शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गरजांनी हिरावून नेलं गावाचं सुख -समाधान : ओलावा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:37 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे....

धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या. आता गरजा वाढल्या, हव्यास वाढला. गावाचं सुख समाधान पार हिरावून गेलं.वीज आली आणि रॉकेलच्या दिव्यांनी टिमटिमणारं गाव विजेच्या दिव्यांनी झगमगायला लागलं. विजेच्या दिव्यांनी गावातल्या चांदण्याची रम्यता, शितलता, शांती पार विस्कटून गेली. वीजेमुळे खूप साऱ्या सुविधा आल्या पण त्या सोबत चंगळता सुद्धा आली. घरातलं जातं गेलं चक्की आली, पाटा वरवंटा गेला आणि मिक्सर आलं. झिरपणारा मातीच्या गार पाण्याचा माठ गेला आणि फ्रिज आलं. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य झाली आणि घरोघरी वीजेच्या/गॅसच्या शेगड्या ही नवीनच म्हण रुजू झाली. धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या तर आता वॉशिंग मशीन आलं. गरजा वाढल्या, हव्यास वाढला. या गरजांंनी, हव्यासानं गावाचं सुख समाधान हिरावून गेलं. आधी खेड्याच्या गरजा सिमीत होत्या. मुळातच गरजा फारशा नसल्याने गरीबीतलं गावही सुखी समाधानी होतं.पूरक मातीच्या धाब्याची घरं हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंडगार असत. या घरांमध्ये उन्हाळ्यात ही वीजेच्या पंंख्याशिवाय सुखाची गाढ झोप लागत असे. आता मातीच्या धाब्याच्या घरांच्या जागी आरसीसीची सिमेंटची घरं आली. या घरांमध्ये वीजेच्या पंख्याची हवा सुद्धा उन्हाच्या झळांसारखी गरम भासते. मग नुस्त्या पंख्यावर गरज भागत नाही, तर कुलर पाहिजे, एसी पाहिजे. सुविधा येताहेत पण सुख समाधान दूर पळतयं.गावाच्या भवतीची शेती -बागायती जाऊन त्या जागी वाड्या, वस्त्या, नगरं, कॉलन्या उभ्या राहताहेत. गाव विस्तारतंय आणि रान आकसतयं. गरजपूर्तीसाठी माणूस झापडं लावलेल्या टांग्याच्या घोड्यासारखा धाव धाव धावतोयं. धावता धावताच धाप लागून कोलमडतोयं. झापडं लावलेली असल्याने सभोवतालच्या निसर्गाच्या ºहासाशी, ढासळणाºया मानवी मुल्यांशी त्याला जणू काही काहीच देणं घेणं उरलं नाहीये. जमिनीतून वर्षाकाठी एक पीक घेणारा माणूस आता वर्षाकाठी दोन-दोन कधी तर तीन-तीन पीकं घ्यायला लागला आहे. त्यामुळे भू-गर्भातील पाण्याची पातळी खोल-खोल जातेय. जमिनीतला ओलावा आटत चाललाय. नद्या, नाले, तलावं, धरणं पाण्यावाचून ओस पडताहेत, कधी काळी गावाच्या अर्ध्या अधिक गरजा भागविणारी जीवनदायीनी नदी आजच्या काळात पाण्यावाचून पार केविलवाणी झालीयं. किनाºया लगत नदीच्या पात्रातच माणसं घरं बांधताहेत. गावभरातून जमा झालेला केरकचरा थेट नदीच्या कोरड्या पात्रात आणून टाकला जातोयं. नदीचं पार ‘डम्पिंग ग्राऊंड’ झालयं. कधी काळची जीवनदायीनी नदी आताशा अभागिनी झालीयं.बाहेर लांबून वीजेच्या दिव्यांंनी झगमगतांना दिसणारी गाव आतून मात्र पार कोलमडून पडली आहेत. आरसीसीच्या रंगीत घरात राहणारा, कुलरच्या गार हवेत विसावणारा गाव, चकचकीत डांबरी रस्ते झाले म्हणून मोटार सायकलवरून सुसाट धावणारा गाव, उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी मात्र मैलोनमैल वणवणाताना दिसतो. गावाच्या अभावग्रस्त जगण्याची वणवण अजून तरी थांबलेली दिसत नाही. भौतिक सुविधांच्या आधुुनिक जगण्यात गावाचा मानसिक तोल मात्र पार बिघडून गेलाय, विस्कटून गेलाय, म्हणूनच गाव हळूहळू आत्मघाताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय.- रवींद्र पांढरे, पहूर (पेठ), ता.जामनेर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर