शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

दीड तास होऊनही लॉगिन होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बाटू विद्यापीठांतर्गत बी. टेक, एम्. टेक बॅकलॉग परीक्षेदरम्यान दीड तासानंतरही लाॅगिन होत नसल्याने काहीकाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बाटू विद्यापीठांतर्गत बी. टेक, एम्. टेक बॅकलॉग परीक्षेदरम्यान दीड तासानंतरही लाॅगिन होत नसल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. त्यानंतर पेपर रद्द करण्यात आल्याचा संदेश आल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक, आय. टी. समन्वयक यांचा गोंधळ उडाला.

जळगाव जिल्ह्यात डॉ़. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अर्थात ‘बाटू’ विद्यापीठाशी संलग्न केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, जे. टी. महाजन, संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. बाटू अंतर्गत बी. टेक व एम्. टेक अभ्यासक्रमांच्या बॅकलॉग विषयाच्या ऑनलाईन परीक्षा ७, ८ व ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुरूवारी पहिलाच पेपर हा सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी ९.४५ पासूनच हातात मोबाईल, लॅपटॉप घेऊन बसले होते. तांत्रिक अडचण आली तर ती सोडविण्यासाठी आय. टी. समन्वयकसुध्दा सज्ज होते.

स्क्रीनवर येत होते ‘एरर’

सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी दिलेली लिंक ओपन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉगिनच होत नव्हते. तासाभरापासून हीच तांत्रिक समस्या येत असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयातील आय. टी. समन्वयकांना संपर्क साधून लॉगिन होत नसल्याचे कळवले. मात्र, तरीसुध्दा स्क्रीनवर ‘एरर’ दाखविले जात होते.

मिनिटा-मिनिटाला वाजत होती मोबाईलची रिंग

परीक्षेचा कालावधी सुरू होऊन दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतरही लॉगिन न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आय. टी. समन्वयकांना संपर्क साधण्यास सुरूवात केली. मिनिटा-मिनिटाला मोबाईल वाजत असल्यामुळे आय. टी. समन्वयकही या गोंधळामुळे हैराण झाले होते. शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांचे कॉल आल्याचे एका प्राध्यापकानी सांगितले.

आणि... परीक्षा पुढे ढकलली गेली...

लॉगिन होत नसल्यामुळे पुन्हा नापास होऊ, या भीतीमुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. शेवटी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ‘एमकेसीएल’चा परीक्षा रद्द झाल्याचा एसएमएस विद्यार्थ्यांना मिळाला. आता ७ तारखेचा पेपर १० जानेवारीला तर ८ रोजीचा १४ जानेवारीला व ९ जानेवारीचा पेपर १७ जानेवारीला होईल, असे कळविण्यात आले. दरम्यान, ऐनवेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.