शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सततच्या लॉकडाऊनने वाढवले मुलांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने व वाढत्या कोरोनामुळे मुले जवळपास घरातच असून, मोबाईल आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने व वाढत्या कोरोनामुळे मुले जवळपास घरातच असून, मोबाईल आणि टीव्हीवरच त्यांचा दिवस जात आहे. परिणामी मुलांचे वजन वाढण्याचे प्रमाण वाढण्यासह त्यांची जीवनशैलीदेखील बदलत आहे. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल आवश्यक असून, त्यांच्या खाण्या-पिण्यावरही पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला बालतज्ज्ञ डॉक्टर व आहार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढून लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. या काळात शाळा बंद असल्याने लहान मुले घरातच आहेत. त्यात मध्यंतरी शाळा सुरू झाल्या तरी संसर्ग वाढल्याने त्या पुन्हा बंद झाल्या. लॉकडाऊन तसेच इतर निर्बंधांमुळे शाळा, उद्याने, मैदाने बंद असल्याने मुले घराच्या बाहेर पडणे बंद झाले आहे. मुले घरातच असल्याने त्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे.

लॉकडाऊन काळात मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलांना घराबाहेर पाठवणे कठीण झाल्याने पालक हा धोकाही पत्करत नाहीत. त्यामुळे बैठ्या उपक्रमांचे परिवर्तन ‘स्क्रीन टाईम’ वाढण्यात झाले. टी. व्ही. किंवा मोबाईलसमोर जेवण केल्याने त्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. या काळात बैठ्या जीवनशैलीत वाढ होत असल्याने शरिरात अतिरिक्त कॅलरीज् वाढत जाऊन स्थुलता वाढीस लागते. त्यामुळे मुलांचे वजन वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुलांनी हे करावे

लॉकडाऊनमध्ये मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने त्यांच्या जीवनशैलीचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी पॅकेज फूडचे प्रमाण कमी करत जेवणात पुरेसा आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, शारीरिक हालचालीसाठी विविध खेळ खेळावे, झोप पुरेशी घ्यावी. स्क्रीन टाईम कमी करत पुस्तके-व्यायाम यासारख्या उपक्रमांमध्ये गुंतवून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे नियोजन पालकांनी केले पाहिजे, असा सल्ला आहारतज्ज्ञ निनाद चौधरी यांनी दिला.

मुलांनी हे टाळावे

मोबाईल, टी. व्ही. पाहताना जेवण करू नये, मुले घरातच राहात असल्याने त्यांनी स्क्रीनसमोर जास्त राहू नये व रात्री जागरण करू नये, ज्या प्रकारचे अन्न खाण्याची सवय मुलांना लागते, ती सवय नंतर बदलणे कठीण होऊन बसते आणि मुलांना या सवयींचा भविष्यात त्रास होतो. त्यामुळे नियमितपणे गोड पदार्थ, पॅकेज फूड खायची सवय मुलांना लावू नये, असाही सल्ला दिला जात आहे.

या कारणांमुळे वाढतेय मुलांचे वजन

लॉकडाऊनच्या काळात मुले घराबाहेर न पडल्याने संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले, हा एक फायदा याकाळात झाला आहे. मात्र, शारीरिक व्यायाम बंद झाला व घरी केवळ खाणेच सुरू असल्याने कधी नव्हे एवढे वजन मुलांचे वाढले आहे. मुलांचे बाहेर पडणे बंद झाल्याने ते सतत स्क्रीनसमोर राहात आहेत. या बैठ्या सवयीमुळेही मुलांच्या वजन वाढीला मदत होत आहे.

- डॉ. विश्वेश अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ

शाळा बंद त्यामुळे अभ्यासही ऑनलाईन होण्यासह मुले इंटरनेट व टी. व्ही.कडे अधिक वळली आहेत. दिवसभर ती बसून राहात असल्याने त्यांचे वजन वाढले आहे. मैदान, शाळा बंद असल्याने हालचालीही होत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे. मुलांना मोबाईल दाखवून जेवू घालणे चुकीचे असून, त्यामुळे मुले चिडखोर, विक्षिप्त होतात. त्यामुळे असे प्रकार टाळले पाहिजे.

- डॉ. राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ.

लाॅकडाऊनच्या काळात मुले घराबाहेर पडतच नसल्याने बसून-बसून त्यांचे वजन वाढत आहे. घरातच असल्याने खाणे व मोबाईल, टी. व्ही.मुळे जागरण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या शरिरावर परिणाम होत आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळावे, शारीरिक हालचाली कराव्यात, सकाळी लवकर उठावे.

- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ.