शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

नशिराबादला भर पावसाळ्यात सहाव्या दिवशी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST

नशिराबाद : येथील व परिसरातील धरणे, नाले तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना नियोजनाअभावी अजूनही सहाव्या, सातव्या दिवशी पाणीपुरवठा ...

नशिराबाद : येथील व परिसरातील धरणे, नाले तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना नियोजनाअभावी अजूनही सहाव्या, सातव्या दिवशी पाणीपुरवठा गावात होत आहे. त्यातच १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही शुद्ध पाणी देण्यात असमर्थ ठरली आहे. शुद्ध पाण्यासाठीची बोंबाबोंब कायम आहे. गावासाठी नवीन पाणीयोजना तयार करण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपूर्वी गतिमान झाल्या होत्या. मात्र, त्याचे काम थंडबस्त्यात आहे. धरणे उशाला असली तरी कोरड मात्र घशाला कायम आहे, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.

येथे पाणीटंचाईचा सामना नवीन नाही. दरवर्षी येथे पाणीसमस्या कायम आहे. कधी जलवाहिनी फुटते, वीजपंप नादुरुस्त, विहिरींची भूजल पातळी खालावणे, विजेचा लपंडाव वीजपुरवठा खंडित आदी कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो. वाघुर, मुर्दापूर धरण व स्थानिक जलस्रोतांवर गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पाणीसमस्या नशिराबादकरांच्या नशिबी कायमच आहे. पाणीसमस्येवर मात करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. त्यात कायमस्वरूपी पाणीयोजनेवर मात करण्यासाठी सोळा कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वित करण्यात आली, मात्र ती शुद्ध पाणीपुरवठा करण्यात असमर्थ ठरल्याने सर्वत्र फज्जा उडाला आहे. सध्या परिसरात धरणे, नाले, नदी तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना सहाव्या ते सातव्या दिवशी पाणीपुरवठा गावात होत आहे. गावात पाणीपुरवठ्याचे टप्पे मोठ्या प्रमाणावर असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी, विजेचा लपंडाव वाढल्यामुळे जलकुंभ भरण्यास उशीर होत असल्यामुळे काही भागात सातव्या दिवशी पाणीपुरवठा झाला, असे सांगितले जात आहे.

इन्फो

योजनेच्या व्हायरसवर चर्चेला उधाण

नशिराबादच्या पाणीयोजनेबाबत एका ग्रुपवर चांगलाच ऊहापोह झाला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आपापली मते प्रदर्शित करून योजनेचे महत्त्व पटवून दिले. मात्र, ही योजना शेळगावऐवजी वाघुर येथून घेतली असती, तर यशस्वी ठरली असती, अशा या बाबतीत चर्चा रंगल्या. या सर्व चर्चांमुळे नशिराबादच्या पाण्याला राजकीय बुडबुडे आले आहे, हे मात्र तितकेच खरे... गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे व पुन्हा ग्रामविकासासाठी निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.