शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

कोविडची लस ताप नव्हे संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST

तर जे श्रीमंत आहेत, त्यांचे उत्पन्न कमी झाल्याने ते चिंतातुर होते. एकूणच यावर उपाय म्हणून संपूर्ण जगालाही काहीच माहिती ...

तर जे श्रीमंत आहेत, त्यांचे उत्पन्न कमी झाल्याने ते चिंतातुर होते. एकूणच यावर उपाय म्हणून संपूर्ण जगालाही काहीच माहिती नव्हते. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे मोठे आव्हान होते. अनेकांनी कोविडपासून वाचण्यासाठी जेवढ्याा काही पॅथी आहेत, त्यांचा उपयोग केला. तर अनेकांनी आयुर्वेदात सांगितलेले उपाय करून स्वत:ला वाचविण्याचे प्रयत्न केले. अनेकांच्या घराघरात काढा संस्कृती रूजली होती. कोणी काहीही सांगावे आणि ते प्रत्यक्षात आणू नये असे क्वचितच झाले. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या बाबींचे मार्केट केवळ तेजीत नव्हे तर विक्रमी तेजीत होते. कधीही हातपाय न हलविणाऱ्यांनी योग साधनेतील अवघडातील अवघड आसने करून स्वत:ला सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. त्यातून अनेकांना चांगला लाभही झाला ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

या कोविडवर मास्क, सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेला महत्त्व प्राप्त झाले. पायातले जोडे हे दरवाजाबाहेर काढण्याची पद्धत पुन्हा रूजू झाली. घरातील जेवन हेच सर्वोत्तम मानले जाऊ लागले. अशातच सर्वांना परिवार आणि आपल्या गावाचे आणि पूर्वीपासून आत्मनिर्भर असलेल्या शेतीला सुगीचे दिवस झाले.

हे सर्व होत असताना जगभरातील शास्त्रज्ञ मात्र, कोराेना विषाणूवर प्रभावी लस शोधण्यात मग्न होते. दिवस-रात्र एक करून भारताच्या जवळपास बऱ्याच कंपन्यांनी ही लस शोधण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि लस शोधली देखील.ही लस १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचा मुहूर्त ठरला आणि तो प्रत्यक्षात आणला. परंतु नंतर ज्यांनी कोविन ॲपवर नोंदणी केली अशा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी रेडकार्पेट टाकावे लागत आहे. लसीबद्दल गैरसमज पसरू नये म्हणून आता डॉक्टरही मैदानात उतरले आहेत. एकूणच कुठलीही लस ही तुमची प्रतिकारशक्ती वाढविणारीच असते. त्यमुळे याबद्दलचा गैरसमज दूर होणे गरजेच आहे. आज वैद्यकीय कर्मचारीच जर मागे हटत असतील तर सामान्यांची भीती दूर होणार कशी हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ही लस ताप नव्हे संजीवनीच ठरेल अशी आशा करणे गैर ठरणार नाही.