शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

डोळे काळोखात बुडाले असताना सुखाची पहाट उगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST

पाल, ता. रावेर : काय नाही, त्यापेक्षा काया आहे... हे पाहिले असता नसल्याची खंत न वाटता आहे त्या परिस्थितीवर ...

पाल, ता. रावेर : काय नाही, त्यापेक्षा काया आहे... हे पाहिले असता नसल्याची खंत न वाटता आहे त्या परिस्थितीवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. असाच प्रत्यय येथील तिघा दिव्यचक्षू बंधुंनी दिला आहे. जन्मापासून या तिघांना दृष्टी नाही. तरीही हे अनेक कामे स्वत: करीत असून, बकऱ्या चारणे व पाला तोडून विकणे आदी कामे ते करीत असल्याने गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय ठरले आहेत.

अंधमय काळोखाला आपल्या कर्माच्या जोरावर दूर सारणारे अक्रम, आबीद व अशपाक हे तिघे सख्खे भाऊ लहानपणापासून नेत्रहीन आहेत. घरात आई, मोठा भाऊ आशिक व तीन बहीण असा त्यांचा मोठा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच दोन बहिणींचे लग्न झाले आहे. मोठा भाऊ आशिक हा गावात जे काम मिळेल ते काम करून घराचा खर्च पेलत आहे.

अक्रम, आबीद व अशपाक यानां डोळ्यांनी काहीच दिसत नसताना ते जंगलात जाऊन बकरीसाठी रोज पाला आणतात. कोणाचीही मदत न घेता झाडावर चढून पाला तोडणे व काही वेळेस विकणे हा त्यांचा दिनक्रम आहे.

दोघा भावांना अजूनही योजनेचा लाभ नाही

घरची परिस्थिती हलाखीची असून, फक्त अक्रम यास सहाशे रुपये प्रती महिना शासनाकडून मदत मिळायची आता ती रक्कम वाढली असून, प्रती महिना शासनाकडून दोन हजार रुपये मिळतात. तेही कधी कधी वेळेवर मिळत नाही, असे अक्रम सांगतो आबीद व अशपाक या दोघा भावडांना शासनाकडून अद्याप काही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांनाही मदतीची अपेक्षा आहे.नेत्रहीन असूनही स्वत:ला कुठल्याही प्रकारे कमी न समझता जिद्दीने आपला ससांराचा गाडा चालवतात.

निसर्गाच्या सानिध्यात मिळतो आनंद

दृष्टी नसली तरी त्यांचे कान हे एकप्रकारे दृष्टीचे काम करतात. बारीकसारीक आवाज ते टिपतात. जंगलात त्यांचे मन थोडे मोकळे होते. पक्ष्यांचा किलबिलाट व नदीनाल्यातील वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज हे त्यांना खूप आवडतं. तर अशपाकला यासह लता मंगेशकर यांची गाणी खूपच आवडतात.

मतदानाचा हक्कही बजावतात

दृष्टी नसल्याने तिघा भावंडांनी शाळेत पायच ठेवला नाही. असे असताना ते मतदानाचा हक्क नियमितपणे बजावतात.

पोलिसांना बोलावून त्यांच्या मदतीने ईव्हीएम मशीनचे बटन दाबून ते मतदान करतात.

आवाजावरून ओळखतात...

गावातील प्रत्येकाची नावेही या तिघा भावांना पाठ आहेत. प्रत्येकाला ते आवाजावरून ओळखतात. यामुळे तिघांचेही मित्र गावात असून, त्यांच्याशी गप्पा करणेही त्यांना आवडते. गावात या तिघा भावडाची

लॉकडाऊनमध्ये प्रचंड हाल

कोरोनामुळे लॉकडाऊन लागले असता घरात जेवढा पैसा होता तेवढा संपला. २० दिवस पुरेल एवढे राशन मोफत मिळाले. मात्र किराणासाठी पैसाच उरला नव्हता.

एकाला गावात काम नाह, तर तिघे आंधळे काय करायचे? असा प्रश्न असताना एका किरणा दुकानदाराने उधार माल दिला व ती उधारी अजूनही ते फेडत आहे. मेहनतीने जीवनात काही प्रमाणात जीवनातील अंधार तर दूर झाला आहे, मात्र खऱ्या सुखाचा उजेड कधी पडेल हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.