शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

श्वास थांबताच नातीही दुरावतात...पालिका कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

जालना : ‘सांस टूट जातेही रिश्ते टूट जाते है...’ हे बोल प्रसिद्ध कव्वालीकार अजीज नाझा यांच्या ‘ढलता सुरज ...

जालना : ‘सांस टूट जातेही रिश्ते टूट जाते है...’ हे बोल प्रसिद्ध कव्वालीकार अजीज नाझा यांच्या ‘ढलता सुरज धीरे...धीरे...ढलता है ढल जायेगा...’ या कव्वालीतील आहेत. याचे विदारक अनुभव कोरोनामुळे मृत्यू पावल्यानंतर संबंधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांना येत आहेत. कोरोना झाला म्हटल्यावर आपली प्राणप्रिय व्यक्तीही दोन हात दूर राहणेच पसंत करते. नव्हे तसे निकषच डॉक्टरांनी घालून दिले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास प्रशासनाकडून मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही. परंतु, अंत्यसंस्कार करतेवेळी संबंधितांच्या धर्मानुसार जे काही विधी असतात, ते पीपीई कीट घालून करू दिले जातात. परंतु, अनेकजण हे विधीही करण्यास घाबरत असून, आम्हीच जेवढे शक्य होईल तेवढे विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक अरूण वानखेडे, श्रावण सराटे, शोएब खान, उत्तम भालेराव, प्रभुदास नेमाडे, सचिन कांबळे, राजू गवळे, शकील बेग, दीपक कारके यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ५०० पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वानखेडे यांनी सांगितले. अनेक मयतांचे नातेवाईक हे पूर्ण संस्कार करण्याचे आग्रह धरत असल्यानेही कधीकधी आम्ही संकटात सापडतो.

गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्वजण हे काम आमचे कर्तव्य आणि नोकरीचा भाग म्हणून करत आहोत. परंतु, हे सर्व करत असताना आम्हाला आमच्यासह परिवाराची चिंता सतावत असते. घरी गेल्यावर दोनवेळा आंघोळ करून सर्व कपडे हे घराबाहेर ठेवूनच घरात प्रवेश करतो. अनेकवेळा तर केवळ जेवणासाठी घरी जावे लागते. त्यावेळी अंगणात आणि वऱ्हांड्यात बसून जेवण उरकावे लागते. अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून म्हणजेच पालिकेकडून पीपीई कीट तसेच अन्य साहित्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे दररोज आमच्या संपर्कात असतात. तसेच मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शेख अख्तर आणि शिक्षक असलेले मुजीबभाई यांची मोठी साथ आम्हाला मिळत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

शेख अक्तर, मुजीबभाई

चौकट

मुलींचा पुढाकार लक्षणीय

कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यावर ज्यांना मुलगा नसून, केवळ दोन अथवा तीन मुलीच आहेत. अशावेळेस अनेक मुलींनी न भीता आपल्या नातेवाईकांना हिंदू पद्धतीने पाणी पाजण्याची परंपरा पाळल्याचे दिसून आले. याचवेळी तर काही पुरूष मंडळी मात्र कोरोनाची लागण होईल, या भीतीने सतर्कता बाळगून भावनिक होण्यापेक्षा अंत्यसंस्कार होण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.