शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मोठे ते खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST

रात्रीचे दहा वाजले होते. संग्रामचा फोन आला. ‘हॅलो, हॅलो... योगेश कुठे आहेस?’ ‘अरे मी इथेच आहे? थोडा मित्रांबरोबर चहा ...

रात्रीचे दहा वाजले होते. संग्रामचा फोन आला. ‘हॅलो, हॅलो... योगेश कुठे आहेस?’ ‘अरे मी इथेच आहे? थोडा मित्रांबरोबर चहा पितोय, गप्पा मारतोय, बोल ना काय काम आहे.’ ‘अरे योगेश मी आज सकाळीच आलो आहे. थोडे विद्यापीठामध्ये काम होते आणि आज दिवसभरातील कामे आटोपून घेतली. उद्या मला गावाकडे जायचे आहे? पण जाता जाता गुरुजींना भेटायचे आहे. तुला वेळ असेल तर उद्या सकाळी आठ- साडेआठदरम्यान त्यांना भेटू.’ मी होकार दिला व त्याला सांगितले की, ‘तू निघताना मला फोन कर. मी रस्त्यात येऊन थांबतो. मग आपण दोघं मिळून गुरुजींना भेटायला जाऊ, ठीक आहे, गुड नाईट.’ गुरुजी तसे प्रख्यात लेखक, साहित्यिक, विचारवंत, अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

ते संग्रामला वरवरचा जीव लावायचे. संग्राम त्यांचा विद्यार्थी होता. तरीपण अधूनमधून संग्राम म्हणायचा, अरे, सर जरी अशा प्रकारचे असतील तरीपण म्हणावे तेवढे लक्ष देत नाहीत. स्वतःचा मोठेपणा, स्वार्थीपणा, पैसे कमावणे, माणसाला वापरून घेणे, एवढेच काम ते फार जोमाने करतात.

स्वतःचे नाव व्हावे त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.

तरीपण ते जरी तसे असले तरी आपण मानवता, माणुसकी टिकवून ठेवली पाहिजे. त्यामुळे आपण भेटले पाहिजे. तसे पाहिले तर मलाही त्यांना भेटावसे वाटत नाही... कारण त्यांनी माझ्यासाठी म्हणावे तेवढे काही केले नाही किंवा मी मोठं व्हावं त्यासाठीही मलाच काय माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ते संधीही देत नव्हते; परंतु त्यांचा जवळचा कोणी असेल, नातेवाईक असेल तो त्यांना जरी भेटत नसेल, त्यांच्याकडे येत नसेल तरी पण त्याला मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी फार प्रयत्न करायचे. माझ्यासारख्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या कामासाठी वापरून घ्यायचे.

तसा संग्राम संवेदनशील, भावनाशील आणि विचारशील होता. तत्त्वाला जागणारा होता. तोही कधी- कधी सरांचा राग- राग करायचा. कारण सर बोलायचे वेगळे, करायचे वेगळे आणि वागायचे वेगळेच. हे त्याला बघवत नव्हते. त्यामुळे त्याला

सरांचा राग, चीड, संताप येत होता.

सकाळी सकाळी साडेसात- पावणेआठदरम्यान संग्रामचा फोन आला. ‘हॅलो योगेश झाला तयार. मी निघतोय आता. अर्ध्या तासात तिथे पोहोचतो. तू लवकर ये. उशीर करू नकोस. मला पुढे जायचे आहे.’ मी म्हणालो, ‘ठीक आहे, मी तयारच आहे. मी येतो.’ घाईघाईने संग्रामने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघालो. कारण आपण वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे. तसा मी पोहोचलो. संग्रामही अगदी पाच मिनिटांत तिथे आला. त्याने गाडी थांबवली. पुढचा गाडीचा दरवाजा उघडून मी त्याच्याजवळ बसलो. त्याला आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

कारण आम्ही असे खूप दिवसांनी भेटलो होतो. थोड्या गप्पा झाल्या. रस्त्यात सरांच्या घरांच्या अलीकडे एक चांगले हॉटेल होते. तिथे आम्ही चहा घेतला. थोड्या गप्पा मारल्या. संग्रामचे कुटुंब सोबत होते. सरांना संग्रामने फोन केला. हॅलो, ‘नमस्कार सर, संग्राम बोलतोय... इथे आलो होतो. रात्री फोन केला होता, गावाकडे जायला निघालो आहे. जाता जाता आपल्याला भेटावं म्हणून तुमच्या घराच्या बाजूनं जातो आहे.’

‘हा हा याना घरी, मी आहेच घरी...’ आम्ही सरांच्या घरी पोहोचलो. सर एकटेच घरी होते. पेपर वाचत बसले होते. या म्हणाले, आम्ही जाऊनघरात बसलो. सरांनी इकडच्या-तिकडच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. गप्पा मारून दहा-पंधरा मिनिटे झाली की, सरांचे लक्ष संग्रामच्या मुलाकडे गेले. सर आतमध्ये गेले व त्यांनी बिस्किटाचा अर्धा पुडा संग्रामच्या मुलाच्या हातावर टेकवला व म्हणाले, ‘रात्री नातवंड आले होते. त्यांना बिस्किटाचा बॉक्स आणला होता. त्यातील बिस्किटे आहेत, अजून देऊ का?’ सर खुर्चीवर बसले. संग्राम आणि मी त्या मुलाच्या हातात दिलेल्या बिस्किटांकडे पाहत होतोत. मी संग्रामकडे आणि संग्राम माझ्याकडे पाहत होता. दोघांचे लक्ष एकदाच त्या बिस्किटाच्या पुड्याकडे गेल्यामुळे दोघेही समजून गेलो. तसा मी संग्रामला बाहेर निघण्याचा इशारा केला. दोघेही बाहेर आलो. मी संग्रामला म्हणालो, आपली खूप दिवसांनी भेट झाली आहे. तुम्हाला तिथपर्यंत मी सोडतो. आपण नाश्ता करू आणि मग तू मात्र पुढे जा. गावाकडे जायला तुला वेळ होईल. त्यामुळे नाश्ता करू. त्या हॉटेलवर पोहोचलो. खाली उतरलो. वेटरला ऑर्डर दिली. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता संग्रामला म्हणालो, अरे हा माणूस किती श्रीमंत आहे, किती पैशावाला आहे, किती पैसे कमवतो आहे आणि त्यांनी मात्र आपल्या या छोट्या बाळाच्या हातामध्ये बिस्किटांचा अर्धा पुडा टेकवला. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. खरेतर समाजातील अनेक लोक मार्गदर्शन, संस्कार करत असतात. त्यांच्याकडे समाज आदर्श म्हणून

पाहत असतो; पण तेच जर आज अशा कोत्या मनाने वागत असतील, तर समाजाचे काय भले होणार? ज्यांचे पोट हातावर आहे, ज्यांच्या घरी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अशांच्या घरी कुणी एखादा पाहुणा गेला, तर बाळाचं कौतुक केलं जातं.

त्याच्या बाळाला संपूर्ण बिस्किटाचा पुडा दिला जातो अन्‌ मोठ्या म्हणून घेणाऱ्या खोट्या आणि छोट्या मनाच्या माणसानं हे कृत्य

करणं किती वाईट आहे. अशीच माणसं आज समाजाला फसवत आहेत. हे समाजाच्या वेळीच लक्षात यायला हवं. खरंच मोठे ते खोटे असतात. तेच खरं आहे.