शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
4
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
5
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
6
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
7
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
8
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
10
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
11
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
12
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
13
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
14
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
15
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
17
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
18
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
19
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
20
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

मोठे ते खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST

रात्रीचे दहा वाजले होते. संग्रामचा फोन आला. ‘हॅलो, हॅलो... योगेश कुठे आहेस?’ ‘अरे मी इथेच आहे? थोडा मित्रांबरोबर चहा ...

रात्रीचे दहा वाजले होते. संग्रामचा फोन आला. ‘हॅलो, हॅलो... योगेश कुठे आहेस?’ ‘अरे मी इथेच आहे? थोडा मित्रांबरोबर चहा पितोय, गप्पा मारतोय, बोल ना काय काम आहे.’ ‘अरे योगेश मी आज सकाळीच आलो आहे. थोडे विद्यापीठामध्ये काम होते आणि आज दिवसभरातील कामे आटोपून घेतली. उद्या मला गावाकडे जायचे आहे? पण जाता जाता गुरुजींना भेटायचे आहे. तुला वेळ असेल तर उद्या सकाळी आठ- साडेआठदरम्यान त्यांना भेटू.’ मी होकार दिला व त्याला सांगितले की, ‘तू निघताना मला फोन कर. मी रस्त्यात येऊन थांबतो. मग आपण दोघं मिळून गुरुजींना भेटायला जाऊ, ठीक आहे, गुड नाईट.’ गुरुजी तसे प्रख्यात लेखक, साहित्यिक, विचारवंत, अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

ते संग्रामला वरवरचा जीव लावायचे. संग्राम त्यांचा विद्यार्थी होता. तरीपण अधूनमधून संग्राम म्हणायचा, अरे, सर जरी अशा प्रकारचे असतील तरीपण म्हणावे तेवढे लक्ष देत नाहीत. स्वतःचा मोठेपणा, स्वार्थीपणा, पैसे कमावणे, माणसाला वापरून घेणे, एवढेच काम ते फार जोमाने करतात.

स्वतःचे नाव व्हावे त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.

तरीपण ते जरी तसे असले तरी आपण मानवता, माणुसकी टिकवून ठेवली पाहिजे. त्यामुळे आपण भेटले पाहिजे. तसे पाहिले तर मलाही त्यांना भेटावसे वाटत नाही... कारण त्यांनी माझ्यासाठी म्हणावे तेवढे काही केले नाही किंवा मी मोठं व्हावं त्यासाठीही मलाच काय माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ते संधीही देत नव्हते; परंतु त्यांचा जवळचा कोणी असेल, नातेवाईक असेल तो त्यांना जरी भेटत नसेल, त्यांच्याकडे येत नसेल तरी पण त्याला मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी फार प्रयत्न करायचे. माझ्यासारख्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या कामासाठी वापरून घ्यायचे.

तसा संग्राम संवेदनशील, भावनाशील आणि विचारशील होता. तत्त्वाला जागणारा होता. तोही कधी- कधी सरांचा राग- राग करायचा. कारण सर बोलायचे वेगळे, करायचे वेगळे आणि वागायचे वेगळेच. हे त्याला बघवत नव्हते. त्यामुळे त्याला

सरांचा राग, चीड, संताप येत होता.

सकाळी सकाळी साडेसात- पावणेआठदरम्यान संग्रामचा फोन आला. ‘हॅलो योगेश झाला तयार. मी निघतोय आता. अर्ध्या तासात तिथे पोहोचतो. तू लवकर ये. उशीर करू नकोस. मला पुढे जायचे आहे.’ मी म्हणालो, ‘ठीक आहे, मी तयारच आहे. मी येतो.’ घाईघाईने संग्रामने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघालो. कारण आपण वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे. तसा मी पोहोचलो. संग्रामही अगदी पाच मिनिटांत तिथे आला. त्याने गाडी थांबवली. पुढचा गाडीचा दरवाजा उघडून मी त्याच्याजवळ बसलो. त्याला आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

कारण आम्ही असे खूप दिवसांनी भेटलो होतो. थोड्या गप्पा झाल्या. रस्त्यात सरांच्या घरांच्या अलीकडे एक चांगले हॉटेल होते. तिथे आम्ही चहा घेतला. थोड्या गप्पा मारल्या. संग्रामचे कुटुंब सोबत होते. सरांना संग्रामने फोन केला. हॅलो, ‘नमस्कार सर, संग्राम बोलतोय... इथे आलो होतो. रात्री फोन केला होता, गावाकडे जायला निघालो आहे. जाता जाता आपल्याला भेटावं म्हणून तुमच्या घराच्या बाजूनं जातो आहे.’

‘हा हा याना घरी, मी आहेच घरी...’ आम्ही सरांच्या घरी पोहोचलो. सर एकटेच घरी होते. पेपर वाचत बसले होते. या म्हणाले, आम्ही जाऊनघरात बसलो. सरांनी इकडच्या-तिकडच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. गप्पा मारून दहा-पंधरा मिनिटे झाली की, सरांचे लक्ष संग्रामच्या मुलाकडे गेले. सर आतमध्ये गेले व त्यांनी बिस्किटाचा अर्धा पुडा संग्रामच्या मुलाच्या हातावर टेकवला व म्हणाले, ‘रात्री नातवंड आले होते. त्यांना बिस्किटाचा बॉक्स आणला होता. त्यातील बिस्किटे आहेत, अजून देऊ का?’ सर खुर्चीवर बसले. संग्राम आणि मी त्या मुलाच्या हातात दिलेल्या बिस्किटांकडे पाहत होतोत. मी संग्रामकडे आणि संग्राम माझ्याकडे पाहत होता. दोघांचे लक्ष एकदाच त्या बिस्किटाच्या पुड्याकडे गेल्यामुळे दोघेही समजून गेलो. तसा मी संग्रामला बाहेर निघण्याचा इशारा केला. दोघेही बाहेर आलो. मी संग्रामला म्हणालो, आपली खूप दिवसांनी भेट झाली आहे. तुम्हाला तिथपर्यंत मी सोडतो. आपण नाश्ता करू आणि मग तू मात्र पुढे जा. गावाकडे जायला तुला वेळ होईल. त्यामुळे नाश्ता करू. त्या हॉटेलवर पोहोचलो. खाली उतरलो. वेटरला ऑर्डर दिली. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता संग्रामला म्हणालो, अरे हा माणूस किती श्रीमंत आहे, किती पैशावाला आहे, किती पैसे कमवतो आहे आणि त्यांनी मात्र आपल्या या छोट्या बाळाच्या हातामध्ये बिस्किटांचा अर्धा पुडा टेकवला. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. खरेतर समाजातील अनेक लोक मार्गदर्शन, संस्कार करत असतात. त्यांच्याकडे समाज आदर्श म्हणून

पाहत असतो; पण तेच जर आज अशा कोत्या मनाने वागत असतील, तर समाजाचे काय भले होणार? ज्यांचे पोट हातावर आहे, ज्यांच्या घरी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अशांच्या घरी कुणी एखादा पाहुणा गेला, तर बाळाचं कौतुक केलं जातं.

त्याच्या बाळाला संपूर्ण बिस्किटाचा पुडा दिला जातो अन्‌ मोठ्या म्हणून घेणाऱ्या खोट्या आणि छोट्या मनाच्या माणसानं हे कृत्य

करणं किती वाईट आहे. अशीच माणसं आज समाजाला फसवत आहेत. हे समाजाच्या वेळीच लक्षात यायला हवं. खरंच मोठे ते खोटे असतात. तेच खरं आहे.