शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचे उतराई होण्याचा आगळा प्रयत्न ‘स्मृतिगंध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:46 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत लिहिताहेत जळगाव येथील विजय पाठक...

आपण समाजाचे काही देणे लागतो हे ध्यानात ठेवून समाजाप्रती उतराई होण्याचा प्रयत्न जळगाव येथील डॉ.रणजित चव्हाण करत आहे. त्यांचे वडील मालोजीराव आनंदराव चव्हाण यांचे मार्च २००४ मध्ये निधन झाले. वडिलांच्या वाढदिवशी स्मृतिप्रित्यर्थ समाजाला काही वेगळे देण्याचा संकल्प केला. त्यातून साकारला स्मृतिगंध हा कार्यक्रम.गेली १४ वर्षे सातत्य आणि कार्यक्रमाचा दर्जा राखल्याने ‘स्मृतिगंध’ सातत्याने सादर होत आहे.यंदाचे हे पंधरावे वर्ष होते. हिंदी चित्रपट संगीतात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या एसडी बर्मन आणि आर.डी.बर्मन यांची अविस्मरणीय गीते लक्षात घेऊन एस.डी. ते आर.डी. असा मोठा स्पॅन असलेला आगळा वेगळा कार्यक्रम गेल्या रविवारी आयोजित केला गेला. डॉ.रणजित, उर्मिला आणि जयश्री या भावंडांनी वडिल मालोजीराव चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कोणतीही भाषणे न होता थेट कार्यक्रमास प्रारंभ झाला. औरंगाबादच्या डॉ.अनघा मारोवार आणि पुण्याचे प्रशांत नासेरी या दोनच गायकांनी औरंगाबादच्या वाद्यवृंदाची साथ घेत मंचाचा ताबा घेतला.‘दिन ढल जाये’ या एस.डी. बर्मन यांच्या संगीताने नटलेल्या अविस्मरणीय गीताने प्रशांत नासेरींनी प्रारंभ केला आणि नंतर एसडी, आरडी यांची गाईडमधील पिया तोसे नयना लागे रे, कागज के फूलमधील कक्त ने किया क्या हसीन गम, इजाजत मधले कतरा कतरा प्रेमपुजारीचे रंगीला रे, जीवन के सफरमे राही, आनेवाला पल जानेवाला है, चिंगारी कोई भडे, व्दंव्द गीतात दे दो मेरा पाच रूपैया बारा आना, आंधीचे तुम आ गये हो नूर आ गया है, अच्छाजी मै हारी चलो मान जाओ ना, कोरा कागज था ये मन मेरा अशा अनेक जुन्या एकाहून सरस गीते सादर होत असताना वन्स मोअरची दाद आली तेव्हा निवेदक प्रफुल्ल माटेगावकर यांनी वन्समोअरऐवजी वन मोअर गीत होऊ द्या अशी रसिकांना विनंती केली. दोन गीतांमध्ये मोजक्या शब्दात निवेदन करताना संबंधीत गीतांच्या आठवणी दाद देणाऱ्या होत्या. रसिकांनी खच्चून भरलेल्या या कार्यक्रमास तरूणांपेक्षा पन्नाशी उलटलेल्या रसिकांची लक्षणीय संख्या आणि त्यांनी गाण्यांना मनापासून दिलेली दाद, प्रत्येक गीत ऐकताना रसिकांना आपल्या तारूण्याची झालेली याद यातच कार्यक्रमाचे यश आहे. मनात आले तर जयंती पुण्यतिथी किती वेगळेपणाने साजरी करता येते याचे हे आदर्श उदाहरण आहे.-विजय पाठक, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव