शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अण्णा भाऊ साठे : लोकशाहीर व लोककलावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:14 IST

कुठल्याही शाळेत शिक्षण न घेतलेले, साहित्यिकांमध्ये साहित्यरत्न ठरलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज जन्मदिवस. १ ऑगस्ट १९२० ...

कुठल्याही शाळेत शिक्षण न घेतलेले, साहित्यिकांमध्ये साहित्यरत्न ठरलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज जन्मदिवस. १ ऑगस्ट १९२० मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका येथे अण्णा भाऊ यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अतिशय गरिबी, दारिद्र्यात गेले.

अण्णा भाऊ, बालपणापासूनच वेगळ्या विचारसरणीचे आणि काहीतरी करावं असा विचार असलेले व्यक्ती. दलित आणि कामगारांच्या चळवळीत भाग घेतला. त्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारला.

१९३१ ते १९४१ हा त्यांच्या जीवनातील अस्थिरतेचा व संक्रमणावस्थेचा काळ, याच काळात मुंबईमधील एक गिरणी कामगार, घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहणारा, एका पत्र्याच्या खोलीत राहून साहित्य निर्मिती करीत होते. कष्टकरी संघटनेचे नेतृत्व सन १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटा’ कलापथकाची स्थापना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेत संघटनात्मक कार्य केले. सन १९४५ हा त्यांच्यासाठी कथा लेखनाचा सुवर्णकाळ होता. या काळात अनेक कथा त्यांनी लिहिल्या.

गरीब कष्टकऱ्यांच्या जीवनाचे विदारक चित्र अण्णा भाऊंनी आपल्या कादंबरी, नाटक आणि कथांमध्ये रेखाटलं आहे. पोवाडा, लावणी, वगनाट्य याच बरोबर चळवळीचे गीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील गीतसुद्धा अण्णा भाऊंचीच देण आहे. त्यांची ‘माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली’ ही लावणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. जेव्हा गावाहून मुंबईला आले आणि त्यांची पत्नी जेव्हा गावाकडे होती. त्यांना जेव्हा तिची खूप आठवण येत होती, अशा आठवणीतून त्यांनी लावणीची निर्मिती केली. आजही मनाला भाळणारी अशी ही लावणी प्रत्येकाच्या तोंडावर येते.

लावणी आणि तमाशा याचं समीकरण अत्यंत सुरेख पद्धतीने त्यांनी रेखाटलं. खरे तर ते लावणी सम्राट होते. त्याचप्रमाणे त्यांनी तमाशा कलेला समर्थ रूप दिले. महाराष्ट्रात लोककलेची जपणूक करण्यासाठी आणि आणि तिला मान्यता मिळवण्यासाठी अण्णा भाऊंनी अतोनात प्रयत्न केले. लोकनाट्य हे नाव अण्णा भाऊंनीच दिलेले आहे. पोवाडा, वग, शाहिरी इत्यादी काव्यप्रकार अण्णा भाऊंनी नव्या ढंगाने मनामनात कोरला आहे.

त्यांच्या प्रत्येक चरित्रामध्ये गावकुसाबाहेरचे जे दलित-भटके-विमुक्त जीवन जगणारे होते. समाजामध्ये या लोकांची अवहेलना होत होती. त्यांच्या जीवनातील अनुभव, दारिद्र्य, सामाजिक परिस्थिती अण्णा भाऊंनी साहित्यातून मांडली. ‘'चलेजाव’च्या चळवळीत अण्णांनी सहभाग घेतला. याच काळात अण्णा भाऊंवर अटक वॉरंट काढण्यात आले होते. भूमिगत राहून संयुक्त महाराष्ट्र व ‘चले जाव’ चळवळ यशस्वी केली.

अण्णांच्या ‘फकिरा’ या कादंबरीमध्ये भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी माणसाला ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. माणूस म्हणून जगण्यासाठी समाजव्यवस्थेने घालून दिलेले बंधन त्यांनी अत्यंत ज्वलंत स्वरूपात मांडले आहे.

‘फकिरा’ ही कादंबरी विद्यापीठात अभ्यासाला आहे. ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केली. त्यांच्या लिखाणात कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब यांच्या कार्याचा प्रभाव होता. फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी २७ भाषेत निर्मिती झाली. साम्यवादी विचारसरणीचा, मार्क्सवादी, बाबासाहेबांच्या चळवळीशी जुळलेला असा निष्ठावंत, लोककलाकार, लोकशाहीर, लोकांचा नेता असलेल्या अण्णांना ५० वर्षांचे आयुष्य लाभले.