शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

योजना लांबल्याने प्रकल्पांचा खर्च अवाच्या सवा !

By admin | Updated: October 4, 2015 00:30 IST

नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे करताना नियोजन चुकल्याने प्रकल्पांचा खर्च अवाचा सवा झाला आहे. अनेक प्रकल्पांच्या किमती दहा ते तीस पटीने वाढल्या आहेत.

नंदुरबार : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे करताना नियोजन चुकल्याने प्रकल्पांचा खर्च अवाचा सवा झाला आहे. अनेक प्रकल्पांच्या किमती दहा ते तीस पटीने वाढल्या आहेत, त्यामुळे प्रकल्पांची कामे रेंगाळून केवळ प्रकल्पांवर खर्च वाढविण्याचा व त्यातून गैरप्रकार करण्याचा प्रकार तर नाही ना, असाही संशय निर्माण झाला असून आता राज्य शासनाने याबाबतीत गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मंजुरीप्राप्त प्रकल्पांची संख्या मोठी आहे. या प्रकल्पांची नावालाच सुरुवात करून छोटय़ाछोटय़ा कारणांनी ते आता रेंगाळत आहे. त्यामुळे प्रकल्पांवर दिवसागणिक खर्च वाढत आहे. ज्या प्रकल्पाची किंमत मंजुरीच्या वेळी तीन कोटी होती. त्या प्रकल्पाची सुधारित किंमत सव्वाशे कोटी झाल्याचे चित्र जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे आहे.

प्रकल्प मंजूर करावा, त्याची मूळ किंमत निश्चित व्हावी त्यानंतर निविदा काढाव्यात, ठेकेदार निश्चित झाल्यानंतर प्रकल्प रेंगाळत असल्याने प्रकल्पांच्या सातत्याने सुधारित किमती जाहीर करून त्याचा खर्च वाढवावा, असा प्रकार सिंचन प्रकल्पांच्या बाबतीत होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रकल्पाची कामे रेंगाळून ठेकेदाराला फायदा द्यावा व दुसरीकडे शेतक:यांनादेखील लाभापासून वंचित ठेवावे असाच प्रकार घडत असल्याचा आरोप आता शेतकरी करीत आहे. त्यामुळे सिंचन विकासाचे हे तंत्र आता सामान्य शेतक:यांना समजण्यापलीकडे गेले आहे.

एकूणच राज्यातील सिंचन घोटाळ्याची चर्चा गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या चर्चेत राज्यातील इतर प्रकल्पांबाबत चर्चा झाली, पण जिल्ह्यातील प्रकल्पांबाबत मात्र मौन दिसून येत आहे.

या प्रकल्पांमध्येही मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय प्रकल्पांच्या अहवालांवरून दिसून येते. त्यामुळे याबाबतही राज्य शासनाने वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची गरज आहे.

ही चौकशी होत असताना दुसरीकडे प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवून वर्षानुवर्षापासून सिंचन सुविधेपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतक:यांच्या शेतात पाणी पोहचविण्यासाठी प्रय

प्रकल्प खर्चात दहा ते वीस पटीने वाढ

4नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश मंजुरीप्राप्त प्रकल्पांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. एकीकडे प्रकल्पांची कामे रेंगाळत आहेत तर दुसरीकडे त्यावर खर्च अवाच्या सवा वाढत आहे. कोरडी, ता.नवापूर या मध्यम प्रकल्पाची मूळ प्रशासकीय किंमत दोन कोटी 71 लाख 50 हजार होती. आज या प्रकल्पाची किंमत 126 कोटी 60 लाख झाली आहे. विशेष म्हणजे त्यावर जवळपास 100 कोटींचा खर्चही झाला आहे. अजून प्रकल्पाचे काम अपूर्णच आहे. देहली, ता.अक्कलकुवा मध्यम प्रकल्पाची मूळ प्रशासकीय किंमत तीन कोटी 95 लाख दहा हजार होती. ती आता 259 कोटी र्पयत गेली आहे. या प्रकल्पावर आतार्पयत 92 कोटीपेक्षा अधिक खर्च झाला आहे. काम रेंगाळतच आहे. शिवण मध्यम प्रकल्पाची मूळ प्रशासकीय किंमत आठ कोटी 20 लाख 51 हजार होती. ती आता 74 कोटी 39 लाख झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पावर जवळपास 55 कोटी रुपये खर्च होऊन अजून काम अपूर्णच आहे. दरा मध्यम प्रकल्पाची मूळ किंमत सहा कोटी नऊ लाख होती. ती आता 117 कोटी 61 लाखर्पयत गेली आहे. या प्रकल्पावर आतार्पयत 62 कोटी 45 लाख खर्च होऊनही काम रेंगाळले आहे. नागण, ता.नवापूर मध्यम प्रकल्पाची मूळ प्रशासकीय किंमत सात कोटी नऊ लाख 30 हजार होती. त्याची आता सुधारित किंमत 120 कोटी झाली आहे. या प्रकल्पावर 69 कोटी 64 लाख रुपये खर्च होऊन काम रेंगाळले आहे.

4प्रकाशा बॅरेज प्रकल्पाची मूळ प्रशासकीय किंमत 52 कोटी सात लाख होती. ती 245 कोटी दोन लाखर्पयत गेली. त्यावर 176 कोटी 39 लाख खर्च झाला, अजून त्याचा शेतीसाठी लाभ नाही. सारंगखेडा बॅरेज प्रकल्पाची मूळ किंमत 89 कोटी 54 लाख होती. त्याची किंमत आता 276 कोटी 49 लाख झाली आहे. त्यावर 215 कोटी रुपये खर्च झाला. अजून शेतक:यांना पाण्याचा लाभ नाही. मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघु सिंचन प्रकल्पांचीही अवस्था अशीच आहे.

} करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.