शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

घणकचरा प्रकल्प जैसे थे स्थितीत

By admin | Updated: February 9, 2017 00:27 IST

२००४ मध्ये झाली होती सुरुवात : आता नव्याने प्रक्रिया राबविण्याची गरज

भुसावळ : जिल्ह्यात सर्वात मोठी  आणि सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या  भुसावळ नगरपालिकेचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि पालिकेच्या आर्थिक  स्थितीत वाढ होणारा महत्त्वाकांक्षी घनकचरा प्रकल्प तब्बल आठ वर्षांपासून जैसे थे स्थितीत असल्याची स्थिती आहे.भुसावळ तालुक्यातील आणि शहरापासून साधारण पंधरा कि. मी. अंतरावरील गोजोरे गावा लगत  भुसावळ नगरपालिकेचा हा घनकचरा प्रकल्प सध्या धूळ खात पडून असल्याचे वास्तव आहे.मधल्या काळात या प्रकल्पाकडे शासन व लोकप्रतिनिधी या पैकी कोणीही ढुंकून पाहिले नाही. त्यामुळे हा प्रकल्प केवळ नावाला असल्याची स्थिती आहे.भुसावळ नगरपालिका ही जिल्हा आणि नाशिक विभागातील सर्वात मोठी व ‘अ’वर्ग नगरपालिका आहे. तिचा अर्थसंकल्पही १०० कोटींचा आहे, असे असताना त्याकाळी महाराष्ट्र शासनाने सूचविलेला घनकचरा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.नव्याने प्रकल्पाची गरजभुसावळ शहरातून निघणारा हजारो टन कचºयावर प्रक्रिया करुन त्यापासून उपयुक्त असे शेतीसाठीचे खत तयार करण्यासाठी हा घनकचरा प्रकल्प त्याकाळी आकारास येण्यासाठी सुरू करण्यात आला होता. आता त्याची स्थिती पूर्वीसारखीच आहे. त्यामुळे तो नव्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले प्रकल्पासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यासाठी सहा महिने लागतील. नवीन एजन्सी नेमावी लागेल. रस्त्यावरील व घराघरांमधील कचरा गोजोरे येथे नेवून त्या ठिकाणी सायंटिफिक ‘डंपिंग ग्राऊंड तयार करण्यात येईल, असे बी.टी.बाविस्कर यांनी सांगितले. तेथे आधीच उभारण्यात आलेल्या फलाटावर रोज एक या प्रमाणे कचºयाचे ४६ ढिग तयार केले जातील. त्यावर प्रक्रिया केली जाईल. फवारणी केली जाईल. पहिल्या दिवशी तयार केलेल्या ढिगाचा कचरा कुजल्यानंतर तो सायंटिफिक जाळीने गाळल्यानंतर त्यातून खत तयार केले जाणार असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)२४ प्रभाग भुसावळ शहरात २४ प्रभाग आहेत. पालिकेत ४८नगरसेवक आहेत. ४८ वॉर्ड आहेत.या सर्व वार्डातून जमा होणारा कचरा गोजोरे येथे नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा बंद पडलेला पालिकेचा घनकचरा प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्यावर विद्यमान प्रशासनाने तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वच्छ महाराष्ट्र भुसावळ पालिका प्रशासन सध्या महाराष्टÑ शासनाचे स्वच्छ अभियान राबवित आहे.अभियानांतर्गत बंद पडलेला प्रकल्प सुरू केला तर शहराची स्वच्छतेकडे वाटचाल होईल.सध्या शहरातील कचरा महमार्गाच्या बाजुला फेकला जातो.सहा महिन्याचा कालावधी घनकचरा प्रकल्प उभारुन कचºयाची विल्हेवाट लावणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. बंद पडलेला घन कचरा प्रकल्पाची नव्याने उभारणी होईल.त्यासाठी सहा महिने लागतील. नवीन एजन्सी त्यासाठी नेमण्यात येईल.घराघरातील व रस्त्यावरील कचरा वाहून नेऊन गोजोरे येथे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सायंटिफिक डंपींग ग्राऊंड तयार करण्यात येईल.मुंबईच्या मक्तेदाराकडे होती जबाबदारी४साधारण २००८ मध्ये भुसावळ पालिकेने गोजोरे येथे घन कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे पाच हेक्टर जागा खरेदी केली होती. त्यावर हा प्रकल्प उभारण्यासाठी बांधकामदेखील करण्यात आले आहे, मात्र पुढे गती मिळाली नाही, असे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले.कुठेही कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी४सध्या भुसावळ शहरातून गोळा होणारा कचरा महामार्ग आणि शहराच्या बाहेर कुठेही टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी निश्चित अशा डंपिंग ग्राऊंडची व्यवस्था नाही. त्यामुळे कधी खेडी रोडवर. कधी वांजोळा रोडवर तर उड्डाण पुला लगत महामार्गाच्या बाजला कचरा टाकला जातो. त्याचा लोकांना त्रास होतो.काम पूर्ण झालेच नसल्याने नुकसान४गोजोरे येथे घनकचरा उभारण्याचे काम मुंबईच्या मक्तेदाराला दिले. त्याने सुरुवातीला काही काम केले. नंतर ते बंद पडले. त्याकडे तेव्हा लक्ष देण्यात आले नाही. आता हा प्रकल्प सुरू करण्यासाठी विचार केला जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी दिली.