शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’त ५८० कामगारांची जंबो भरती

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

प्रशासनाने दिल्या आॅर्डर : नेत्यांच्या विरोधाला केराची टोपली; संचालकांची मुले, नातेवाइकांना संधी दिल्याची चर्चा

तानाजी पोवार-- कोल्हापूर--साखर कारखानदारी अडचणीत असताना परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्यात तब्बल ५८० जणांची जंबो नोकरभरती गुरुवारी करण्यात आली. शासनाचा व नेत्यांचाही आदेश डावलून भरतीच्या आॅर्डर्स देण्यात आल्या असून यातही संचालकांच्या सग्या-सोयऱ्यांचा भरणा केल्याचे समजते. या नोकरभरतीमुळे कारखान्यावर साहजिकच मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी मात्र रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली असल्याचे सांगितले. कारखान्यावर राष्ट्रवादी व शेकापची सत्ता असून कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर यांचे नातू धैर्यशील पाटील यांच्याकडे गेली पाच वर्षे अध्यक्षपद आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती व साखरेचे पडलेले दर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे भाव देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत साखर कारखान्यात जंबो नोकरभरती करणे म्हणजे आर्थिक संकटात ओढण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती करताना प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्तांंची परवानगी आवश्यक असते; पण चार महिन्यांपूर्वी साखर सहसंचालकांनी कारखान्याला नोकरभरतीबाबत दिलेल्या पत्राला या सत्तारूढांनी केराची टोपली दाखविली आहे. कारखान्यावर काँग्रेसची सत्ता असताना २००९ साली भरती करण्यात आलेल्या ७० रोजंदारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी-शेकापची सत्ता आल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला डावलून नव्याने नोकरभरती करू नये, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांनी नव्याने नोकरभरती करणार नसल्याचे लेखी आश्वासन साखर आयुक्तांना दिले होते; पण तीन वर्षांपूर्वी कारखान्यात नोकरभरतीचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले; त्यावेळी नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चेमुळे अध्यक्षांनी या भरतीला ‘खो’ घातला होता, पण त्यानंतर गुरुवारी भरतीच्या थेट आॅर्डर्सच उमेदवारांना दिल्याने खळबळ उडाली आहे. विद्यमान संचालकांना कारखान्यात नव्याने नोकरभरती करता येत नाही. असे पत्रही साखर सहसंचालकांनी यापूर्वी प्रशासनाला दिलेले आहे. या कारखान्यातील संचालकांची मुदत यापूर्वीच संपली आहे; त्यामुळे अशा पद्धतीने नोकरभरतीचा निर्णय ते कोणालाही न जुमानता घेत आहेत; या नोकरभरतीला आम्ही विरोध करु. -पी. एन. पाटील, माजी आमदार, विरोधी आघाडीचे नेतेसध्या साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देताना दमछाक होत आहे. भोगावती कारखान्याची स्थितीही नाजूक आहे. अशा स्थितीत वाढीव कर्मचाऱ्यांना पगार देणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे नोकरभरतीला यापूर्वीही विरोध होता. तो आजही कायम आहे. -हसन मुश्रीफ, आमदार, सत्तारुढ राष्ट्रवादीचे नेतेनोकरभरतीसाठी पत्रे दिली आहेत हे खरे आहे; पण कारखान्यात काही कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली आहे. कारखान्यात गेली पाच वर्षे हंगामी म्हणून सेवेत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाच कायम सेवेत घेतले आहे; पण यासाठी कारखान्यावर किरकोळ प्रमाणातच आर्थिक बोजा पडणार आहे. -एस. एस. पाटील, कार्यकारी संचालक, ‘भोगावती’पाच महिन्यांपूर्वीच भोगावती कारखान्यास नव्याने नोकरभरती करू नये, असे लेखी कळविले होते. नव्याने नोकरभरती होत असल्याच्या चर्चेने आमचे लेखापरीक्षक कारखान्यावर तळ ठोकून त्याबाबत माहिती घेत आहेत; पण नव्याने भरतीच्या आॅर्डर कोणाला दिल्या असतील तर त्याची मला काहीही माहिती नाही. आमचे लेखापरीक्षक अहवाल देतील. त्यानंतर कारवाई करू. -सचिन रावळ, प्रादेशिक साखर सहसंचालक