शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

पाण्याअभावी ४०० एकरांतील ऊस वाळला

By admin | Updated: April 19, 2016 01:02 IST

करवीर तालुका : उन्हामुळे पिकांना अपुरा पाणीपुरवठा; आडसाली ऊस लागण, खोडवा, बोडवा पिकांना फटका

शिवराज लोंढे-- सावरवाडी--अपुरा पाऊस, दुष्काळजन्य परिस्थितीचे चित्र, वाढीव वीजभार नियम, शेतीसाठी पाणी उपसाबंदी, सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा संस्थेचे ढासाळलेले पाणी वाटप व्यवस्थापन, या सर्व पार्श्वभूमीवर यंदा ऐन उन्हाळ्यामध्ये करवीर तालुक्यात शेतीला अपुरा पाणीपुरवठा होऊ लागल्याने तालुक्यात ४०० एकर ऊस क्षेत्रातील ऊस पिके पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीनुसार धरणक्षेत्रात पाण्याचा साठा कमी पडू लागला आहे. शेतीला उन्हाळ्यामध्ये अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि पाणी उपसाबंदीमुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. यावर्षी शेती व्यवसायासमोर पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभारला आहे. मार्च ते जून महिन्यात शेतीला पाणीपुरवठा व्यवस्थित होणार नसल्यामुळे आडसाली ऊस लागण, खोडवा, बोडवा या ऊस पिकांना यंदा जबर पाणीपुरवठ्याचा फटका सोसावा लागणार आहे. शेतीला पाणीच मिळत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादन क्षमतेत घट होणार आहे. नदीवरील पाणी उपसा कालावधीत दहा दिवस चालू व दहा दिवस बंद असा असल्यामुळे या कालावधीत शेतीस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असल्यामुळे शेती पिकांना जादा पाणी लागते; पण सध्या अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाण्याचा पाणी वापरातील फेर वेळेत येत नाही.ग्रामीण भागातील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा संस्था ठरावीक राजकीय गटाच्या बनल्याने शेतीच्या पाणीपुरवठ्यामध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. पाणी वापरात राजकारण शिरल्यामुळे गटातटातील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. शिवाय शेती पिके वाळवून पाणी देण्याची प्रथा पाणीपुरवठा संस्थेकडून सुरू झाल्याने पाणीपुरवठा संस्थेच्या कारभाराबाबत ग्रामीण भागात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. रात्रपाळीमध्ये पाण्याचा गैरवापर होणे, पाणी वाया जाणे यासारख्या प्रकारामुळे पाणीपुरवठा संस्थांचे नियोजन कोलमडले आहे. पाणी वाटपात वशिलेबाजी सुरू झाली आहे. पाणीपुरवठा संस्थेच्या कर्मचारी वर्गाकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मुद्दाम ऊस पीक वाळवून पाणी देण्याचे प्रकार घडू लागल्याने पाणीपुरवठा संस्थेच्या कारभाराची शासनाने अथवा सहकार खात्याने चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गांतून होऊ लागली आहे. सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा हंगाम सुरू असल्यामुळे भोगावती, तुळशी नद्यांच्या पात्रात पाणी असूनही शेतीला हंगामानुसार पाणी मिळत नाही. पाण्याअभावी भुईमूग, मका, मिरची, तीळ यासारखी पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. खोडवा, आडसाली लागण व बोडवा ही ऊस पिके करपू लागल्याचे ऊस वाढीवर गंभीर परिणाम होऊ लागल्याने पुढील वर्षाच्या साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामावर ऊसटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे.शेती व्यवसायासमोर सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीपुरवठा संस्थांद्वारे शेतीस अपुरा पाणीपुरवठा होतो. यामुळे ऊस पिकांचे नुकसान होते. याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांना मोफत पाणी उपसा परवाने राज्य शासनाने त्वरित द्यावेत. तसेच पाणीपुरवठा संस्थेची चौकशी करणे गरजेचे आहे.पाणी उपसा परवाने देण्याची गरजपाण्याचा दुरूपयोग टाळण्याबरोबरच शेती पिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना नदीवरून पाणी पुरवठ्यासाठी पाणी उपसा परवाने देणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचा वेळेवर वापर शेतकऱ्यांना करता येईल. शिवाय पाणीपुरवठा संस्थेच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. करवीर तालुक्यात ऊस पिके पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकरी चिंतातूर आहे. - दादासाहेब देसाई, भाजप प्रणीत शेतकरी आघाडी,करवीर तालुका अध्यक्ष