शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

तलावांचे पुनर्भरण..पिकांचे सरण... आणि त्यांच्यासाठी मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : आधीच अतिपावसामुळे खरिपातील पिकांना पाणी अधिक झाले आहे. हे कमी की काय? जामदा ...

संजय हिरे

खेडगाव, ता. भडगाव : आधीच अतिपावसामुळे खरिपातील पिकांना पाणी अधिक झाले आहे. हे कमी की काय? जामदा डावा कालव्याला सोडलेल्या पाण्याच्या पाझरामुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यांतील कालव्याखालील हजारो हेक्टरवरील खरीप पिके वाया जाण्याची स्थिती आहे.

यामुळे एकीकडे तलाव व धरणांचे पुनर्भरण, त्यामुळे पिके जणू सरणावर जात आहेत. मन्याड धरणाच्या ओव्हरफ्लोमधून गिरणा नदीत वाया जाणारे पाणी मागील दहा-पंधरा दिवसांपासून जामदा डाव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. यातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलाव व भोकरबारी धरण भरण्यात येत आहेत. गिरणेवरील जामदा बंधारा येथून जामदा डावा कालवा निघातो. चाळीसगाव व भडगाव तालुक्यात जवळजवळ ५०-७० मैलांपर्यंत कालव्याची लांबी आहे. लाखो हेक्टर शेतजमीन कालव्याखाली येते.

कालव्यापासून अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत कालवा वितरिका(चाऱ्या) यातून कालव्याचे पाणी पाझरते. जामदा कालवा या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत पाझरतो. हे पाणी उतारावरील शेतजमिनीत वाहते. यामुळे सततच्या पाण्याने पिकांची मुळे पोखरून निघत आहेत. अतिपाण्याने मुळे कुजत, सडत आहेत.

कायमची डोकेदुखी

दरवर्षी पावसाळ्यात गिरणा किंवा मन्याड धरण भरल्यानंतर गिरणा नदीत वाया जाणारे पाणी या जामदा कालव्यात टाकले जाते. तेथून म्हसवे तलाव व भोकरबारी भरण्यात येते. पंधरा दिवस ते महिनाभर हे पुनर्भरण चालते. शिंदी येथील शेतकरी रमेश केशव पाटील यांनी लोकमतला आपली व्यथा मांडतांना सांगितले की, कालव्याखालील विहिरी या पाझरामुळे तुडुंब भरल्या आहेत. त्यावरून ओसंडत उभ्या कपाशीत पाणी पंधरा दिवसांपासून वाहत आहे. यामुळे संपूर्ण उत्पन्न बुडाले आहे. देवबानं झाय्

थोड्ं..पाटबंधारांनी. धाड् घोडं..! पावसाचे पाणी कमी झाले की काय? पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पाणी फिरवले. असे गाऱ्हाणे मांडले.

या कालव्याखाली जामदा, भऊर, बहाळ, गुढे, कोळगाव, शिंदी, खेडगाव ,शिवणी, वडगाव-नालबंदी, वलवाडी ते थेट आमडदेपर्यंतच्या शिवारातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.

फोटो कॅप्शनः पारोळा तालुक्यातील म्हसवे तलाव, भोकरबारी धरणात जामदा डावा कालव्यातून सोडलेले पाणी. कालव्याच्या पाझराने तुंडुंब भरलेल्या विहिरी व कपाशीत साचून राहिलेले पाणी