शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राजूरचे कापूस खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

राजूर : येथील कापूस खरेदी केंद्र २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. खरेदी केंद्र बंद ...

राजूर : येथील कापूस खरेदी केंद्र २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. खरेदी केंद्र बंद असल्याने कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

राजूर येथील राजुरेश्वर कॉटेक्स जिनिंगमध्ये १७ नोव्हेंबरपासून शासकीय सीसीआय योजनेतून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. एकाच महिन्यात मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी व्यापारी कापूस खरेदी करण्यास धजावत नसून, कमी भावाने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे मोर्चा वळवला आहे. जिनिंगमध्ये सध्या कापूस साठविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून २२ डिसेंबरपासून तात्पुरती कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी २८ डिसेंबरला सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कापूस खरेदी केंद्रावर १९८ ट्रॅक्टर व टेम्पो या वाहनांची नोंद असल्याचे बाजार समितीचे सुखदेव उगले यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या बैलगाड्यांतून आलेल्या कापसाचे सरळ मोजमाप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी किरायाने ट्रॅक्टर व टेम्पो वाहनातून खरेदी केंद्रावर कापूस भरून आणलेला आहे. सध्या कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना वाहनाच्या किरायाचा नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. राजूर परिसरात शेतकरी प्रामुख्याने कापूस, मकाचे पीक घेतात; परंतु, यावर्षी सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे चित्र आहे.

३९ हजार क्विंटलची खरेदी

राजूर येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आजवर ३९ हजार १५४ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. साठवणुकीची अडचण असल्याने खरेदी बंद असून, ती लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख धारेआप्पा होणाघोळ यांनी दिली.