शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भुसावळ येथे दगडफीकीत चार पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:10 IST

बंदला गालबोट : तीन नागरीकांनाही पोहचली इजा

 भुसावळ: नागरीकत्व दुरुस्ती कायद्यास विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे २९ ला पुकारलेल्या भारत बंद दरम्यान शहरात दोन ठिकाणी दगडफेक झाल्यामुळे या बंदला गालबोट लागले आहे. त्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीत चार पोलीस आणि तीन नागरीक किरकोळ जखमी झाले.शहरात सकाळी सुरवातीस बाजारपेठ बंद करण्यात आली होती. मात्र शनिमंदीर वार्डाकडून दुकाने बंद करण्यासाठी जमाव आला असता पोलिसांनी हा जमाव काझी प्लॉट जवळ अडविला. याप्रसंगी काही समाज कंटकांनी सुरु असलेल्या दुकानांवर दगडफेक केली. यावेळी चार पोलिस कर्मचाऱ्यासह छायाचित्रकार कमलेश चौधरी व काही नागरिकांना दगडफेकीची झळ पोहोचली. मात्र पोलिसांनी जमावाला परत फिरविण्यात यश आले. त्यानंतर हा जमाव राजा टॉवर चौकातून मॉडर्न रोडच्या दिशेने वळला. यावेळी जमावाने मॉडर्नरोडवरील हॉटेल आर्य निवासवर दगडफेक केली. यावेळी परिसरात चांगलीच धावपळ उडाली व अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. यामुळे शहरात भितीचे वातावरण व अफवांचे पेव पसरले होते. दगडफेकीच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहरात भेट देऊन पहाणी केली.रस्ता रोको चा प्रयत्न फसलाघटनेची माहिती मिळताच, डिवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार घटनास्थळी दाखल झाले. व जमावाला पांगविले. त्यानंतर जमाव पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरील खडका चौफुलीवर जमा झाला. यावेळी जमावाने रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणुन पाडला. तर खडका चौफुलीवर दुपारी १ वाजेच्या सुमारास जमाव पुुन्हा जमा झाला. यावेळी बामसेफ संघटनेचे कार्यकर्ते प्रतिभा उबाळे, एम.एम. मन्सुरे, हमीद शेख आदींनी जमावाला मार्गदर्शन केले. जोपर्यंत कायदा रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल. मैदानावरची लढाई लढतच रहा असे आवाहन केले.