शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जाती, धर्माची कुंपणे धूसर होण्याची गरज : द्वादशीवार

By admin | Updated: May 15, 2015 23:38 IST

मनोरंजन-प्रबोधन व्याख्यानमाला

इचलकरंजी : आजच्या समाजातील जात, धर्म, सीमा प्रदेश अशा समस्या या ईश्वरनिर्मित नाहीत, तर आपणच निर्माण केल्या आहेत. त्यामुळे नव्या युगात आपणच सर्वसामान्य माणसांनी या समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण आजचे युग हे सर्वसामान्य माणसांचे आहे. जाती, धर्माची कुंपणे जशी धूसर होत जातील, तशी अधिक चांगल्या व्यवस्थेकडे आपली वाटचाल होईल, अशा प्रकारचे उद्गार लेखक व ‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी सेंट्रल आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यातर्फे आयोजित मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत ‘नव्या युगाची आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.जात, धर्म, देश या माणसाच्या जन्मदत्त निष्ठा असतात. त्या माणसाला जन्माबरोबर आपोआप मिळतात; पण स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती, न्याय, लोकशाही, आदी मूल्यनिष्ठा या मिळवाव्या लागतात व त्यासाठी त्यागही करावा लागतो आणि आपण तो करायला हवा. समाजात आज मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतात, ते स्वीकारण्याची मानसिकता आपल्यात निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे सांगून त्यांनी भारताच्या आणि जगाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतला. पूर्वी समाजातील बदल घडण्यास शतकं लागायची, नंतर दशकं लागायची; पण आजच्या काळात दिवसागणिक बदल होताना दिसत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. १९८० साली जगप्रसिद्ध टाईम मासिकाने केलेल्या पाहणीप्रमाणे २० व्या शतकातील सर्वांत मोठा बदल घडविणारे वर्ष म्हणजे १९६७ साल होय. या वर्षात जगभरात अनेक उलथा-पालथी झाल्या. अमेरिका, संपूर्ण युरोप, अरब, इस्त्रायल, आदी देशांत खूप मोठे बदल झाले. भारतातही ६७ साली प्रथमच सहा-सात राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे स्थापन झाली. तसेच आपल्याकडील अर्थव्यवस्थेच्या बदलाला हळूहळू सुरुवात झाली. या वर्षापासून जगभरात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. तसेच धर्मप्रभाव कमी होऊ लागला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या समाज जीवनात शिक्षणाचा प्रभाव वाढत गेला, तशी समाजाच्या सर्व क्षेत्रातील मानसिकता बदलत गेली. कुटुंब व्यवस्थेतील एकाधिकारशाही कमी होत गेली, तर धर्मकारण, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रातील एकछत्री सत्ता विखुरली जाऊ लागली, विकेंद्रित झाली. नवीन पिढी बिघडली नाही, तर तुलनेने लवकर वयात येऊ लागली. ही पिढी जात्यंथ नाही. धर्मांध नाही. त्यामुळे या पिढीकडे विधायक दृष्टिकोनातून पाहायला हवे, असेही ते म्हणाले.अध्यक्ष अमर डोंगरे यांनी स्वागत, तर प्रा. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. संजय होगाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)