शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात १८ गावांतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात १८ गावांतील १८० घरांची पत्रे उडून गेली आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले. सामरोदसह परिसराचा संपर्क तुटला आहे, तसेच एक तरुण बंधाऱ्यात वाहून गेला. या घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने या गावांना मदत करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी जामनेरच्या तहसीलदार दीप शेवाळे यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे निर्देश दिले, तसेच अतिवृष्टीग्रस्त भागासाठी कोरोनाच्या अतिरिक्त १७ हजार लसी देण्यात आल्या, तसेच औषध फवारणीची तरतूद करण्याचे निर्देश दिले. सोमवारी रात्री उशिरा जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. याची माहिती मिळाल्यावर तातडीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जामनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मदतीचे निर्देश दिले. गरज भासल्यास एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याच्या सूचनाही दिल्या. महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. त्यात जामनेर तालुक्यात १७ गावांमध्ये हानी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यात हिंगणे येथे २० घरांचे, ओखर आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी ४० घरांचे पत्रे उडाले आहेत. रामपूर येथे १०, लहासर येथे १५ घरांचे पत्रे उडाले आहेत. ढालशिंगी येथे चार घरांची पडझड झाली आहे. त्यासोबत तळेगाव आणि पहूर येथे दुकानांमध्ये पाणी शिरले आहे, तर तोंडापूर येथील खडकी नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यात शेख मुसा शेख साहीर (वय ३०) हा पाण्यात वाहून गेला. अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये शाळा, मंदिरे आणि खासगी गोदामांमध्ये ग्रामस्थांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाणी ओसरल्यावर नागरिकांनी रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.