शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागात ८१ टक्के पेरणी

By admin | Updated: December 24, 2015 00:30 IST

सातारा आघाडीवर : पाण्याचा ताण; कोल्हापुरात ऊस लागवडीस प्राधान्य

राजाराम लोंढे-कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यांत सरासरी ८१ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वाधिक ९२ टक्के पेरणी ही सातारा जिल्ह्यात झाली आहे. पाण्याखालील पिके जोमात असली तरी हलक्या जमिनीतील पिकांवर पाण्याचा ताण जाणवत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची सारी मदार ही रब्बी पिकांवर आहे. विशेषत: सांगली व सातारा जिल्ह्यांत त्याचा परिणाम दिसत आहे. सातारा जिल्ह्यात २ लाख १७ हजार ६०० हेक्टर हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी तब्बल २ लाख १ हजार २५१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे. ज्वारी, गहू, मका, हरभराची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. जिल्ह्यात उसाचे सरासरी ६२ हजार ५४० हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यापैकी २९ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. आडसाली पीक वाढीच्या अवस्थेत असून पूर्वहंगामी उसाची उगवण चांगली आहे. रब्बी पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे सुरू असून आडसाली ऊस पिकांवर काही प्रमाणात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात ज्वारीचे १ लाख ६३ हजार ४७० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८९ हेक्टरवर (८६ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारी पिके वाढत असून काही ठिकाणी पाण्याचा ताण जाणवत आहे. गहू, हरभरा, मका पिकाची लागवडही चांगली आहे. सरासरी ६४ हजार हेक्टरपैकी १७ हजार ६०१ हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र कमी असते. केवळ १४ हजार ९८ हेक्टरवर (३५ टक्के) पेरणी झालेली आहे. गहू, हरभरा, मक्याची पेरणी कमी आहे. ज्वारीची ७० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झालेली आहे. कृषी विमा योजना खुलीगारपीट, चक्रीवादळ, अपुरा पाऊस, कीडरोग प्रादुर्भाव आदींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून मिळते. योजनेत सहभागी होण्यासाठी पेरणीपासून एक महिना अथवा ३१ डिसेंबर यापैकी जी आधी असेल ती, तसेच उन्हाळी भात, भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे. ऊस पाचटसाठी पुढाकारपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ऊस पाचट व्यवस्थापन व एक सरीआड पाणी देणे याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन कृषी विभागामार्फत सुरू आहे. त्याचबरोबर ठिबक, तुषार सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी विभागीय पातळीवर मोहीम उघडण्यात आली आहे.