शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गरजांनी हिरावून नेलं गावाचं सुख -समाधान : ओलावा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:37 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे....

धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या. आता गरजा वाढल्या, हव्यास वाढला. गावाचं सुख समाधान पार हिरावून गेलं.वीज आली आणि रॉकेलच्या दिव्यांनी टिमटिमणारं गाव विजेच्या दिव्यांनी झगमगायला लागलं. विजेच्या दिव्यांनी गावातल्या चांदण्याची रम्यता, शितलता, शांती पार विस्कटून गेली. वीजेमुळे खूप साऱ्या सुविधा आल्या पण त्या सोबत चंगळता सुद्धा आली. घरातलं जातं गेलं चक्की आली, पाटा वरवंटा गेला आणि मिक्सर आलं. झिरपणारा मातीच्या गार पाण्याचा माठ गेला आणि फ्रिज आलं. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य झाली आणि घरोघरी वीजेच्या/गॅसच्या शेगड्या ही नवीनच म्हण रुजू झाली. धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या तर आता वॉशिंग मशीन आलं. गरजा वाढल्या, हव्यास वाढला. या गरजांंनी, हव्यासानं गावाचं सुख समाधान हिरावून गेलं. आधी खेड्याच्या गरजा सिमीत होत्या. मुळातच गरजा फारशा नसल्याने गरीबीतलं गावही सुखी समाधानी होतं.पूरक मातीच्या धाब्याची घरं हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंडगार असत. या घरांमध्ये उन्हाळ्यात ही वीजेच्या पंंख्याशिवाय सुखाची गाढ झोप लागत असे. आता मातीच्या धाब्याच्या घरांच्या जागी आरसीसीची सिमेंटची घरं आली. या घरांमध्ये वीजेच्या पंख्याची हवा सुद्धा उन्हाच्या झळांसारखी गरम भासते. मग नुस्त्या पंख्यावर गरज भागत नाही, तर कुलर पाहिजे, एसी पाहिजे. सुविधा येताहेत पण सुख समाधान दूर पळतयं.गावाच्या भवतीची शेती -बागायती जाऊन त्या जागी वाड्या, वस्त्या, नगरं, कॉलन्या उभ्या राहताहेत. गाव विस्तारतंय आणि रान आकसतयं. गरजपूर्तीसाठी माणूस झापडं लावलेल्या टांग्याच्या घोड्यासारखा धाव धाव धावतोयं. धावता धावताच धाप लागून कोलमडतोयं. झापडं लावलेली असल्याने सभोवतालच्या निसर्गाच्या ºहासाशी, ढासळणाºया मानवी मुल्यांशी त्याला जणू काही काहीच देणं घेणं उरलं नाहीये. जमिनीतून वर्षाकाठी एक पीक घेणारा माणूस आता वर्षाकाठी दोन-दोन कधी तर तीन-तीन पीकं घ्यायला लागला आहे. त्यामुळे भू-गर्भातील पाण्याची पातळी खोल-खोल जातेय. जमिनीतला ओलावा आटत चाललाय. नद्या, नाले, तलावं, धरणं पाण्यावाचून ओस पडताहेत, कधी काळी गावाच्या अर्ध्या अधिक गरजा भागविणारी जीवनदायीनी नदी आजच्या काळात पाण्यावाचून पार केविलवाणी झालीयं. किनाºया लगत नदीच्या पात्रातच माणसं घरं बांधताहेत. गावभरातून जमा झालेला केरकचरा थेट नदीच्या कोरड्या पात्रात आणून टाकला जातोयं. नदीचं पार ‘डम्पिंग ग्राऊंड’ झालयं. कधी काळची जीवनदायीनी नदी आताशा अभागिनी झालीयं.बाहेर लांबून वीजेच्या दिव्यांंनी झगमगतांना दिसणारी गाव आतून मात्र पार कोलमडून पडली आहेत. आरसीसीच्या रंगीत घरात राहणारा, कुलरच्या गार हवेत विसावणारा गाव, चकचकीत डांबरी रस्ते झाले म्हणून मोटार सायकलवरून सुसाट धावणारा गाव, उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी मात्र मैलोनमैल वणवणाताना दिसतो. गावाच्या अभावग्रस्त जगण्याची वणवण अजून तरी थांबलेली दिसत नाही. भौतिक सुविधांच्या आधुुनिक जगण्यात गावाचा मानसिक तोल मात्र पार बिघडून गेलाय, विस्कटून गेलाय, म्हणूनच गाव हळूहळू आत्मघाताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय.- रवींद्र पांढरे, पहूर (पेठ), ता.जामनेर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर