शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

जिल्ह्यातील ३५ व्यापाऱ्यांना बाजार समितीने दिली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बोर्डावर १३०० चा भाव असतानादेखील फक्त ७०० रुपये प्रति क्विंटलचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बोर्डावर १३०० चा भाव असतानादेखील फक्त ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात असल्याचे वृत्त लोकमतने ३० ऑगस्ट रोजी दिले होते. या प्रकरणात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ३५ केळी व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सभापती कैलास चौधरी यांनी ही नोटीस बजावली आहे.

या नोटिशीत म्हटले की, केळी हा नियंत्रित शेतीमाल आहे. मात्र त्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून ७०० रुपये प्रति क्विंटल दराने केळी विकत घेतली जात आहे. बोर्डावर भाव मात्र १३०० रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. त्यामुळे बाजार कायद्यानुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याचा लेखी खुलासा आणि १ एप्रिल ते ३१ ऑगस्टअखेर खरेदी विक्रीचे रेकॉर्ड तीन दिवसांचे आत बाजार समितीकडे सादर करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती कैलास चौधरी यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा तब्बल ५०० रुपये प्रतिक्विंटलने दर कमी मिळत असल्याचे समोर आले होते. एकीकडे बाजारात केळी चढ्या दराने विकली जात आहे. तर व्यापारी मुद्दाम बाजारात उठाव नसल्याचे कारण देत कमी दराने विकत घेत होते. शेतकऱ्यांवरील या अन्यायाला लोकमतने वाचा फोडली आहे.