शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

जळगाव : ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो. गेल्या काही दिवसांपासून जळगाव आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. ...

जळगाव : ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो. गेल्या काही दिवसांपासून जळगाव आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येतात. त्याचा परिणाम अस्थमाचा त्रास होण्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ज्या रुग्णांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांनी त्याची आधीच काळजी घेणे, अपेक्षित आहे.

सध्याच्या काळात सूर्यप्रकाश कमी येतो. त्यामुळे रोगाला कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण देखील वाढते. या काळात सर्दी-खोकला वाढतो. अनेकांना आधीच दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्ये देखील बालदम्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे. त्यांनी त्याची काळजी घेणे गरजेचे असते.

तसेच दम्यामुळे प्रतिकारशक्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, दम्याच्या उपचारासाठी स्टेरॉईड्स घ्यावे लागतात. त्यामुळे अनेकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अन्य व्याधीही याच काळात जडतात.

बालकांनाही अस्थमा

बालकांना आधी सर्दी -खोकला होतो. मग दम लागतो, अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे, तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे, असे उपाय करावे लागत असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी दिली. तसेच गरजेच्या वेळी वैद्यकीय सल्ला आणि मदत अवश्य घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

ही घ्या काळजी

ज्यांना दमा आहे. त्यांनी आधीपासूनच थंड वातावरणात जाऊ नये, आपल्याला डॉक्टरांनी दिलेली औषधी कायम जवळ बाळगावी, तसेच ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. तसेच संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

पावसाळी हवामानात काळजी घ्या

या काळात सूर्यप्रकाश कमी असल्याने अनेक संसर्ग वाढतात. ज्यांना दम्याचा त्रास आहे. अशांनी आपली औषधी आणि पंप कायम जवळ ठेवावेत. योग्य वेळी पंप न मिळाल्यास त्याचा परिणाम दम्याचा त्रास वाढण्यात होतो. - प्रा. डॉ. विजय गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय