शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये गर्दी; ना मास्क, ना अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

n लोकमत न्यूज नेटवर्क जालना : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे ...

n लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. यामुळे ऑनलाइन फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सामाजिक न्याय भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येत आहे. मागील दहा दिवसात समितीच्या कार्यालयात २५८६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी सामाजिक न्याय भवन येथे उमेदवार गर्दी करीत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याचा पुरावा वा पावती जोडणे आवश्यक आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाने आपले रूप बदलल्याने राज्य शासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी जालना शहरातील सामाजिक न्याय भवनात पाहणी केली असता, येथे जात पडताळणीसाठी आलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी काही उमेदवारांनी आपल्या तोंडाला मास्क बांधले होते, तर काही जण विनामास्क होते. यावेळी सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सूचना येथे लावण्यात आलेली नाही, यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांची गर्दी

शासनाने ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मुभा दिली आहेत. ११ व १२ वीचे बहुतांश विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सामाजिक न्याय भवन येथे येतात. दररोज सात ते आठ विद्यार्थी येत असल्याचे सांगण्यात आले. हे विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करीत आहे.

६० टक्के उमेदवार

येथील सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात येत आहे. ६० ते ७० टक्के उमेदवार जात पडताळणीसाठी येतात. काही जण कोरोनाच्या नियमांचे पालन करतात तर काही जण नियमांकडे दुर्लक्ष करतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जात आहेत. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी तीन टेबल तयार करण्यात आले आहे. आलेल्या नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत; परंतु नागरिक याकडे कानाडोळा करीत आहे.

- प्रदीप भोगले, संशोधन अधिकारी.

प्रशासनातर्फे दक्षता

सामाजिक न्याय भवन येथे तीन टेबलवर जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जातात. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आलेल्या उमेदवारांना केवळ मास्क लागण्याचे सांगितले जातात.

रोज ५०० प्रस्ताव

सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी दररोज ५०० ते ६०० प्रस्ताव येत आहे. मागील दोन दिवसांपासून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. सोमवारी तब्बल ६१५ प्रस्ताव प्राप्त झाले.