शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२६ गावांना दीड महिन्यात खर्चावे लागणार साडेअकरा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

दत्ता बिडकर, लोकमत न्यूज नेटवर्क हातकणंगले : गेल्या एप्रिल महिन्यापासून १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाची अंमलबजावणी सुरू झाली ...

दत्ता बिडकर,

लोकमत न्यूज नेटवर्क

हातकणंगले : गेल्या एप्रिल महिन्यापासून १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाची अंमलबजावणी सुरू झाली असताना १४ व्या वित्त आयोगाचा ७० % पेक्षा कमी खर्च केलेल्या २६ ग्रामपंचायतींचा ११ कोटी ५२ लाखांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. १४ व्या अयोगाच्या निधी खर्चाबद्दल पंचायत समिती प्रशासनाचे ग्रामपंचायतीवर निर्बंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र शासनाने गावची लोकसंख्या, क्षेत्रफळाचा विचार करून १४ व्या वित्त आयोगाचा प्रति व्यक्ती ३७५ रुपयांप्रमाणे ग्रामपंचायतींना थेट विकास कामासाठी निधी दिला. यामुळे ग्रामपंचायतींना प्रति वर्षी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला. ग्रामपंचायतींनी मिळालेल्या निधीमधील १० % निधी प्रशासकीय खर्चासाठी तर उर्वरित ९० % निधी विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी गावकृती आराखडा ग्रामसभेमध्ये मंजूर करण्याची अट घातली होती. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींना २०१५ पासून २०१९ पर्यंत ५५७ कोटी ८२ लाखांचा निधी चार वर्षांत मिळाला. यापैकी ५३३ कोटी १२ लाखांचा निधी जानेवारी २१ अखेर खर्च झाला असून अद्याप ११ कोटी ५२ लाखांचा निधी खर्चाअभावी शिल्लक आहे. शिल्लक ११ कोटी ५२ लाखांच्या खर्चासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत डेडलाइन दिली असून ७० % पेक्षा कमी खर्च केलेल्या २६ ग्रामपंचायतींचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे ग्रामपंचायतींकडून निधी खर्चासाठी घाईगडबड सुरू आहे.

कोट:- १४ वा वित्त आयोगाचा निधी कोविड-१९ च्या कालावधीमध्ये खर्च झाला नाही. सहा महिने सर्वच विकास कामे ठप्प होती. निधी खर्चाला ३१ मार्च २१ ची मुदत आहे. दोन महिन्यांत निधी खर्च होणार नाही, मुदतवाढ मिळाली तरच निधी खर्च होईल अन्यथा शिल्लक निधी शासनाकडे परत करण्याशिवाय पर्याय नाही.

-संतोष पवार, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत.

O १४ व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतीला पाच वर्षांत ४८ लाख ७७ हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी १३ लाख ५६ हजार खर्च केला. मिळालेल्या निधीपैकी फक्क २७ % निधी खर्च करून या ग्रामपंचायतीने तालुक्यामध्ये सर्वांत सुमार कामगिरी करून कमी खर्च करणारी ग्रामपंचायत म्हणून नामुष्की ओढावून घेतली आहे.

५० ते ६० टक्के निधी खर्च करणाऱ्या ग्रामपंचायती हालोंडी, माणगाववाडी, रुई, यळगुड.

O ६० ते ७० टक्क्यांपर्यंत खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतींची नवे पारगाव, निलेवाडी, तळसंदे, संभापूर, इंगळी, कबनूर, कुंभोज, जंगमवाडी, रांगोळी, साजणी, तळदंगे, अंबपवाडी, चोकाक, चावरे, कापूरवाडी, टोप, वाठार तर्फ उदगाव, कोरोची, माले, मुडशिंगी, रेंदाळ.

८० ते ९० टक्के निधी खर्च करणारी गावे भादोले, किणी, मिणचे, नरंदे, नागाव, जुनेपारगाव, सावर्डे, कासारवाडी, मौजे वडगाव, आळते, चंदूर, हिंगणगाव, मजले, रुकडी, तारदाळ, खोतवाडी आणि दुर्गेवाडी.

९० ते १०० टक्के निधी खर्च करणारी गावे तासगाव, पट्टणकोडोली, अंबप, भेंडवडे, घुणकी, हेरले, लाटवडे, मनपाडळे, खोची, पाडळी, शिरोली, वाठार तर्फ वडगाव, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी, नेज, माणगाव, तिळवणी.