शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

श्वास थांबताच नातीही दुरावतात...पालिका कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

जालना : ‘सांस टूट जातेही रिश्ते टूट जाते है...’ हे बोल प्रसिद्ध कव्वालीकार अजीज नाझा यांच्या ‘ढलता सुरज ...

जालना : ‘सांस टूट जातेही रिश्ते टूट जाते है...’ हे बोल प्रसिद्ध कव्वालीकार अजीज नाझा यांच्या ‘ढलता सुरज धीरे...धीरे...ढलता है ढल जायेगा...’ या कव्वालीतील आहेत. याचे विदारक अनुभव कोरोनामुळे मृत्यू पावल्यानंतर संबंधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांना येत आहेत. कोरोना झाला म्हटल्यावर आपली प्राणप्रिय व्यक्तीही दोन हात दूर राहणेच पसंत करते. नव्हे तसे निकषच डॉक्टरांनी घालून दिले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास प्रशासनाकडून मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही. परंतु, अंत्यसंस्कार करतेवेळी संबंधितांच्या धर्मानुसार जे काही विधी असतात, ते पीपीई कीट घालून करू दिले जातात. परंतु, अनेकजण हे विधीही करण्यास घाबरत असून, आम्हीच जेवढे शक्य होईल तेवढे विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक अरूण वानखेडे, श्रावण सराटे, शोएब खान, उत्तम भालेराव, प्रभुदास नेमाडे, सचिन कांबळे, राजू गवळे, शकील बेग, दीपक कारके यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ५०० पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वानखेडे यांनी सांगितले. अनेक मयतांचे नातेवाईक हे पूर्ण संस्कार करण्याचे आग्रह धरत असल्यानेही कधीकधी आम्ही संकटात सापडतो.

गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्वजण हे काम आमचे कर्तव्य आणि नोकरीचा भाग म्हणून करत आहोत. परंतु, हे सर्व करत असताना आम्हाला आमच्यासह परिवाराची चिंता सतावत असते. घरी गेल्यावर दोनवेळा आंघोळ करून सर्व कपडे हे घराबाहेर ठेवूनच घरात प्रवेश करतो. अनेकवेळा तर केवळ जेवणासाठी घरी जावे लागते. त्यावेळी अंगणात आणि वऱ्हांड्यात बसून जेवण उरकावे लागते. अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून म्हणजेच पालिकेकडून पीपीई कीट तसेच अन्य साहित्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे दररोज आमच्या संपर्कात असतात. तसेच मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शेख अख्तर आणि शिक्षक असलेले मुजीबभाई यांची मोठी साथ आम्हाला मिळत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

शेख अक्तर, मुजीबभाई

चौकट

मुलींचा पुढाकार लक्षणीय

कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यावर ज्यांना मुलगा नसून, केवळ दोन अथवा तीन मुलीच आहेत. अशावेळेस अनेक मुलींनी न भीता आपल्या नातेवाईकांना हिंदू पद्धतीने पाणी पाजण्याची परंपरा पाळल्याचे दिसून आले. याचवेळी तर काही पुरूष मंडळी मात्र कोरोनाची लागण होईल, या भीतीने सतर्कता बाळगून भावनिक होण्यापेक्षा अंत्यसंस्कार होण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.