शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवारांकडून स्वयंघोषणा पत्र घेण्याची जिल्हा ग्रामसेवक युनियनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार असून, या पार्श्वभूमीवर ...

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार असून, या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून ग्रामसेवकांना विविध प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य शासनाने जारी केलेली अधिसूचना आणि ग्रामविकास विभागाच्या १३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना केवळ सात प्रकारचे दाखले देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला (बेबाकी प्रमाणपत्र)नमुना नंबर आठचा उतारा आणि निराधार असल्याचा दाखला या बाबींचा समावेश आहे.

या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त इतर प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना नाही. इतर सर्व प्रमाणपत्र, दाखले संबधित उमेदवारांकडून स्वयंघोषणा प्रमाणपत्राद्वारे दाखल करणे आवश्यक असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याच्या दाखल्या व्यतिरिक्त कोणतेही प्रमाणपत्र देण्याबाबत ग्रामसेवकाना सक्ती करण्यात येऊ नये आणि शासन निर्णयाप्रमाणे उमेदवारांकडून स्वयंघोषणपत्र घेण्याबाबत ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अवगत करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामसेवकांनी देखील शासन निर्णया व्यतिरिक्त इतर कोणतेही दाखले देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष डी.बी.काळे, सरचिटणीस पी.एस. वाघ, कोषाध्यक्ष एस.डी. चव्हाण, विभागीय महिला संघटक डी.पी. भालके, उपाध्यक्ष बी.ए. चव्हाण, महिला उपाध्यक्ष एल.बी. भोपळे, सहसचिव बी.जी. सुरडकर, संघटक एस. बी. साळवे, महिला संघटक ए.एम. वडगांवकर, कायदे सल्लागार एस.एस. अवघड, ए.बी.मेहेत्रे, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन जी.पी. कुरंगळ, सचिव व्ही.एम. शिंदे आदींनी केले आहे.

तालुका ग्रामसेवक युनियनचे तहसीलदारांना निवेदन

जालना तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष आर.यु.गोरे, सचिव मंजित जाधव आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना येथील तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.