शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

एमबीबीएस महाविद्यालय : नशिबाने दिले अन् नेत्यांनी गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

जालना जिल्हा होऊन आता ४० वर्षे होत आहेत. असे असताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने येथे शैक्षणिक वातावरण तयार झाले नाही. ...

जालना जिल्हा होऊन आता ४० वर्षे होत आहेत. असे असताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने येथे शैक्षणिक वातावरण तयार झाले नाही. काही मोजक्या संस्था सोडल्यास अन्य कुठल्याच व्यावसायिक संघी येथे नाहीत. त्यामुळे जालन्यातील विद्यार्थ्यांना पुणे, औरंगाबाद अथवा अन्य राज्यात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. मुंबईतील आयसीटी ही रसायन तंत्रज्ञान संस्था सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. परंतु त्यातूनही जी अपेक्षा होती. ती पायाभूत सुविधा नसल्याने शक्य होताना दिसत नाही. जालन्यात शासकीय अभियांत्रिक महाविद्याय मंजूर झाले होते. सध्याचे जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतनचा विस्तार करून तेथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्तावही तयार होता. परंतु पुन्हा एकदा राजकीय श्रेयवादात हे महाविद्यालय बंद पडले.

जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आयसीटी ही संस्था संघर्ष करून आणली. परंतु भुवनेश्वर आणि जालना येथील या संस्था एकाच दिवशी सुरू झाल्या होत्या. भुवनेश्वर येथील संस्था आणि जालन्यातील संस्थेची तुलना केल्यास यातून वास्तव समोर येईल. परंतु त्याकडे कुठल्याच राजकीय पक्षाचे लक्ष नाही. एकदा या संस्थेचा शुभारंभ झाल्यानंतर त्यांची ना आढावा बैठक राजकीय नेत्यांनी घेतली, ना प्रशासनाने त्यामुळे चलता हैच्या स्थितीत ही संस्था सुरू आहे.

चौकट

एमबीबीएसचे सर्व सोपस्कार होऊनही..

जालन्यात चार महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंंत्री अमित देशमुख यांनी स्वत: जालन्यात येऊन पाहणी केली. तसेच अन्य तंत्रांच्या समितीनेदेखील पाहणी करून जालन्यात हे महाविद्याय सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव मंत्री मंडळापुढे येऊ शकला नाही. याउलट परभणीचे आहे. फारसे सोपस्कार आणि तांत्रिक बाजूंची पूर्तता नसतानाही तेथे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.

जागेच्या मुद्द्यामुळे रखडले

जालन्यातील एमबीबीएस महाविद्यालय सुरू करण्यासाठी तीन जागांचे पर्याय दिले हेाते. त्यातून एकाही जागा ठरली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे महाविद्याय कुठे सुरू करावे या बाबत एका राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीच्या जागेच्या मुद्द्यावरून हे प्रकरण लांबणीवर पडल्याची जोरदार चर्चा आहे.

उस्मानाबादप्रमाणे बॉसकडे हट्ट हवा होता

उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी जाहीर वक्तव्य करून ते बॉसकडे गेल्याने मला सार्वजनिक जिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्याच्या प्रस्तावावर सही करावी लागल्याचे ते म्हणाले होते. परंतु असाच हट्ट त्यांनी त्यांचे बॉस अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे धरला असता, तर जालन्याचा प्रश्न निकाली निघाला असता.

चौकट

सामने थे किनारे....

जालना येथे एमबीबीएस महाविद्याय व्हावे यासाठी आपण खूप मोठा पाठपुरावा केला. परंतु ज्या प्रमाणे उस्मानाबाद येथे सर्व पक्षीय नेते एकत्रित आले होते. तशी मोट येथे बांधली गेली नाही. हे महाविद्याय येथे आता मंजूर झाले असते तर, त्याचे श्रेय अर्थतात मला मिळाले असते. परंतु ते होऊ द्यायचे नसल्याने या महत्त्वाच्या प्रश्नातही राजकारण आले. त्यामुळे आपल्याला एक गाणे आठवते जे म्हणजे डुबी दिल की..नय्या सामने थे किनारे याप्रमाणे जालन्याच्या एमबीबीएस महाविद्यालयाचे झाले आहे. परंतु आपण मागे हटणारे नसून, आगामी काळात हे महाविद्यालय जालन्यात आणण्यावर ठाम आहोत.

कैलास गोरंट्याल, आमदार, जालना