-प्रबोधन व्याख्यानमाला

इचलकरंजी : आजच्या समाजातील जात, धर्म, सीमा प्रदेश अशा समस्या या ईश्वरनिर्मित नाहीत, तर आपणच निर्माण केल्या आहेत. त्यामुळे नव्या युगात आपणच सर्वसामान्य माणसांनी या समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण आजचे युग हे सर्वसामान्य माणसांचे आहे. जाती, धर्माची कुंपणे जशी धूसर होत जातील, तशी अधिक चांगल्या व्यवस्थेकडे आपली वाटचाल होईल, अशा प्रकारचे उद्गार लेखक व ‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी सेंट्रल आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यातर्फे आयोजित मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत ‘नव्या युगाची आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.जात, धर्म, देश या माणसाच्या जन्मदत्त निष्ठा असतात. त्या माणसाला जन्माबरोबर आपोआप मिळतात; पण स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती, न्याय, लोकशाही, आदी मूल्यनिष्ठा या मिळवाव्या लागतात व त्यासाठी त्यागही करावा लागतो आणि आपण तो करायला हवा. समाजात आज मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतात, ते स्वीकारण्याची मानसिकता आपल्यात निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे सांगून त्यांनी भारताच्या आणि जगाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतला. पूर्वी समाजातील बदल घडण्यास शतकं लागायची, नंतर दशकं लागायची; पण आजच्या काळात दिवसागणिक बदल होताना दिसत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. १९८० साली जगप्रसिद्ध टाईम मासिकाने केलेल्या पाहणीप्रमाणे २० व्या शतकातील सर्वांत मोठा बदल घडविणारे वर्ष म्हणजे १९६७ साल होय. या वर्षात जगभरात अनेक उलथा-पालथी झाल्या. अमेरिका, संपूर्ण युरोप, अरब, इस्त्रायल, आदी देशांत खूप मोठे बदल झाले. भारतातही ६७ साली प्रथमच सहा-सात राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे स्थापन झाली. तसेच आपल्याकडील अर्थव्यवस्थेच्या बदलाला हळूहळू सुरुवात झाली. या वर्षापासून जगभरात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. तसेच धर्मप्रभाव कमी होऊ लागला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या समाज जीवनात शिक्षणाचा प्रभाव वाढत गेला, तशी समाजाच्या सर्व क्षेत्रातील मानसिकता बदलत गेली. कुटुंब व्यवस्थेतील एकाधिकारशाही कमी होत गेली, तर धर्मकारण, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रातील एकछत्री सत्ता विखुरली जाऊ लागली, विकेंद्रित झाली. नवीन पिढी बिघडली नाही, तर तुलनेने लवकर वयात येऊ लागली. ही पिढी जात्यंथ नाही. धर्मांध नाही. त्यामुळे या पिढीकडे विधायक दृष्टिकोनातून पाहायला हवे, असेही ते म्हणाले.अध्यक्ष अमर डोंगरे यांनी स्वागत, तर प्रा. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. संजय होगाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)