शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

खान्देशातील ७८ हजार शेतकऱ्यांनी घेतला ` महाकृषी उर्जा `अभियानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा ...

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्च ते जून दरम्यान शासनाच्या सुचनेनुसार सर्व प्रकारच्या ग्राहकांना घरोघरी जाऊन रिडींग न घेता, सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, सरासरी वीज बील हे अवाजवी असल्याचे सांगत, सर्व प्रकारच्या ग्राहकांनी हे विजबिल भरण्याला विरोध केला होता. यामध्ये आधीच वर्षानुवर्ष थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी तर हे वीजबिल भरण्याला तीव्र विरोध केला होता. मागील थकबाकी व चालु विजबिल मिळून, अनेक शेतकरी बांधवाना लाखोंच्या विजबिल आले होते. त्यामुळे महावितरणने कृषी पंपाचे वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदापासून `महाकृषी ऊर्जा` अभियान सुरू केले आहे. या योजने अंतर्गंत पहिल्या वर्षी थकीत वीज बिल भरणाऱ्या शेतकरी बांधवांना वीज बिलात ६६ टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येत आहे. त्यानुसार खान्देशातील जून अखेर ७८ हजार शेतकऱ्यांनी थकीत विजबिलावर सवलत घेऊन, या अभियानाचा लाभ घेतला आहे.

इन्फो :

काय आहे `महाकृषी उर्जा `अभियान

राज्याच्या उर्जा मंत्रालयातर्फे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून या अभियानाला सुरूवात करण्यात आली असून, सलग तीन वर्ष हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानानुसार पहिल्या वर्षी विज बिलाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, यात व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या थकबाकी मध्ये एकूण ६६ टक्के सवलत मिळणार आहे. तसेच अभियानाच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढील वर्षी थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला विजबिलावर ३० टक्के सवलत मिळणार असून, तिसऱ्या वर्षी या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला २० टक्केच सवलत मिळणार आहे.

या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे.

इन्फो :

सर्वाधिक लाभार्थी जळगाव जिल्ह्यातील

या अभियानाचा आतापर्यंत खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, यात जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकरी बांधवांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी सवलतीचा लाभ घेऊन, ५४ कोटी ३८ लाखांचा विजबिल भरणा केला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ९७७ शेतकऱ्यांनी २१ कोटी १४ लाखांचे बिल भरले आहे. तर धुळे जिल्ह्यातील २१ हजार ८७३ शेतकऱ्यांनी १४ कोटी ४८ लाख इतके थकीत विजबिल भरले आहे.