शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जात पडताळणीसाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये गर्दी; ना मास्क, ना अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

n लोकमत न्यूज नेटवर्क जालना : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे ...

n लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. यामुळे ऑनलाइन फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सामाजिक न्याय भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येत आहे. मागील दहा दिवसात समितीच्या कार्यालयात २५८६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी सामाजिक न्याय भवन येथे उमेदवार गर्दी करीत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याचा पुरावा वा पावती जोडणे आवश्यक आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाने आपले रूप बदलल्याने राज्य शासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी जालना शहरातील सामाजिक न्याय भवनात पाहणी केली असता, येथे जात पडताळणीसाठी आलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी काही उमेदवारांनी आपल्या तोंडाला मास्क बांधले होते, तर काही जण विनामास्क होते. यावेळी सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सूचना येथे लावण्यात आलेली नाही, यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांची गर्दी

शासनाने ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मुभा दिली आहेत. ११ व १२ वीचे बहुतांश विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सामाजिक न्याय भवन येथे येतात. दररोज सात ते आठ विद्यार्थी येत असल्याचे सांगण्यात आले. हे विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करीत आहे.

६० टक्के उमेदवार

येथील सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात येत आहे. ६० ते ७० टक्के उमेदवार जात पडताळणीसाठी येतात. काही जण कोरोनाच्या नियमांचे पालन करतात तर काही जण नियमांकडे दुर्लक्ष करतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जात आहेत. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी तीन टेबल तयार करण्यात आले आहे. आलेल्या नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत; परंतु नागरिक याकडे कानाडोळा करीत आहे.

- प्रदीप भोगले, संशोधन अधिकारी.

प्रशासनातर्फे दक्षता

सामाजिक न्याय भवन येथे तीन टेबलवर जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारल्या जातात. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आलेल्या उमेदवारांना केवळ मास्क लागण्याचे सांगितले जातात.

रोज ५०० प्रस्ताव

सामाजिक न्याय भवन येथे जात पडताळणीसाठी दररोज ५०० ते ६०० प्रस्ताव येत आहे. मागील दोन दिवसांपासून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत २५८८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. सोमवारी तब्बल ६१५ प्रस्ताव प्राप्त झाले.