शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शहराच्या विद्रूपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST

सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढदिवस, यश-निवड, उद्घाटन, शैक्षणिक यांसह विविध कंपन्यांच्या जाहिरातीच्या फलकांनी शहरातील प्रत्येक ...

सचिन देव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढदिवस, यश-निवड, उद्घाटन, शैक्षणिक यांसह विविध कंपन्यांच्या जाहिरातीच्या फलकांनी शहरातील प्रत्येक रस्ते आणि चौक सजलेले आहेत. मात्र, मुदत संपूनही मनपातर्फेही हे फलक काढण्यात येत नसल्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. विशेष म्हणजे सहा-सहा महिने उलटूनही हे फलक न काढल्यामुळे, अनेक फलक फाटून, लोंबकळलेल्या अवस्थेत दिसून आले. एकीकडे संबंधित जाहिरातदार हे फलक काढत नसतांना, दुसरीकडे मनपातर्फेही कारवाई होत नसल्यामुळे, शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

मनपाच्या वसुली विभागातर्फे शहरात होर्डिंग लावण्याची परवानगी दिली जात असून, ५० पैसे स्क्वेअर फूट व ५० पैसे जाहिरात शुल्क या प्रमाणे भाडे आकारले जाते. तसेच परवानगी देताना शहर वाहतूक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊनच परवानगी दिली जाते. तसेच परवानगी देतांना संबंधित जाहिरातदाराची एक प्रत अतिक्रमण विभागालाही दिली जात आहे. मनपा वसुली विभागाने जून ते ९ सप्टेंबरपर्यंत शहरात १२२ होर्डिंगला परवानगी दिली असल्याचे वसुली विभागातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

या ठिकाणांकडे कोण लक्ष देणार?

- `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत स्वातंत्र्य चौक ते कोर्ट चौकापर्यंत असलेल्या दुभाजकांमध्ये अनेक लहान आकाराचे मुदत संपलेले होर्डिंग फाटलेल्या अवस्थेत दिसून आले.

- नेहरू चौकाकडून टॉवर चौकाकडे जाताना एका झाडाला लावलेला शैक्षणिक प्रवेशाचा फलकही मुदत संपूनही हटविण्यात आला नसल्याचे तेथील एका व्यावसायिकाने सांगितले.

- तसेच नेहरू चौकातून रेल्वे स्टेशनकडे जातांना वर्षभरापासून मुदत संपलेले वाढदिवसाचे होर्डिंग फाटून, दुभाजकात पडलेले दिसून आले. असे असतानाही मनपाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

इन्फो :

कारवाईची जबाबदारी अतिक्रमण विभागाची

- किरकोळ वसुली विभागातर्फे फलक लावण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर, त्या परवानगीची एक प्रत अतिक्रमण विभागालाही देण्यात येते.

- अतिक्रमण विभागातर्फे शहरातील विविध फलकांची पाहणी करून, मुदत संपलेल्या फलकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

- अतिक्रमण विभागातर्फे वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या कारवाई मोहिमेत, दर महिन्याला ५० ते ६० फलक जप्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

काय होऊ शकते कारवाई

-मनपातर्फे होर्डिंगची परवानगी देण्यात आल्यानंतर, संबंधितांना दिलेल्या तारखेनंतर होर्डिंग काढण्याचींही सूचना केली जाते.

-जर एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने मुदत संपल्यानंतर, फलक न काढल्यास मनपातर्फे तो फलक जप्त करून, दंडात्मक कारवाई केली जाते.

- गेल्या काही महिन्यांत मनपाने मुदत संपुनही फलक न काढलेल्या ६३ नागरिकांना नोटीस, बजावून लावलेल्या अतिरिक्त दिवसांचे शुल्क दंड स्वरूपात आकारले असल्याचे वसुली विभागातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

अधिकारी म्हणतात..

वसुली विभागाने होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्यानंतर, एक प्रत अतिक्रमण विभागालाही दिली जाते. त्यानंतर मुदत संपलेल्यांवर अतिक्रमण विभाग कारवाई करतो. सध्या ज्या ठिकाणी मुदत संपलेले फलक आहेत, ते फलक जप्त करण्याबाबत अतिक्रमण विभागाला सूचना देण्यात येतील.

नरेंद्र चौधरी, अधीक्षक, किरकोळ वसुली विभाग

-