शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गत दोन वर्षांत जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावाला बसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST

जालना : आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेली जनजागृती आणि वेळोवेळी केले जाणारे सर्वेक्षण यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूच्या प्रादुर्भावाला चांगलाच ब्रेक ...

जालना : आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेली जनजागृती आणि वेळोवेळी केले जाणारे सर्वेक्षण यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूच्या प्रादुर्भावाला चांगलाच ब्रेक बसला आहे. गत वर्षभरात जिल्ह्यात डेंग्यूचे १५ रुग्ण आढळले होते.

जालना जिल्ह्यात २०१८ ते २०१९ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. डेंग्यूमुळे या कालावधीत तीन जणांचा मृत्यूही झालेला आहे. डेंग्यूचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता जिल्हा हिवताप कार्यालय, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती, आराेग्य तपासणीची मोहीम राबविली आहे. यात आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, पाणी साठलेले भांडे योग्य पद्धतीने झाकून ठेवणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, घराभोवताली, छतांवर वापरात नसलेले साहित्य न ठेवणे, त्यात पाण्याचा अधिक काळ साठा होऊ न देणे आदी सूचना पथकांमार्फत देण्यात आल्या आहेत.

डेंग्यूची लक्षणे

डेंग्यूची लक्षणे ही विषाणूजन्य गंभीर तापासारखी असतात.

अचानक येणारा ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी.

भूक मंदावणे, मळमळ होणे, पोट दुखणे आदी लक्षणे प्रारंभी दिसतात.

प्रारंभीची लक्षणे साध्या तापासारखी असतात. शिवाय त्वचेवर पुरळ दिसतात.

शिवाय आजार तीव्र झाल्यानंतर नाकातून, हिरड्यातून रक्तस्राव होतो.

शहर परिसरातील तेहेतीस हजार घरांचा सर्व्हे

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग नियंत्रणासाठी शहरी, ग्रामीण भागात पथके नियुक्त करण्यात आली आहेत. डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आला तरी संबंधित रुग्ण राहत असलेल्या परिसरामध्ये पथकामार्फत सर्वेक्षण केले जाते. गतवर्षी २०२० मध्ये जालना शहर व परिसरातील ३३ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शिवाय डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबतही शहर परिसरात नियुक्त करण्यात आलेल्या ७ पथकांमार्फत वेळोवेळी जनजागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले.

कुठल्या वर्षात किती पेशंट

२०१६- १७

२०१७- १०

२०१८- ११०

२०१९- ५६

२०२०- १५