शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाच वर्षात ७ हजार ४४० घरांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

अमळनेर : तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पारधी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत बेघर लोकांना ...

अमळनेर : तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पारधी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत बेघर लोकांना साडेसात हजार घरे देण्याचे तालुका पंचायत समितीचे उद्दिष्ट असून सुमारे ३ हजार ८४० घरे पूर्ण झाली असून नागरिकांना ती रहिवासासाठी देण्यात आली आहेत.

२०१६ ते २०२१ या पाच वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य व्यक्तींसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ५ हजार ९१४ घरांचे उद्दिष्ट आहे. त्यातील २९८९ घरे पूर्ण झाली आहेत तर २२२८ घरे अपूर्ण आहेत. शबरी आवास योजना तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती, आदिवासी लोकांसाठी शबरी आवास योजनेंतर्गत ५४१ घरांचे उद्दिष्ट आहे. नोंदणी मात्र ६५५ लोकांची झाली आहे. त्यात ३५६ घरे पूर्ण झाली आहेत तर १८५ अपूर्ण आहेत. रमाई घरकूल योजना अनुसूचित जाती मागासवर्गीय लोकांसाठी रमाई घरकूल योजना आहे. त्यासाठी ८६१ घरचे उद्दिष्ट आहे तर ९१८ जणांची नोंदणी झाली आहे. ३९२ घरे पूर्ण झाली आहेत. ४६९ घरे अपूर्ण आहेत. पारधी आवास योजना ही योजना फक्त पारधी समाजासाठी असून २०१६ ते २०१९ या तीन वर्षासाठी १२४ घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १०३ घरे पूर्ण झाली आहेत तर २१ घरे अपूर्ण आहेत. तालुक्याची ग्रामीण भागात लोकसंख्या १ लाख ९२ हजार असून ७ हजार ४४० कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट आहे. ७ हजार२२४ लोकांनी नोंदणी केली आहे. ६ हजार ८८९ लोकांची जिओ टॅगिंग झाली आहे. बँक खाते तपासून ६ हजार ४५४ लोकांना मंजुरी दिली आहे. ६ हजार १८८ लोकांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. ३ हजार ८८४ लोकांनी घरे बांधून घेतली आहेत त२ हजार ९०३लोकांची घरे अपूर्ण आहेत. प्रत्येक व्यक्तीजवळ किमान २६९ स्क्वेअर फूट जागा असावी किंवा त्यांना गावठाण , ग्रामपंचायतमार्फत जागा दिली जाते किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेत ५० हजार रुपये दिले जातात. प्रत्येकाला एकूण दीड लाख रुपये अनुदान दिले जाते.

पैसे घेतले, पण बांधकाम नाही

अनेक लोकांनी पहिला हप्ता घेऊनही घरे बांधलेली नाहीत. अमळनेर तालुक्यात महाराष्ट्रात सर्वप्रथम सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सर्व घरे व वास्तू एकाच प्रकारची दिसावी म्हणून ग्रामपंचायती, घरकुले याना मरून आणि स्किन कलर देण्यात आली आहेत.

१९-२० मध्ये घरकूल योजनेत अमळनेर तालुका नाशिक विभागात प्रथम आला होता. महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्याचा उल्लेख यशोगाथा सदरात केला होता. ज्या लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही घर बांधलेले नाही त्यांनी त्वरित घर बांधावे अन्यथा हप्ता परत घेतला जाऊ शकतो.

- संदीप वायाळ, सहाययक गटविकास अधिकारी,