शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

पाच वर्षात ७ हजार ४४० घरांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

अमळनेर : तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पारधी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत बेघर लोकांना ...

अमळनेर : तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पारधी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत बेघर लोकांना साडेसात हजार घरे देण्याचे तालुका पंचायत समितीचे उद्दिष्ट असून सुमारे ३ हजार ८४० घरे पूर्ण झाली असून नागरिकांना ती रहिवासासाठी देण्यात आली आहेत.

२०१६ ते २०२१ या पाच वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य व्यक्तींसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ५ हजार ९१४ घरांचे उद्दिष्ट आहे. त्यातील २९८९ घरे पूर्ण झाली आहेत तर २२२८ घरे अपूर्ण आहेत. शबरी आवास योजना तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती, आदिवासी लोकांसाठी शबरी आवास योजनेंतर्गत ५४१ घरांचे उद्दिष्ट आहे. नोंदणी मात्र ६५५ लोकांची झाली आहे. त्यात ३५६ घरे पूर्ण झाली आहेत तर १८५ अपूर्ण आहेत. रमाई घरकूल योजना अनुसूचित जाती मागासवर्गीय लोकांसाठी रमाई घरकूल योजना आहे. त्यासाठी ८६१ घरचे उद्दिष्ट आहे तर ९१८ जणांची नोंदणी झाली आहे. ३९२ घरे पूर्ण झाली आहेत. ४६९ घरे अपूर्ण आहेत. पारधी आवास योजना ही योजना फक्त पारधी समाजासाठी असून २०१६ ते २०१९ या तीन वर्षासाठी १२४ घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १०३ घरे पूर्ण झाली आहेत तर २१ घरे अपूर्ण आहेत. तालुक्याची ग्रामीण भागात लोकसंख्या १ लाख ९२ हजार असून ७ हजार ४४० कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट आहे. ७ हजार२२४ लोकांनी नोंदणी केली आहे. ६ हजार ८८९ लोकांची जिओ टॅगिंग झाली आहे. बँक खाते तपासून ६ हजार ४५४ लोकांना मंजुरी दिली आहे. ६ हजार १८८ लोकांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. ३ हजार ८८४ लोकांनी घरे बांधून घेतली आहेत त२ हजार ९०३लोकांची घरे अपूर्ण आहेत. प्रत्येक व्यक्तीजवळ किमान २६९ स्क्वेअर फूट जागा असावी किंवा त्यांना गावठाण , ग्रामपंचायतमार्फत जागा दिली जाते किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेत ५० हजार रुपये दिले जातात. प्रत्येकाला एकूण दीड लाख रुपये अनुदान दिले जाते.

पैसे घेतले, पण बांधकाम नाही

अनेक लोकांनी पहिला हप्ता घेऊनही घरे बांधलेली नाहीत. अमळनेर तालुक्यात महाराष्ट्रात सर्वप्रथम सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सर्व घरे व वास्तू एकाच प्रकारची दिसावी म्हणून ग्रामपंचायती, घरकुले याना मरून आणि स्किन कलर देण्यात आली आहेत.

१९-२० मध्ये घरकूल योजनेत अमळनेर तालुका नाशिक विभागात प्रथम आला होता. महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्याचा उल्लेख यशोगाथा सदरात केला होता. ज्या लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही घर बांधलेले नाही त्यांनी त्वरित घर बांधावे अन्यथा हप्ता परत घेतला जाऊ शकतो.

- संदीप वायाळ, सहाययक गटविकास अधिकारी,