शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील ७८ हजार शेतकऱ्यांनी घेतला ` महाकृषी उर्जा `अभियानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा ...

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्च ते जून दरम्यान शासनाच्या सुचनेनुसार सर्व प्रकारच्या ग्राहकांना घरोघरी जाऊन रिडींग न घेता, सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, सरासरी वीज बील हे अवाजवी असल्याचे सांगत, सर्व प्रकारच्या ग्राहकांनी हे विजबिल भरण्याला विरोध केला होता. यामध्ये आधीच वर्षानुवर्ष थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी तर हे वीजबिल भरण्याला तीव्र विरोध केला होता. मागील थकबाकी व चालु विजबिल मिळून, अनेक शेतकरी बांधवाना लाखोंच्या विजबिल आले होते. त्यामुळे महावितरणने कृषी पंपाचे वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदापासून `महाकृषी ऊर्जा` अभियान सुरू केले आहे. या योजने अंतर्गंत पहिल्या वर्षी थकीत वीज बिल भरणाऱ्या शेतकरी बांधवांना वीज बिलात ६६ टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येत आहे. त्यानुसार खान्देशातील जून अखेर ७८ हजार शेतकऱ्यांनी थकीत विजबिलावर सवलत घेऊन, या अभियानाचा लाभ घेतला आहे.

इन्फो :

काय आहे `महाकृषी उर्जा `अभियान

राज्याच्या उर्जा मंत्रालयातर्फे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून या अभियानाला सुरूवात करण्यात आली असून, सलग तीन वर्ष हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानानुसार पहिल्या वर्षी विज बिलाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, यात व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या थकबाकी मध्ये एकूण ६६ टक्के सवलत मिळणार आहे. तसेच अभियानाच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढील वर्षी थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला विजबिलावर ३० टक्के सवलत मिळणार असून, तिसऱ्या वर्षी या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला २० टक्केच सवलत मिळणार आहे.

या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे.

इन्फो :

सर्वाधिक लाभार्थी जळगाव जिल्ह्यातील

या अभियानाचा आतापर्यंत खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, यात जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकरी बांधवांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी सवलतीचा लाभ घेऊन, ५४ कोटी ३८ लाखांचा विजबिल भरणा केला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ९७७ शेतकऱ्यांनी २१ कोटी १४ लाखांचे बिल भरले आहे. तर धुळे जिल्ह्यातील २१ हजार ८७३ शेतकऱ्यांनी १४ कोटी ४८ लाख इतके थकीत विजबिल भरले आहे.