शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

डोळे काळोखात बुडाले असताना सुखाची पहाट उगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST

पाल, ता. रावेर : काय नाही, त्यापेक्षा काया आहे... हे पाहिले असता नसल्याची खंत न वाटता आहे त्या परिस्थितीवर ...

पाल, ता. रावेर : काय नाही, त्यापेक्षा काया आहे... हे पाहिले असता नसल्याची खंत न वाटता आहे त्या परिस्थितीवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. असाच प्रत्यय येथील तिघा दिव्यचक्षू बंधुंनी दिला आहे. जन्मापासून या तिघांना दृष्टी नाही. तरीही हे अनेक कामे स्वत: करीत असून, बकऱ्या चारणे व पाला तोडून विकणे आदी कामे ते करीत असल्याने गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय ठरले आहेत.

अंधमय काळोखाला आपल्या कर्माच्या जोरावर दूर सारणारे अक्रम, आबीद व अशपाक हे तिघे सख्खे भाऊ लहानपणापासून नेत्रहीन आहेत. घरात आई, मोठा भाऊ आशिक व तीन बहीण असा त्यांचा मोठा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच दोन बहिणींचे लग्न झाले आहे. मोठा भाऊ आशिक हा गावात जे काम मिळेल ते काम करून घराचा खर्च पेलत आहे.

अक्रम, आबीद व अशपाक यानां डोळ्यांनी काहीच दिसत नसताना ते जंगलात जाऊन बकरीसाठी रोज पाला आणतात. कोणाचीही मदत न घेता झाडावर चढून पाला तोडणे व काही वेळेस विकणे हा त्यांचा दिनक्रम आहे.

दोघा भावांना अजूनही योजनेचा लाभ नाही

घरची परिस्थिती हलाखीची असून, फक्त अक्रम यास सहाशे रुपये प्रती महिना शासनाकडून मदत मिळायची आता ती रक्कम वाढली असून, प्रती महिना शासनाकडून दोन हजार रुपये मिळतात. तेही कधी कधी वेळेवर मिळत नाही, असे अक्रम सांगतो आबीद व अशपाक या दोघा भावडांना शासनाकडून अद्याप काही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांनाही मदतीची अपेक्षा आहे.नेत्रहीन असूनही स्वत:ला कुठल्याही प्रकारे कमी न समझता जिद्दीने आपला ससांराचा गाडा चालवतात.

निसर्गाच्या सानिध्यात मिळतो आनंद

दृष्टी नसली तरी त्यांचे कान हे एकप्रकारे दृष्टीचे काम करतात. बारीकसारीक आवाज ते टिपतात. जंगलात त्यांचे मन थोडे मोकळे होते. पक्ष्यांचा किलबिलाट व नदीनाल्यातील वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज हे त्यांना खूप आवडतं. तर अशपाकला यासह लता मंगेशकर यांची गाणी खूपच आवडतात.

मतदानाचा हक्कही बजावतात

दृष्टी नसल्याने तिघा भावंडांनी शाळेत पायच ठेवला नाही. असे असताना ते मतदानाचा हक्क नियमितपणे बजावतात.

पोलिसांना बोलावून त्यांच्या मदतीने ईव्हीएम मशीनचे बटन दाबून ते मतदान करतात.

आवाजावरून ओळखतात...

गावातील प्रत्येकाची नावेही या तिघा भावांना पाठ आहेत. प्रत्येकाला ते आवाजावरून ओळखतात. यामुळे तिघांचेही मित्र गावात असून, त्यांच्याशी गप्पा करणेही त्यांना आवडते. गावात या तिघा भावडाची

लॉकडाऊनमध्ये प्रचंड हाल

कोरोनामुळे लॉकडाऊन लागले असता घरात जेवढा पैसा होता तेवढा संपला. २० दिवस पुरेल एवढे राशन मोफत मिळाले. मात्र किराणासाठी पैसाच उरला नव्हता.

एकाला गावात काम नाह, तर तिघे आंधळे काय करायचे? असा प्रश्न असताना एका किरणा दुकानदाराने उधार माल दिला व ती उधारी अजूनही ते फेडत आहे. मेहनतीने जीवनात काही प्रमाणात जीवनातील अंधार तर दूर झाला आहे, मात्र खऱ्या सुखाचा उजेड कधी पडेल हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.