शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांची वाळवी रोखायची कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 10:50 IST

शहरी भागात अनधिकृत बांधकामे ही मोठी समस्या आहे. विधिमंडळाने केलेले कायदे, शासनाने नेमलेल्या समित्या, आखलेली धोरणे व न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निवाडे यांच्या माध्यमातून गेल्या कैक वर्षापासून या संदर्भातले धोरण विकसित होत गेले. या धोरणांमध्ये दोन प्रवाह आढळतात. 

सीताराम कुंटे, माजी मुख्य सचिव

कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत पालिकेने न्यायालयाच्या सांगण्यावरून नुकत्याच केलेल्या कार्यवाहीमुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकूणच, या समस्येचे ढोबळ मानाने स्वरूप काय आहे व संभाव्य निदान काय असू शकते यावर भाष्य करण्याचा हा प्रयत्न आहे. शासकीय सेवेत असताना या प्रश्नावर नेमलेल्या समितीत केलेले काम व इतर अनुषांगिक अनुभवाच्या आधारे मी माझे विचार मांडत आहे. 

शहरी भागात अनधिकृत बांधकामे ही मोठी समस्या आहे. विधिमंडळाने केलेले कायदे, शासनाने नेमलेल्या समित्या, आखलेली धोरणे व न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निवाडे यांच्या माध्यमातून गेल्या कैक वर्षापासून या संदर्भातले धोरण विकसित होत गेले. या धोरणांमध्ये दोन प्रवाह आढळतात. 

एकीकडे, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे याबाबत सक्तीच्या कार्यवाहीचा आग्रह धरला जातो. यंत्रणांकडून प्रभावी कार्यवाही व्हावी, न्यायालयात अशा प्रकरणात हिरिरीने पाठपुरावा केला जावा, आणि सरतेशेवटी अशी बांधकामे पाडून टाकली जावीत, अशा आशयाच्या लोकभावना असतात. त्याला प्रतिसाद म्हणून अशा प्रकारच्या कारवाया यशस्वीपणे केल्या जातात, मात्र त्यांचे शेवटच्या टप्प्यापर्यंत, म्हणजेच इमारत पाडून टाकण्यापर्यंत यश मिळण्याचे प्रमाण कमीच आहे. काही प्रमुख कारवाया वानगीदाखल देता येतील, ज्यात नोएडातील सुपरटेक कंपनीचे दोन टॅावर २०२२ साली पाडण्यात आले.   मात्र, अनेकदा अनधिकृत बांधकामावर सनदशीर मार्गाने सातत्यपूर्ण कार्यवाही करण्याऐवजी ही प्रक्रिया भरकटताना दिसते. अलीकडल्या काळात तर काही राज्यांत अशी कार्यवाही करताना धार्मिक रंग दिला जातो, ज्यामुळे बुलडोझरच्या अवतीभवती उन्मादी घोळका उभा असल्याचे चित्र पाहायला मिळते. निर्दयी तोडकामाच्या माध्यमातून अधिकारी आणि राजकारणी आपलं महिमा मंडन करून घेतात, हे पाहताना अनुचित वाटते. त्यामुळे शहरांचे बकालीकरण थांबविण्याऐवजी अन्य हेतू साधण्याकडे लक्ष वळते ही शोकांतिका आहे. 

दुसऱ्या बाजूला अशा अनधिकृत इमारती किंवा झोपडपट्टीचे तोडकाम चालू केल्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे हाल पाहून विविध समाजघटकांत सहानुभूती पाहावयास मिळते. तीदेखील नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. तोडकाम होऊ नये, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे नियमित करण्याची शक्यता पडताळून बघावी यासाठी आग्रह धरला जातो. गंमत म्हण्जे जे लोक कठोर कार्यवाही साठी अगोदर आग्रही असतात, तेच सहानुभूती दाखवायलाही पुढे असतात. कारण काहीही असो; मात्र राजकारणी, न्यायालये व मीडिया अशा सर्व घटकांमध्ये ही सहानुभूती पाहायला मिळते. अनेकदा अशा सहानुभूतीमुळे प्रत्यक्ष कार्यवाही करता येत नाही. काही ठिकाणी तर एकीकडे न्यायालयाचे आदेश आणि दुसरीकडे स्थानिक नेतृत्वाकडून कार्यवाही न करण्याचा दबाव यामध्ये अधिकाऱ्यांची त्रेधा उडाल्याचे मी स्वत: पाहिले आहे. झोपडपट्टीच्या संदर्भात तर अशा निर्णायक कार्यवाहीच्या वेळी उद्भवलेल्या सहानुभूतीची परिणती नवीन धोरणात होते. महाराष्ट्रात तर १/१/९५ ची तारीख अनेकदा पुढे वाढवून देण्यात आली आहे. थोडक्यात, एकीकडे कठोर कार्यवाहीचा आग्रह तर दुसरीकडे सहानुभूती दाखवण्यासाठीचा दबाव, या दोन टोकांमध्ये हेलकावणारे धोरण असल्याने परिस्थितीत कोणतीही सुधारणा संभवत नाही. 

यावरून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे, सर्व कार्यवाही लोक राहायला जाण्यापूर्वी पूर्ण करता आली पाहिजे. त्या टप्प्यापर्यंत फक्त अनधिकृत बांधकामाचे व्यावसायिक आणि प्रशासकीय यंत्रणा, याच आमनेसामने असतात. तोडकाम करताना नैतिक दडपण येत नाही. या उलट, लोकं राहायला आल्यावर अनेक प्रश्न तयार होतात. कायद्याची बाजू कितीही बळकट असली तरी उघड्यावर पडणारी कुटुंबे, लहान मुले हे पाहवत नाही. त्यातून प्रशासनाची निर्दयी छबी अधोरेखित होते, व त्यासंदर्भात एक नैतिक दडपण तयार होते. मानवी प्रश्न तयार झाले की मग निर्णायक कार्यवाही होऊ शकत नाही. प्रशासनाकडून वेळीच कार्यवाही का होत नाही, त्यासाठी काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ˘    (उत्तरार्ध उद्या...) 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली