शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

कवितेमुळे झाली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:23 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक प्रा.वा.ना. आंधळे यांनी कवितेला आपली माताच संबोधले आहे. वेगळेपण मांडणारा विशेष लेख.

माझा जन्म तसा दोनदा झाला आणि हे मी माझे भाग्य मानतो. पहिल्यांदा आईच्या उदरी जन्मलो आणि ऐन तारुण्यात... कवितेच्या पोटी जन्माला आलो. आईमुळे या सुंदर जगाचं दर्शन झालं, तर कवितेमुळे जगात माझी ओळख झाली. बरेच प्रतिभावंत कवितेला वा साहित्यकृतीला अपत्य संबोधतात. पण माझ्या दृष्टीनं ती आईच.आई म्हणजे संस्काराची अखंड वाट. आभाळमायेचा उत्तुंग स्त्रोत. संगोपनाच्या दाही दिशा ही सारी संपदा आईइतकीच कवितेनं मला भरभरून दिली. मी पाळण्यात असताना पासून तर वर्तमानपत्रापर्यंत तिनं माझी काळजीच वाहिलीय. अशा या कवितारुपी आईविषयी कृतज्ञता नोंदविली जावी हा अंतरीचा अट्टाहास म्हणूनच हा लेखनप्रपंच.अंतरमनाची उकल म्हणजे कविता ही काव्याख्या मला जवळची वाटते. कविता या वाङ्मय प्रकारानं साऱ्या चराचराला व मानवी जगण्याला मोल आलं. खरं पाहिलं तर माझ्या बालपणीच जन्मदात्या आईनं माझ्या कानामनात कविता पोहचवली तर जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीवीपर्यंत गुरुजींनी कवितेच्या गायनाने लळा लावीत पार भिजवून टाकलं आणि हाच काळ माझ्या लेखन-भविष्याला आकार देणारा ठरला. कवीश्रेष्ठ भा.रा. तांबे, राजकवी यशवंत, शांताबाई शेळके, बालकवी कुसुमाग्रज, गणेश कुडे, आ.ज्ञा.पुराणिक यांच्या सृजनानं न्हालो ओथंबून निघालो.सृजनांच्या निस्सीम सहवासाचा परिपाक महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावरच आडवा आला अन् अंतरीच्या धाव्यांना वाट लागली. मनासह कविता कागदावर मनसोक्त नाचली आणि याचवेळी माझा पुनर्जन्म झाला. प्रारंभी मित्रांमध्ये, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, महाविद्यालयाच्या नियतकालिकामध्ये माझं सृजन रांगू लागलं. माझ्या या रांगण्याचं कौतुक खान्देशातील तत्कालीन साहित्यिक कै.स.सो. सुतार, कै.नारायण शिरसाळे, कै.नीळकंठ महाजन, प्राचार्य व्ही.के. भदाणे आणि माझे आई-बाबा यांनी इतकं केलं की, कविता माझ्या जगण्याचा भाग झाली. याचवेळी जळगाव आकाशवाणी केंद्राच्या युवावाणीतील ‘नवी क्षितिजे’ या सदरानं दमदार, काव्यपीठाचा आनंद पुन्हा पुन्हा दिला.कवी संमेलनं, साहित्य संमेलनं यातून थोरा-मोठ्यांच्या भेटी, काव्य चर्चा यामधून आपण काय लिहितो आणि काय लिहावं या जाणिवा अधिक दृढ होऊ लागल्या. त्यामुळे अनुष्टुभ, किर्लोस्कर, लोकप्रभा, शब्दालय, अस्मितादर्श, उगवाई, अक्षर वैदर्भी, मनोहर, किशोर, लोकमत दिवाळी अंक यासारख्या निखळ वाङ्मयीन अंकामधून माझा पुढचा लेखन काळ गडद झाला. ‘आपली कविता वाचली, खूपच छान’, ‘गझल खूपच बढीया’ अशी अभिप्रायाची पत्रं येऊ लागलीत. तो लेखन प्रकाशन काळ १९८४ ते ९४ होता. या काळानं मला भरभरून पे्रेरणा दिल्या आणि पॅपिलान प्रकाशन पुणे यांनी माझा पहिला वहिला ‘फर्मान’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. माझ्या या संग्रहाचं कौतुक डॉ.श्रीपाल सबनीस, प्राचार्य केशव मेश्राम, डॉ.जगन्नाथ कोत्तापल्ले यांनी समीक्षा लेखनातून मनस्वी केलं. या घटनेनं मी आनंदे चिंब न्हालो. साडेतीन दशकाच्या माझ्या या काव्यसाधनेनं ‘बालभारती’ (इयत्ता तिसरी), ‘युवक भारती’ (इयत्ता अकरावी), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (एम.ए. द्वितीय वर्ष), या पाठ्यक्रमात येण्याची भाग्यसंधी मला भरभरून दिली. याच काळात दिल्ली व मुंबई दूरदर्शनवरील मराठी-हिंदी मालिकांसाठी शीर्षक गीतलेखनही झालं.संपूर्ण महाराष्ट्रसह-देशासह जगाच्या नकाशावर मला घेऊन जाणाºया ‘आई! मला जन्म घेऊ दे!’ या लेक वाचवा अभियान कवितेने तर इंग्रजी भाषेसह ४५ भारतीय प्रमाण व बोली भाषेत जाण्याचा मान मिळविला. आईच्या आशीर्वादात केवढं बळ असतं याची अनुभूती मनस्वी अनुभवली. कवितेला मी आई म्हटलं तुम्हीच सांगा मित्रहो! माझं काही चुकलं का?-प्रा.वा.ना. आंधळे