शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

जळगाव : ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो. गेल्या काही दिवसांपासून जळगाव आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. ...

जळगाव : ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो. गेल्या काही दिवसांपासून जळगाव आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येतात. त्याचा परिणाम अस्थमाचा त्रास होण्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ज्या रुग्णांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांनी त्याची आधीच काळजी घेणे, अपेक्षित आहे.

सध्याच्या काळात सूर्यप्रकाश कमी येतो. त्यामुळे रोगाला कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण देखील वाढते. या काळात सर्दी-खोकला वाढतो. अनेकांना आधीच दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्ये देखील बालदम्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे. त्यांनी त्याची काळजी घेणे गरजेचे असते.

तसेच दम्यामुळे प्रतिकारशक्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, दम्याच्या उपचारासाठी स्टेरॉईड्स घ्यावे लागतात. त्यामुळे अनेकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अन्य व्याधीही याच काळात जडतात.

बालकांनाही अस्थमा

बालकांना आधी सर्दी -खोकला होतो. मग दम लागतो, अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे, तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे, असे उपाय करावे लागत असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी दिली. तसेच गरजेच्या वेळी वैद्यकीय सल्ला आणि मदत अवश्य घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

ही घ्या काळजी

ज्यांना दमा आहे. त्यांनी आधीपासूनच थंड वातावरणात जाऊ नये, आपल्याला डॉक्टरांनी दिलेली औषधी कायम जवळ बाळगावी, तसेच ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. तसेच संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

पावसाळी हवामानात काळजी घ्या

या काळात सूर्यप्रकाश कमी असल्याने अनेक संसर्ग वाढतात. ज्यांना दम्याचा त्रास आहे. अशांनी आपली औषधी आणि पंप कायम जवळ ठेवावेत. योग्य वेळी पंप न मिळाल्यास त्याचा परिणाम दम्याचा त्रास वाढण्यात होतो. - प्रा. डॉ. विजय गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय