शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
4
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
5
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
6
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
7
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
8
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
9
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
10
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
11
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
12
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
13
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
14
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
15
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
16
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
17
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
18
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
19
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
20
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...

‘भोगावती’त ५८० कामगारांची जंबो भरती

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

प्रशासनाने दिल्या आॅर्डर : नेत्यांच्या विरोधाला केराची टोपली; संचालकांची मुले, नातेवाइकांना संधी दिल्याची चर्चा

तानाजी पोवार-- कोल्हापूर--साखर कारखानदारी अडचणीत असताना परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्यात तब्बल ५८० जणांची जंबो नोकरभरती गुरुवारी करण्यात आली. शासनाचा व नेत्यांचाही आदेश डावलून भरतीच्या आॅर्डर्स देण्यात आल्या असून यातही संचालकांच्या सग्या-सोयऱ्यांचा भरणा केल्याचे समजते. या नोकरभरतीमुळे कारखान्यावर साहजिकच मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी मात्र रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली असल्याचे सांगितले. कारखान्यावर राष्ट्रवादी व शेकापची सत्ता असून कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर यांचे नातू धैर्यशील पाटील यांच्याकडे गेली पाच वर्षे अध्यक्षपद आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती व साखरेचे पडलेले दर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे भाव देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत साखर कारखान्यात जंबो नोकरभरती करणे म्हणजे आर्थिक संकटात ओढण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती करताना प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्तांंची परवानगी आवश्यक असते; पण चार महिन्यांपूर्वी साखर सहसंचालकांनी कारखान्याला नोकरभरतीबाबत दिलेल्या पत्राला या सत्तारूढांनी केराची टोपली दाखविली आहे. कारखान्यावर काँग्रेसची सत्ता असताना २००९ साली भरती करण्यात आलेल्या ७० रोजंदारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी-शेकापची सत्ता आल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला डावलून नव्याने नोकरभरती करू नये, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांनी नव्याने नोकरभरती करणार नसल्याचे लेखी आश्वासन साखर आयुक्तांना दिले होते; पण तीन वर्षांपूर्वी कारखान्यात नोकरभरतीचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले; त्यावेळी नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चेमुळे अध्यक्षांनी या भरतीला ‘खो’ घातला होता, पण त्यानंतर गुरुवारी भरतीच्या थेट आॅर्डर्सच उमेदवारांना दिल्याने खळबळ उडाली आहे. विद्यमान संचालकांना कारखान्यात नव्याने नोकरभरती करता येत नाही. असे पत्रही साखर सहसंचालकांनी यापूर्वी प्रशासनाला दिलेले आहे. या कारखान्यातील संचालकांची मुदत यापूर्वीच संपली आहे; त्यामुळे अशा पद्धतीने नोकरभरतीचा निर्णय ते कोणालाही न जुमानता घेत आहेत; या नोकरभरतीला आम्ही विरोध करु. -पी. एन. पाटील, माजी आमदार, विरोधी आघाडीचे नेतेसध्या साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देताना दमछाक होत आहे. भोगावती कारखान्याची स्थितीही नाजूक आहे. अशा स्थितीत वाढीव कर्मचाऱ्यांना पगार देणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे नोकरभरतीला यापूर्वीही विरोध होता. तो आजही कायम आहे. -हसन मुश्रीफ, आमदार, सत्तारुढ राष्ट्रवादीचे नेतेनोकरभरतीसाठी पत्रे दिली आहेत हे खरे आहे; पण कारखान्यात काही कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली आहे. कारखान्यात गेली पाच वर्षे हंगामी म्हणून सेवेत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाच कायम सेवेत घेतले आहे; पण यासाठी कारखान्यावर किरकोळ प्रमाणातच आर्थिक बोजा पडणार आहे. -एस. एस. पाटील, कार्यकारी संचालक, ‘भोगावती’पाच महिन्यांपूर्वीच भोगावती कारखान्यास नव्याने नोकरभरती करू नये, असे लेखी कळविले होते. नव्याने नोकरभरती होत असल्याच्या चर्चेने आमचे लेखापरीक्षक कारखान्यावर तळ ठोकून त्याबाबत माहिती घेत आहेत; पण नव्याने भरतीच्या आॅर्डर कोणाला दिल्या असतील तर त्याची मला काहीही माहिती नाही. आमचे लेखापरीक्षक अहवाल देतील. त्यानंतर कारवाई करू. -सचिन रावळ, प्रादेशिक साखर सहसंचालक