शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

आंदोलनानंतर प्रश्न मार्गी

By admin | Updated: January 20, 2015 23:47 IST

कुलगुरूंना घेराव : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यश

कोल्हापूर : ग्रंथालयीन वेळेत बदल करावा, वसतिगृहात मुलींची राहण्याची सोय करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी काल, सोमवारी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला. याची दखल घेत प्रशासन कामाला लागले असून, ग्रंथालयाच्या वेळेत बदल केले आहेत. विद्यार्थिनींना राहण्यासाठी प्राध्यापकांच्या रिकाम्या निवासस्थानी व्यवस्था करण्याचे काम सुरू होते. कृषी महाविद्यालयातील वसतिगृहात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्याचा निर्णय यंदापासून घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना बाहेर राहावे लागत होते. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत होता. हा निर्णय रद्द करावा. महाविद्यालयातील कँटीनचा दर्जा, ग्रंथालयाच्या वेळेत बदल करावा, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनाच येथील कृषी महाविद्यालयातील गेस्ट हाऊस येथे घेराव घातला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत मोरे यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याबाबत सूचना दिल्या. आंदोलनात सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.