शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

खान्देशातील ७८ हजार शेतकऱ्यांनी घेतला ` महाकृषी उर्जा `अभियानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा ...

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्च ते जून दरम्यान शासनाच्या सुचनेनुसार सर्व प्रकारच्या ग्राहकांना घरोघरी जाऊन रिडींग न घेता, सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, सरासरी वीज बील हे अवाजवी असल्याचे सांगत, सर्व प्रकारच्या ग्राहकांनी हे विजबिल भरण्याला विरोध केला होता. यामध्ये आधीच वर्षानुवर्ष थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी तर हे वीजबिल भरण्याला तीव्र विरोध केला होता. मागील थकबाकी व चालु विजबिल मिळून, अनेक शेतकरी बांधवाना लाखोंच्या विजबिल आले होते. त्यामुळे महावितरणने कृषी पंपाचे वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदापासून `महाकृषी ऊर्जा` अभियान सुरू केले आहे. या योजने अंतर्गंत पहिल्या वर्षी थकीत वीज बिल भरणाऱ्या शेतकरी बांधवांना वीज बिलात ६६ टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येत आहे. त्यानुसार खान्देशातील जून अखेर ७८ हजार शेतकऱ्यांनी थकीत विजबिलावर सवलत घेऊन, या अभियानाचा लाभ घेतला आहे.

इन्फो :

काय आहे `महाकृषी उर्जा `अभियान

राज्याच्या उर्जा मंत्रालयातर्फे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून या अभियानाला सुरूवात करण्यात आली असून, सलग तीन वर्ष हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानानुसार पहिल्या वर्षी विज बिलाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, यात व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या थकबाकी मध्ये एकूण ६६ टक्के सवलत मिळणार आहे. तसेच अभियानाच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढील वर्षी थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला विजबिलावर ३० टक्के सवलत मिळणार असून, तिसऱ्या वर्षी या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला २० टक्केच सवलत मिळणार आहे.

या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे.

इन्फो :

सर्वाधिक लाभार्थी जळगाव जिल्ह्यातील

या अभियानाचा आतापर्यंत खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, यात जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकरी बांधवांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी सवलतीचा लाभ घेऊन, ५४ कोटी ३८ लाखांचा विजबिल भरणा केला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ९७७ शेतकऱ्यांनी २१ कोटी १४ लाखांचे बिल भरले आहे. तर धुळे जिल्ह्यातील २१ हजार ८७३ शेतकऱ्यांनी १४ कोटी ४८ लाख इतके थकीत विजबिल भरले आहे.