शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बैलाला सोन्याचा भाव; पारडगावच्या बाजारात अर्ध्या लाखाला मिळतेय जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

जालना : शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली. यांत्रिकीकरण झाले; परंतु आजही अनेक शेतकरी बैलांचा वापर करून शेती कसतात. दुधाळ जनावरे ...

जालना : शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली. यांत्रिकीकरण झाले; परंतु आजही अनेक शेतकरी बैलांचा वापर करून शेती कसतात. दुधाळ जनावरे पाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पारडगाव (ता. घनसावंगी) येथील बाजारात शेतातील ओढकाम करणाऱ्या बैलांची जोडी सध्या ६० हजार ते एक लाखापर्यंत विक्री होत आहे.

पारंपरिक शेतीला फाटा देत अनेकांनी आधुनिकतेची कास धरून शेती व्यवसाय सुरू केला आहे. असे असले तरी बैलांचा शेतीकामासाठी वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शिवाय गायी, म्हशी या दुधाळ जनावरांचेही पालन शहरी, ग्रामीण भागात केले जाते. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला. कधी चारा-पाण्याचा प्रश्न, तर कधी रोगराई यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पशुधनाची संख्या कमी झाली असली तरी त्यांचे बाजारातील दर चांगलेच वाढले आहेत. पारडगावसह जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्ये जनावरांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.

दोन कोटींची उलाढाल

घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जनावरांचा बाजार जिल्ह्यात नव्हे मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. या आठवडी बाजारात जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील पशुपालक, व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. दुधाळ जनावरांसह ओढकाम करणाऱ्या जनावरांची खरेदी-विक्री या बाजारात होते. सध्या जनावरांची खरेदी- विक्री पूर्वीपेक्षा कमी झाली आहे; परंतु जनावरांच्या खरेदी-विक्रीचे दर ४० हजार ते ८० हजारांपर्यंत जात आहेत. एका आठवडी बाजारात दीड ते दोन कोटीपर्यंत आर्थिक उलाढाल होते.

जनावरे सांभाळणे झाले कठीण

गत काही वर्षांत जनावरांची संख्या घटली आहे. असे असले तरी बाजारात जनावरांची संख्या वाढली असून, चाऱ्यासह इतर समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

- जनार्दन माकोडे, पारडगाव

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अनेक वेळा गंभीर होतो. शिवाय जनावरे सांभाळण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. इतर नैसर्गिक आपत्तींचाही सामना करावा लागतो.

-महेश जगधने, जामखेड

पूर्वी मोठ्या प्रमाणात गायरान जमीन उपलब्ध असल्याने चाऱ्याचा प्रश्न कमी होता. गायरान क्षेत्र घटल्याने चाऱ्याचा प्रश्न अनेक वेळा गंभीर हेातो.

-रामभाऊ चांडक, पारडगाव

दुधाळ जनावरांची मागणी घटली

जनावरांच्या चाऱ्याचा प्रमुख प्रश्न शेतकरी, पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

चाऱ्याच्या प्रश्नामुळे सध्या दुधाळ जनावरांना बाजारातील मागणी घटली आहे. बाजारात पशुपालक जरशी गायींना पसंती देत आहेत.

दुधाळ जनावरांची विक्री ३० ते ९० हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री होत आहे.

दुधाळ जनावरांची घटणारी संख्या पाहता दुधाचे दरही शहरी, ग्रामीण भागात वाढताना दिसून येत आहेत.

बैलजोडीचा दिवसाचा खर्च

शेतकरी, पशुपालक स्वत: जनावरे सांभाळत असेल तर त्याचा खर्च कमी येतो. शेतातील कडबा नसेल तर कडबा, पेंड विकत आणावी लागते. जर शेती नसेल तर कडबा, पेंड, पाणी आदी बाबींवर खर्च करावा लागतो. सालगडी असेल तर दोन ते अडीच लाखांपर्यंत खर्च वर्षाकाठी होतो.

परतूर तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी रानोजी कराडे यांची बैलजोडी.