शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

कृषी कायद्यांचा चकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST

लेखक - ॲड. एस. बी. नाना पाटील, चोपडा. (समन्वयक, शेतकरी कृती समिती) केंद्र सरकारचे कृषी कायदे अमृताचे लेबल ...

लेखक - ॲड. एस. बी. नाना पाटील, चोपडा. (समन्वयक, शेतकरी कृती समिती)

केंद्र सरकारचे कृषी कायदे अमृताचे लेबल लावून राज्य सरकार लागू करीत आहे. केंद्र व राज्य सरकारचे कायदे म्हणजे एक चकवाच आहे. म्हणजे शेतकरी मरण पक्के एवढेच.

शेतकरी करार कायदादेखील केंद्र सरकारच्या कायद्यासारखाच फसवा आहे. थोडी भाषाशैली बदल केली आहे. उदा : एकीकडे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करता येणार नाही, असे म्हणायचे व दुसरीकडे दोन वर्षांसाठी घेणारा व देणारा दोघे परस्पर सहमतीने कमी दराने तो करार दोन वर्षांसाठी करार करू शकतील, असे म्हणायचे. तसेच ज्यांची किमान आधारभूत किंमत ठरत नाही. त्याबाबतीत सहमतीने दर ठरेल असे म्हटल्याने साऱ्या पिकांच्या उत्पादन खर्चावर आधारित दर ठरविण्याची जबाबदारी सरकार टाळत आहे.

व्यापाऱ्यांनी किमान हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केला तर गुन्हा आहे व त्याला पळवाट आहे? शेतकरी जेव्हा करार करतो त्यावेळेस त्याची आर्थिक अडचण असते. त्या पिकांसाठी करारानुसार व इतर साऱ्या पिकांचादेखील उत्पादन खर्चावर आधारित किंमत ठरवून शेतकऱ्यांना त्यानुसार करार करणे सोपे जाईल.

बऱ्याच वेळेस व्यापारी भाव पडल्यास काहीही कारणाने तो माल घेणे टाळतात. त्यामुळेच करार रद्द होतो अशा वेळेस शेतकरी पूर्ण उद्‌ध्वस्त होतो.

त्यासाठी करारात ठरलेले दर व त्यादिवशीचे प्रत्यक्षात त्या बाजार समितीतील दर यातील रक्कम सरकारने शेतकऱ्याला द्यावी. ती रक्कम शेतकऱ्याला पीकविमा, पीककर्ज, मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठीच खर्च करता येईल, यासाठी रक्कम राखीव ठेवावी. असे केल्यास व्यापारी व शेतकरी संघर्ष टळेल.

जीवनावश्यक वस्तू कायदा(दुरुस्ती) : या कायद्याने केंद्र सरकारने जे हातात घेतले तेच काम राज्य सरकार करणार आहे.

राज्य सरकार केंद्राप्रमाणे युद्ध, दुष्काळ व भाववाढ झाल्यास हा कायदा वापरणार आहे. त्यातदेखील फळ पिके किंवा कांद्यासारखे पिकांचे भाव दुप्पट झाले किंवा इतर पिकांचे भावात ५० टक्के भाव वाढ झाली की ह्या कायद्यान्वये साठ्यावर मर्यादा येतात. विशेष म्हणजे केंद्राप्रमाणे ती मर्यादा प्रक्रिया करणारे उदा. डाळ तयार करणाऱ्या किंवा ती पॅकिंग करणाऱ्या यांच्यावर बंधन नसेल तर हरभरा, तूर, मूग हे घेणारे व्यापारी व शेतकऱ्यांना लागू राहील.

राज्याने केंद्र सरकारला जो किमान आधारभूत भाव ठरविण्यासाठी उत्पादन खर्च अधिक १५ टक्के नफा धरून भाव कळविला आहे, त्यापेक्षा केंद्राने ४० टक्के कमी भाव ठरविला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात ५० टक्के जेव्हा सरकारला महागाई वाटेल तेव्हा त्यांनी सुचविली ती किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळण्याची वेळ असेल व ती मिळू नये, म्हणून हा कायदा आहे का?

व्यापार व वाणिज्य कायदा शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा : यातदेखील केंद्र सरकारने केलेला कायद्यासारखा थोडाफार बदल करून लागू करण्याचा राज्याचा विचार आहे. यात प्रांत व जिल्हाधिकारी ऐवजी स्वतंत्र न्याय व्यवस्था निर्माण करून लवकर निर्णय दिला जाईल. असे जरी सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त पैसे बुडतात बाहेरचे फळपीक किंवा कांद्यासारख्या पिकांमध्ये व त्या व्यापाऱ्यांना लायसन्सची गरज नाही, असे केंद्र सरकारप्रमाणे सांगायचे. त्या व्यापाऱ्यांची कुठे तरी नोंदणी असावी म्हणजे आपल्या स्थानिक व्यापारी/आडते असो की शेतकरी त्यांचे पैसे त्याने बुडविले तर तुमचा न्याय मागता येईल. सद्य:स्थितीत ही दुरुस्ती म्हणजे शुद्ध धूळफेक आहे.

त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेले कृषी विधेयके हे थातूरमातूर दुरुस्त्या करून शेतकऱ्यांना फसविणारेच आहेत.

जर राज्य सरकार शेतकऱ्यांना खरोखर न्याय देण्याचे भूमिकेत असेल तर जो कुणी कृषीविषयक व्यापार करू इच्छित असेल त्याला जसे बांधकाम कॉन्ट्रॅक्टरला शासन काम देताना त्याचे किती कोटीपर्यंत काम द्यावे याचे निकष आहेत, तसे त्याच्या प्रॉपर्टीच्या किमतीनुसार त्याला तेवढा व्यापार करण्याचे लायसन्स द्यावे म्हणजे त्यांच्याकडे पैसे बुडाले तर ते महसूल वसुली कायद्यान्वये वसूल होतील, अन्यथा कायदा करून उपयोग नाही.

महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने जो शेतमालाच्या आधारभूत किमतीसाठी उत्पादन खर्च अधिक दर केंद्राला कळविला आहे, तो बाजारपेठेत शेतकऱ्यांना न मिळाल्यास भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याची भरपाई देण्यात येईल व ती रक्कम शेतकऱ्यांना पीककर्ज, विमा, आरोग्य, शिक्षण यासाठीच फक्त वापरता येईल असा कायदा करावा. म्हणजे एकही शेतकरी थकबाकीदार राहणार नाही व सरकारकडे भीक मागणार नाही, यासाठी गरज आहे सरकारच्या प्रामाणिक हेतूची.