शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

इच्छुक उमेदवारांकडून स्वयंघोषणा पत्र घेण्याची जिल्हा ग्रामसेवक युनियनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार असून, या पार्श्वभूमीवर ...

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार असून, या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून ग्रामसेवकांना विविध प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य शासनाने जारी केलेली अधिसूचना आणि ग्रामविकास विभागाच्या १३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना केवळ सात प्रकारचे दाखले देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला (बेबाकी प्रमाणपत्र)नमुना नंबर आठचा उतारा आणि निराधार असल्याचा दाखला या बाबींचा समावेश आहे.

या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त इतर प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना नाही. इतर सर्व प्रमाणपत्र, दाखले संबधित उमेदवारांकडून स्वयंघोषणा प्रमाणपत्राद्वारे दाखल करणे आवश्यक असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याच्या दाखल्या व्यतिरिक्त कोणतेही प्रमाणपत्र देण्याबाबत ग्रामसेवकाना सक्ती करण्यात येऊ नये आणि शासन निर्णयाप्रमाणे उमेदवारांकडून स्वयंघोषणपत्र घेण्याबाबत ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अवगत करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामसेवकांनी देखील शासन निर्णया व्यतिरिक्त इतर कोणतेही दाखले देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष डी.बी.काळे, सरचिटणीस पी.एस. वाघ, कोषाध्यक्ष एस.डी. चव्हाण, विभागीय महिला संघटक डी.पी. भालके, उपाध्यक्ष बी.ए. चव्हाण, महिला उपाध्यक्ष एल.बी. भोपळे, सहसचिव बी.जी. सुरडकर, संघटक एस. बी. साळवे, महिला संघटक ए.एम. वडगांवकर, कायदे सल्लागार एस.एस. अवघड, ए.बी.मेहेत्रे, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन जी.पी. कुरंगळ, सचिव व्ही.एम. शिंदे आदींनी केले आहे.

तालुका ग्रामसेवक युनियनचे तहसीलदारांना निवेदन

जालना तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष आर.यु.गोरे, सचिव मंजित जाधव आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना येथील तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.