शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जात पडताळणीसाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये गर्दी; ना मास्क, ना अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

n लोकमत न्यूज नेटवर्क जालना : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे ...

n लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. यामुळे ऑनलाइन फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सामाजिक न्याय भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येत आहे. मागील दहा दिवसात समितीच्या कार्यालयात २५८६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी सामाजिक न्याय भवन येथे उमेदवार गर्दी करीत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याचा पुरावा वा पावती जोडणे आवश्यक आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाने आपले रूप बदलल्याने राज्य शासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी जालना शहरातील सामाजिक न्याय भवनात पाहणी केली असता, येथे जात पडताळणीसाठी आलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी काही उमेदवारांनी आपल्या तोंडाला मास्क बांधले होते, तर काही जण विनामास्क होते. यावेळी सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सूचना येथे लावण्यात आलेली नाही, यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांची गर्दी

शासनाने ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मुभा दिली आहेत. ११ व १२ वीचे बहुतांश विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सामाजिक न्याय भवन येथे येतात. दररोज सात ते आठ विद्यार्थी येत असल्याचे सांगण्यात आले. हे विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करीत आहे.

६० टक्के उमेदवार

येथील सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात येत आहे. ६० ते ७० टक्के उमेदवार जात पडताळणीसाठी येतात. काही जण कोरोनाच्या नियमांचे पालन करतात तर काही जण नियमांकडे दुर्लक्ष करतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जात आहेत. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी तीन टेबल तयार करण्यात आले आहे. आलेल्या नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत; परंतु नागरिक याकडे कानाडोळा करीत आहे.

- प्रदीप भोगले, संशोधन अधिकारी.

प्रशासनातर्फे दक्षता

सामाजिक न्याय भवन येथे तीन टेबलवर जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जातात. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आलेल्या उमेदवारांना केवळ मास्क लागण्याचे सांगितले जातात.

रोज ५०० प्रस्ताव

सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी दररोज ५०० ते ६०० प्रस्ताव येत आहे. मागील दोन दिवसांपासून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. सोमवारी तब्बल ६१५ प्रस्ताव प्राप्त झाले.