शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नव प्रयोग कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जातेय नवीन लागवड पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

जालना - जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प ...

जालना - जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोड ओळ पद्धतीने हरभरा लागवड करून घेतले. जोड ओळ पद्धतीने घेतल्यास हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उतारा जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हरभरा लागवड पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर करून जोड ओळ पद्धतीचा अवलंब वापरल्यास उत्पन्नात वाढ होते. हे प्रात्यक्षिक कृषी विभागाने केले. भोकरदन तालुक्यातील येथील जानेफळ दाभाडी येथील सोमनाथ मिसाळ यांनी टोकन पद्धतीने हरभरा लागवड केली आहे. गादीवाफ्याची (बेड) उंची दीड फूट तर रुंदी दोन फूट आहे. बेडवर ठिबकचे लॅटरल प्रत्येकी १२० सेमी अंथरण्यात आले. प्रत्येक लॅटरलच्या आजूबाजूला एकेक फूट अंतरावर तर एका ओळीत सहा इंच अंतर ठेवत टोकण पद्धतीने हरभरा लावला. नवीन पद्धतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. असा प्रयत्न जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत आत्मा, कृषी विभाग यांच्या मदतीने करण्यात येत आहे. हरभरा पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी, अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक्षम वाणांचा वापर, योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, बीजप्रक्रिया आणि जीवाणू संवर्धनाचा, वापर, तणनियंत्रण पाण्याचे योग्य नियोजन, रोग आणि किडींपासून पिकाचे संरक्षण, या बाबींचा वेळीच अवलंब केल्यास उत्पादनात नेहमीपेक्षा या प्रकारातून उताऱ्यात नक्कीच वाढ होणार असल्याचे बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

अळी बाल्यावस्थेत पिवळी, गुलाबी, काळे किंवा राखाडी रंगाची असून कोवळी पाने व फांद्यावर उपजीविका करते. दुसऱ्या अवस्थेत पाने, कळ्या, फुले खाते. तिसऱ्या अवस्थेत घाट्यांना छिद्र करून दाणे खाते. याला क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट ३ ग्रॅम प्रति १० लीटरप्रमाणे फवारावे.

जोडओळ पद्धतीने लागवड केलेला हरभऱ्याचे पीक असे झाले आहे.