शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

नियोजित प्रयत्नांमुळे वडीगोद्री कोरोनामुक्त, तीन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

राजू छल्लारे वडीगोद्री : प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपाययोजना आणि ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांचे पालन यामुळे वडीगोद्री गावातून कोरोना हद्दपार ...

राजू छल्लारे

वडीगोद्री : प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपाययोजना आणि ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांचे पालन यामुळे वडीगोद्री गावातून कोरोना हद्दपार झाला आहे. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांपासून गावात एकही रूग्ण आढळलेला नाही.

धुळे - सोलापूर व जालना - बीड महामार्गावर ४३०९ लोकसंख्येचे वडीगोद्री हे गाव वसलेले आहे. गत दीड - दोन वर्षात गावातील १०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, आजवर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सभापती बापूराव खटके, सरपंच रत्नप्रभा पंढरीनाथ खटके यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. ग्रामस्थांनी सूचनांचे पालन केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त बनले आहे. गावात ९० टक्के लसीकरण केले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आजही इतर उपाययोजना केल्या जात आहेत.

लसीकरणासाठी समिती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. तपासणी, चाचणी, उपचारावर भर दिला.

ग्रामस्थांनीही सूचनांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त बनल्याचे पं. स. सभापती बापूराव खटके म्हणाले.

ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न...

गावातील सर्व नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण, तपासणी करण्यात आली.

सॅनिटायझर फवारणी, स्वच्छतेवर भर देण्यात आला. शिवाय गावातील नागरिकांचे आजवर ९० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलेले मार्गदर्शन, प्रशासनाची साथ आणि सर्वपक्षीयांना सोबत घेऊन केलेले काम यामुळे गाव कोरोनामुक्त बनले आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये व ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठीही ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.

- रत्नप्रभा खटके, सरपंच

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या सहकार्यातून गावात उपाययोजना राबविण्यात आल्या. स्वच्छता, लसीकरणासह इतर उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला आहे.

- नंदकुमार गाडगे, ग्रामसेवक

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन अलगीकरण करण्यात आले. गरजेनुसार संबंधितांवर उपचार करण्यात आले. शिवाय विविध पथकांमार्फत आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. सुशील जावळे