शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

घरी टीव्ही, फ्रीज, गाडी तरीही मोफत धान्याचे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST

आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २८ लाख लोक मोफत तसेच शासनाकडून ...

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २८ लाख लोक मोफत तसेच शासनाकडून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे लाभार्थी आहेत. यात अनेकांकडे टीव्ही, फ्रीज, गाडी असतानाही ते मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. यासाठी दर महिन्याला १५ हजार मेट्रीक धान्याची वाटप होत असते, दरम्यान, निकषात बसणाऱ्यांकडून हमी पत्र लिहून घेतले जाते, त्यामुळे निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिलाच जात नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अंत्योदय अंतर्गत कुटुंबाला ३५ किलो तर प्राधान्य कुटुंबांतंर्गत प्रत्येक सदस्याला ५ किलो असे धान्य दिले जाते. मध्यंतरी भरड धान्यही दिले जात होते. यात शासनाकडून मोफत धान्यही कोरोनाकाळासाठी वाटप करण्यात येत आहे. अंत्योदयची नोंदणी सध्या लॉक असली तरी प्राधान्य कुटुंबाला निकषानुसार कार्ड दिले जात आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या -

४७३६७३३

एकूण रेशनकार्डधारक -

१००६६१३

अंत्योदय, पीएचएच कार्डधारक -४७०९५०

कोणत्या तालुक्यात किती कार्डधारक

जळगाव : ६३७५१

जामनेर : ३७६४३

एरंडोल : २०४००

धरणगाव : २२०२८

भुसावळ : ४१७३४

यावल : २९३२७

रावेर : ३८३५४

बोदवड : १०६००

मुक्ताईनगर : १८६८३

पाचोरा : ३५१५०

भडगाव : १८२४४

चाळीसगाव : ४४७५७

अमळनेर : ३५१९९

चोपडा : ३३१२९

पारोळा : २१९५१

दारिद्र्य रेषेखालीसाठीचे निकष काय?

दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात रहिवास असलेल्या कुटुंबाचे वार्षीक

उत्पन्न हे ४४ हजाराच्या आत असायला हवे.

तर शहरी भागातील रहिवास असलेल्या कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न हे ५४ हजारांच्या आत असायला हवे.

यानुसार दारिद्ररेषेखालील कुटुंबात त्यांची नोंद होत असते.

प्राधान्य कुटुंबाला कार्ड

अंत्योदय योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा ठराव लागतो. अंत्योदय शासनाकडूनच लॉक असल्याने

त्याचे काम सुरू झालेले नाही. मात्र, पीएचच अर्थात प्राधान्य कुटुंबाचे काम सुरू आहे. यानुसार उत्पन्न कमी असेल, अर्ज केला असेल,

कागदपत्रे जोडलेली असतील त्यांना कार्ड मिळते.

कारवाई नाही

निकषात बसणाऱ्यांना कार्ड दिले जाते व धान्य दिले जाते, त्यामुळे अद्याप निकषात न बसणाऱ्यांचा यादीत समावेश आहे, अशी काही बाब

निदर्शनास आलेली नसून अशी कारवाई झालेली नाही. जे निकषात बसतात त्यांची चौकशी केली जाते, त्यांच्याकडून हमी पत्र भरून घेतले

जाते,असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले.

८८ टक्के लोकांना धान्य

पात्र लाभार्थ्यांपैकी ८८ टक्के लोकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. जसे धान्य येते तसे तातडीने त्याचे वाटप केले जाते. यात

पीएचएचमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य दिले जाते. अंत्योदय आणि पीएचएच या दोन्हीचे निकष समानच आहेत.

कोट

दरम महिन्याला १५ हजार मेट्रीक टन धान्य वितरीत केले जाते. पीएमजीकेवाय अंतर्गत मोफत तर नियमीतचे धान्य दोन रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. यात भरड धान्यही आपण देत असतो, ते वाटप पूर्ण झाले आहे. आता पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबरपासून मका, ज्वारी देण्यात येणार आहे. - सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी