शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे : लोकशाहीर व लोककलावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:14 IST

कुठल्याही शाळेत शिक्षण न घेतलेले, साहित्यिकांमध्ये साहित्यरत्न ठरलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज जन्मदिवस. १ ऑगस्ट १९२० ...

कुठल्याही शाळेत शिक्षण न घेतलेले, साहित्यिकांमध्ये साहित्यरत्न ठरलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज जन्मदिवस. १ ऑगस्ट १९२० मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका येथे अण्णा भाऊ यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अतिशय गरिबी, दारिद्र्यात गेले.

अण्णा भाऊ, बालपणापासूनच वेगळ्या विचारसरणीचे आणि काहीतरी करावं असा विचार असलेले व्यक्ती. दलित आणि कामगारांच्या चळवळीत भाग घेतला. त्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारला.

१९३१ ते १९४१ हा त्यांच्या जीवनातील अस्थिरतेचा व संक्रमणावस्थेचा काळ, याच काळात मुंबईमधील एक गिरणी कामगार, घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहणारा, एका पत्र्याच्या खोलीत राहून साहित्य निर्मिती करीत होते. कष्टकरी संघटनेचे नेतृत्व सन १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटा’ कलापथकाची स्थापना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेत संघटनात्मक कार्य केले. सन १९४५ हा त्यांच्यासाठी कथा लेखनाचा सुवर्णकाळ होता. या काळात अनेक कथा त्यांनी लिहिल्या.

गरीब कष्टकऱ्यांच्या जीवनाचे विदारक चित्र अण्णा भाऊंनी आपल्या कादंबरी, नाटक आणि कथांमध्ये रेखाटलं आहे. पोवाडा, लावणी, वगनाट्य याच बरोबर चळवळीचे गीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील गीतसुद्धा अण्णा भाऊंचीच देण आहे. त्यांची ‘माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली’ ही लावणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. जेव्हा गावाहून मुंबईला आले आणि त्यांची पत्नी जेव्हा गावाकडे होती. त्यांना जेव्हा तिची खूप आठवण येत होती, अशा आठवणीतून त्यांनी लावणीची निर्मिती केली. आजही मनाला भाळणारी अशी ही लावणी प्रत्येकाच्या तोंडावर येते.

लावणी आणि तमाशा याचं समीकरण अत्यंत सुरेख पद्धतीने त्यांनी रेखाटलं. खरे तर ते लावणी सम्राट होते. त्याचप्रमाणे त्यांनी तमाशा कलेला समर्थ रूप दिले. महाराष्ट्रात लोककलेची जपणूक करण्यासाठी आणि आणि तिला मान्यता मिळवण्यासाठी अण्णा भाऊंनी अतोनात प्रयत्न केले. लोकनाट्य हे नाव अण्णा भाऊंनीच दिलेले आहे. पोवाडा, वग, शाहिरी इत्यादी काव्यप्रकार अण्णा भाऊंनी नव्या ढंगाने मनामनात कोरला आहे.

त्यांच्या प्रत्येक चरित्रामध्ये गावकुसाबाहेरचे जे दलित-भटके-विमुक्त जीवन जगणारे होते. समाजामध्ये या लोकांची अवहेलना होत होती. त्यांच्या जीवनातील अनुभव, दारिद्र्य, सामाजिक परिस्थिती अण्णा भाऊंनी साहित्यातून मांडली. ‘'चलेजाव’च्या चळवळीत अण्णांनी सहभाग घेतला. याच काळात अण्णा भाऊंवर अटक वॉरंट काढण्यात आले होते. भूमिगत राहून संयुक्त महाराष्ट्र व ‘चले जाव’ चळवळ यशस्वी केली.

अण्णांच्या ‘फकिरा’ या कादंबरीमध्ये भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी माणसाला ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. माणूस म्हणून जगण्यासाठी समाजव्यवस्थेने घालून दिलेले बंधन त्यांनी अत्यंत ज्वलंत स्वरूपात मांडले आहे.

‘फकिरा’ ही कादंबरी विद्यापीठात अभ्यासाला आहे. ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केली. त्यांच्या लिखाणात कार्ल मार्क्स आणि बाबासाहेब यांच्या कार्याचा प्रभाव होता. फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी २७ भाषेत निर्मिती झाली. साम्यवादी विचारसरणीचा, मार्क्सवादी, बाबासाहेबांच्या चळवळीशी जुळलेला असा निष्ठावंत, लोककलाकार, लोकशाहीर, लोकांचा नेता असलेल्या अण्णांना ५० वर्षांचे आयुष्य लाभले.